शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

मुख्यमंत्री ग्रामसडकला पडले खड्डेच खड्डे

By admin | Updated: April 1, 2017 05:18 IST

मासवण ते नागझरी या बोईसरला जोडणाऱ््या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्याला आताच भगदाडे पडायला सुरुवात

हितेन नाईक / पालघरमासवण ते नागझरी या बोईसरला जोडणाऱ््या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्याला आताच भगदाडे पडायला सुरुवात झाली आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यातच तो वाहून जाण्याची चिन्हे असल्याने स्थानिकासोबत सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरेनी त्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.दर्जोन्नतीसाठी मासवण ते नागझरी राज्यमार्ग क्रमांक ३४ असा ० किमी ते ९/८५३ किमी लांंबीचा रस्ता २१ आॅक्टोबर पासून सुरु होणे अपेक्षित असतांना अलीकडेच तो सुरु झाला. ठेकेदार या रस्त्याचे काम निकृष्ट करीत असल्याचे येथील नागरिकानी निदर्शनास आणून दिले आहे. सुमारे ५ कोटी ५ लाख ८५ हजार किमतीच्या या रस्त्यावर ९.७०३ किमी डांबरीकरण होणार आहे तसेच पाणी जाण्यासाठी एकूण १२ मोऱ्या समाविष्ट आहेत. यामध्ये १ किमीचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम खाते बांधणार असून यातील काँक्र ीटचा काही भाग जिल्हा परिषद बांधणार आहे.या रस्त्यांची उंचीही वाढवण्यात आली असली तरी मोऱ्या अरुंद असल्याने पावसाळ्यात डोंगरावरून येणारे पाणी साचून शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता ज्ञाती हितवर्धक संघाचे माजी अध्यक्ष एम पी पाटील यांनी वर्तविली आहे. पूर्वी मासवणहून नागझरीमार्गे बोईसर व तिथून पुढे जाण्यासाठी येथील वांदिवाली, वाकडी, वसरोली, खरशेत, काटाले, लोवरे, निहे, नागझरी ई. भागातील ५ हजार रहिवाशांसाठी हा एकमेव मार्ग होता. मात्र या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात चोरटी रेती, डबर,विटांची वाहतूक होत असल्यामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली, त्यामुळे एसटी, रिक्षासेवा बंद पडल्याने एक वर्षा पूर्वी जनतेच्या उद्रेकानंतर प्रशासनाने हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत दर्जोन्नती म्हणून मंजूर केला.आता या रस्त्याचे काम सुरु झाले आहे. या रस्त्यामुळे आपली सोय होईल.या विश्वासाला रस्त्यांच्या निकृष्ट बांधणीमुळे तडा गेला आहे. एकीकडे हे काम आम्ही व्यविस्थत व दर्जेदार करू असे ठेकेदार आर. के. सावंत यांनी नेमणूक केलेली माणसे आणि कार्यकारी अभियंता आर. एल. दुधे सांगत असतांना दुसरीकडे रस्त्यावरील भलामोठा डांबरचा कोट व खडी आताच उखडली गेली आहे. संबंधित प्रशासकीय यंत्रणा ठेकेदारांशी हातमिळवणी करीत आहेत. त्यामुळे आम्ही वेळोवेळी घटनास्थळी जाऊन दर्जाची तपासणी करतो व ठेकेदाराने निकषांप्रमाणे दर्जा कायम राखला आहे, हा बांधकाम खात्याचा दावा फोल ठरला आहे.अधिकारी घालतात ठेकेदाराला पाठीशी या फुटलेल्या रस्त्याची बांधणी कंत्राटदारामार्फत पुन्हा करवून घेऊ असे उत्तर कार्यकारी अभियंत्यांनी लोकमतला दिले असले तरी काही दिवसातच रस्त्याची अशी अवस्था होत असल्यास पूर्ण रस्त्याची गुणवत्ता कशी असणार? याचा अंदाज आम्हाला आताच आल्याचे राहुल घरत, प्रताप पाटील इ. ग्रामस्थांनी सांगितले. रस्ता फुटलेला आहे हे दिसत असताना ठेकेदाराला वाचवण्याचा हेतुपूर्वक प्रयत्न शासकीय यंत्रणा करीत असल्याचे दिसून येते. या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत आमसभेत पडसाद उमटले होते तर काटाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने या कामा विरोधात ठराव केला असून लवकरच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी ह्यांच्या कडे तक्र ार केली जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष महेंद्र अधिकारी यांनी सांगितले.लोकप्रतिनिधींनी या सर्व ग्रामस्थांना वाऱ्यावर सोडल्याने आपण त्यांच्या साथीने मोठे आंदोलन उभारणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सांबरे यांनी लोकमतला दिली.