शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

मुलानेच केली आईची गळा आवळून हत्या; फुलपाड्याच्या गांधी नगर परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2023 19:37 IST

गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने आरोपी मुलाला अटक केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क,  नालासोपारा (मंगेश कराळे) : विरारमध्ये एका २६ वर्षीय पोटच्या मुलानेच आपल्या आईची ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करत शवविच्छेदनसाठी पाठवून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने आरोपी मुलाला अटक केली आहे. 

विरारच्या फुलपाडा येथील गांधी नगर परिसरातील वक्रतुंड अपार्टमेंटमध्ये वैशाली धनु (४४) ही मुलगा देवांश (२६) याच्यासोबत राहत होते. मंगळवारी रात्री मुलगा आणि आईमध्ये काही कारणावरून भांडण झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यानंतर गुरुवारी संतापलेल्या मद्यधुंद अवस्थेत मुलाने आपल्याच आईचा ओढणीने गळा दाबून हत्या केली आहे. या भांडणाची माहिती वैशालीने तिच्या आईला फोन करून अगोदरच दिली होती. तरी गुरुवारी दुपारी तिची आई घरी आली असता दाराला कुलूप लावून बेडरूममध्ये मृतदेह पडलेला दिसला. त्यानंतर मयत वैशालीच्या आईने तत्काळ ११२ नंबरवर कॉल करून संपर्क साधून ही माहिती दिली.  त्यानंतर विरार पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले.

आई व मुलामध्ये भांडण झाले होते

मुंबईच्या माहीम येथे आई व मुलगा चार ते पाच दिवसांपूर्वी लग्नाला गेले होते. त्याठिकाणी मुलाने भांडण केल्याने नातेवाईकांनी पोलिसांना तक्रार केली होती. त्यावेळी आई व मुलामध्ये भांडण झाले होते. हाच राग काढून मुलाने ही हत्या केली आहे. आरोपी मुलाला गुन्हा दाखल करून अटक केले आहे. - राजेंद्र कांबळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVirarविरार