शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

दापचरी चेक पोस्टचा प्रवास खड्ड्याखड्ड्यातून

By admin | Updated: July 6, 2017 05:45 IST

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दापचरी सीमा तपासणी नाक्याच्या अंतर्गत असणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली असून हा प्रमुख महसुली नाका

शौकत शेख/लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दापचरी सीमा तपासणी नाक्याच्या अंतर्गत असणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली असून हा प्रमुख महसुली नाका असल्याने वाहनांची वर्दळही मोठी असते. खड्ड्या खड्ड्यांच्या रस्त्यामुळे येथे दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत. बांधा, वापरा व हस्तांतरण करा (बीओटी) या तत्वावर शासनाने ठेका दिलेल्या सदभाव इंजिनियरिंग या कंपनीचे याकडे सप्शेल दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.बांधा, वापरा आणि हस्तांतरण करा या तत्वावर राज्य शासनाने सदभाव इंजिनियरींग कंपनीला दापचरी येथील चेक पोस्ट दिले आहे. परंतु, मुंबई-गुजरातकडे जाणाऱ्या वाहनांकडून सेवा सुविधांसाठी सक्तीने सर्व्हीस टॅक्स वसूल करून ही ठेकेदार कंपनी आवश्यक सेवा सुविधाकडे डोळे झाक करीत असल्याने सद्भाव कंपनीबाबत वाहनचालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. गुजरात कडून मुंबई वाहिनीवर येत असतांना दापचरी येथील सीमा तपासणी नाक्यावर सर्व्हीस टॅक्स, रोड टॅक्स, इत्यादी कर भरून बाहेर पडले असता मुंबई हायवेला लागूनच असलेल्या चेक नाक्याच्या रस्त्याला मोठ मोठाले खड्डयांचा सामना करावा लागतो. त्या खोल खड्डयांमध्ये पाणी साचून डबकी तयार झाल्याने वाहन चालकांना बाहेर पहतांना प्रयास करावे लागतात. त्यातच गाडी चालवतांना कुणाला धक्का लागल्यास रस्त्यावरच तंटा सुरु होऊन मागे वाहनांच्या रांगा लागतात.आरटीओचाही ढिसाळ कारभार : दापचरी आरटीओ नाका सर्वात मोठा तपासणी नाका आहे येथे प्रादेशिक परिवहन विभागाला दररोज २१ लाखाचा महसूल प्राप्त होतो. या नाक्यावर दररोज मुंबई-अहमदाबाद कडे जाणाऱ्या ट्रान्सपोट कंपनीच्या गाडयांना पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नसून अनेक प्रकारच्या गैरसोयी आहेत. अस्ता व्यस्त पडलेले बेरीकटर्स, खडीचे ढिगारे, मार्ग फलकाचा अभाव, इकडे तिकडे पडलेले बांधकाम साहित्यामुळे वाहनचालकांना बाहेरचा मार्ग काढणे जिकरीचे झाले आहे.वसूली हाच एक कलमी कार्यक्रमगुजरात व महाराष्ट्रातील अवजड वाहने हाकने तारेची कसरत ठरत आहे. त्यामुळे सर्व्हीस टॅक्स भरून त्याचा काय उपयोग असा सवाल वाहन चालकांकडून होत आहे. विशेष म्हणजे सदभाव इंजिनियरींग कंपनी प्रत्येक वाहनांकडून १३५ रूपये वसूल करते. त्यातून दररोज लाखेचा महसूल गोळा केला जातो.परंतु, टोल नाकेच खड्डेमय झाले असून कंपनीला केवळ वसूलीचाच एक कलमी कार्यक्रम राबवायचा आहे की, काय असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.पाऊस सुरू असल्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले नाही. पाऊस थांबताच खड्डे बुजविले जातील.-सुरेंद्र गेडाम, जनरल मॅनेजर, सदभाव इंजिनियरींग कंपनी दापचरी