शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वाढवण बंदराविरोधात केरळमध्ये आक्रोश;  मच्छिमार महिलांची रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 06:20 IST

किनारपट्टीवरील रस्ते, घराच्या भिंतींवर एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द अशा घोषणा रंगवून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती.

पालघर : केरळ येथील एनार्कुलममध्ये झालेल्या नॅशनल फिश वर्कर्स फोरम आयोजित तीन दिवसीय कार्यक्रमादरम्यान निघालेल्या रॅलीमध्ये मच्छिमार महिलांनी रस्त्यावर उतरून ‘वाढवण बंदरा’विरोधातील आपला आक्रोश व्यक्त केला. या वेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये ‘वाढवण बंदर हटाव’चे बॅनर हातात घेऊन ‘एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द’चा जोरदार नारा दिला.

१९९६-९८ दरम्यान जिल्ह्यातील डहाणूकरांच्या मानगुटीवर बसलेले वाढवणचे भूत डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाचे अध्यक्ष चंद्रशेखर धर्माधिकारी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विरोध आणि स्थानिकांच्या एकजुटीने यशस्वीपणे परतावून लावले होते. या बंदरविरोधात एवढा मोठा जनक्षोभ उसळलेला असताना व प्राधिकरणाच्या सुनावणीत पाच निर्णय पारित झाले असताना पुन्हा या बंदराने आपले डोके वर काढले असून भाजपा सरकारने ५ जून २०१५ रोजी एक सामंजस्य करारही केला आहे.

या बंदर उभारणीची घोषणा सरकारने करताना पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाची कुठलीही परवानगी न घेता आपल्या एकाधिकारशाहीच्या जोरावर हे बंदर पुन्हा लादले जात असल्याचे बंदरविरोधी संघर्ष समितीचे म्हणणे आहे. या बंदर उभारणीला झाई-बोर्डी ते थेट मुंबई दरम्यानच्या स्थानिक मच्छिमार, शेतकरी, डायमेकर आदींचा प्रखर विरोध असतानाही हे सरकार बंदर लादू पाहात असल्याने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावरही अनेक गावे, मतदारांनी बहिष्कार टाकीत आपला रोष व्यक्त केला होता.

किनारपट्टीवरील रस्ते, घराच्या भिंतींवर एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द अशा घोषणा रंगवून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. या वेळी टाऊन हॉल येथे झालेल्या सभेत कोचीचे खासदार हिबी येडन, केंद्रीय राज्य मंत्री जे.के. थॉमस, एनएफएफ अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृती समिती अध्यक्ष लिओ कोलासो, कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस किरण कोळी, उपाध्यक्ष मोरेश्वर पाटील, फिलीप मस्तान, राजन मेहेर, सचिव मोरेश्वर वैती, रविकिरण तोरसकर, दिलीप घारे इत्यादींसह महाराष्ट्रामधून शेकडो मच्छिमार उपस्थित होते. या परिषदेत वाढवण बंदराविरोधात तीव्र विरोध पाहायला मिळाला.

एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द

पालघर व मुंबई जिल्ह्यात सुरू असलेली वाढवण बंदराविरोधातील धगधगती आग आता राज्याबाहेर पसरू लागली आहे. ७, ८, ९ डिसेंबर दरम्यान नॅशनल फिश वर्कर्स फोरम या देशातील मच्छिमारांच्या संघटनेची कॉन्फरन्स केरळमधील एनार्कुलम येथे आयोजित करण्यात आली आहे. या संघटनेची रॅली मरीन ड्राईव्ह ते टाऊन हॉलदरम्यान काढण्यात आली.

या रॅलीमध्ये पालघर, मुंबईमधील महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या रणरागिणी पूर्णिमा मेहेर, उज्वला पाटील, ज्योती मेहेर, अनिता धनूर, संगीता वैती, सुमती मेहेर, अनुसया पाटील आदींनी ‘वाढवण बंदर हटाव’चे बॅनर हातात घेऊन ‘एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द’चा जोरदार नारा दिला. स्थानिक मच्छिमार महिलाही या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार