शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

राज्यात एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाण्यासाठी ५ ते ६ तास लागता कामा नये - मुख्यमंत्री

By धीरज परब | Updated: February 15, 2024 19:52 IST

मीरा भाईंदर मधील मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी बुधवारी रात्री मुख्यमंत्री शहरात आले होते.

मीरारोड- राज्याच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाण्यासाठी ५ ते ६ तासांपेक्षा जास्त लागणार नाही असे रस्त्यांचे जाळे सरकार बनवत आहे. त्यासाठी अनेक रस्ते, पूल बांधून पूर्ण झाले असून अनेक योजना पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शाळा आणि आरोग्य केंद्र आदर्शवत अशी मॉडेल बनवा असे ते म्हणाले. 

मीरा भाईंदर मधील मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी बुधवारी रात्री मुख्यमंत्री शहरात आले होते. भारतरत्न लता मंगेशकर नाटयगृहात बोलताना त्यांनी अनेक विकास योजनां बद्दल सांगितले . ग्रीनफिल्ड पद्धतीने पनवेल वरून गोव्याला ४ तासात पोहचता येईल, अटल सेतू मुळे २ तासांचा प्रवास १५ मिनिटांवर आला आहे. बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्गा मुळे नागपूर ६ तासावर आले आहे. दहिसर वरून येणारा रस्ता हा भाईंदर व पुढे वसई - विरार वरून पालघर ते थेट डहाणूपर्यंत जाणार आहे . विरार-अलिबाग कॉरिडॉर चे काम सुरु आहे.  आपले सरकार आल्या नंतर विकासकामे वेगाने सुरु झाली आहेत असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

सार्वजनिक आरोग्य केंद्र अद्यावत करा.  शाळा मॉडेल अश्या बनवा . सातारा जिल्हाधिकारी यांनी सुमारे ४०० शाळा व आरोग्य केंद्र कशी मॉडेल केली आहेत ते बघा . शाळा चांगल्या करा पण शाळांच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा चांगला व स्वच्छ ठेवा . मीरा भाईंदर मध्ये मेट्रोचे काम सुरु आहे . सूर्याचे पाणी येतेय , सिमेंट रस्ते होत आहेत . जुन्या इमारती व झोपडपट्ट्यांचा विकास साठी क्लस्टर मंजूर केले असून त्याचे प्रत्यक्ष काम सुरु करा . क्लस्टरसाठी अनेक वर्ष आम्ही आंदोलने केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले . 

मीरा भाईंदर हे हे मुंबई - ठाण्याचा भार हलका करणारे मध्यवर्ती शहर आहे . शिवाय वेशीला लागून वसई विरार पण आहे . शहरात धूळ , डेब्रिज , घाण असता काम नये. ऑक्सिजन जास्त प्रमाणात देणाऱ्या बांबूच्या लागवडीसाठी भर दिला जात आहे . बांबू जास्त ऑक्सिजन देतेच पण त्याचा वापर सुद्धा वेगवेगळ्या कामासाठी होतो . झेंडे लावायला , अंतिमयात्रे वेळी बांबू लागतोच तसाच काही जणांना सुद्धा बांबू लावावा सुद्धा लागतो असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला . 

डीप क्लीन ड्राइव्ह मुळे शहर अधिक स्वच्छ होत असून धूळ सुद्धा साफ होते . रस्ते धुण्यासाठी मलनिःसारण प्रकल्पाचे प्रक्रिया पाणी वापरा . पिण्याचे पाणी तर नाही ना वापरत ? असा सवाल पालिका आयुक्तां कडे पहात केला . मुंबईत सफाईकामगारांच्या ४८ वसाहत असून त्या स्वच्छ व चांगल्या ठेवण्याचे आदेश दिल्याचे ते म्हणाले .  

अधिकाऱ्यांनो कार्यालयात बसून नव्हे तर फिल्डवर काम करा अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून नव्हे फिल्डवर काम करावे . कार्यालयात बसून रहाल तर प्रत्यक्ष बाहेरची वस्तुस्थिती समजणार नाही . अधिनस्त अधिकारी जे सांगतील तेवढेच कळेल .  ग्राउंड रियालिटी महत्वाची आहे असे मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना जाहीर कार्यक्रमात सांगितले . फिल्डवर काम करणारे अधिकारी आवडतात . मुख्यमंत्री कधी रस्त्यावर पाणी मारायला गेला होता का ? पण मुख्यमंत्री आल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणा फिल्डवर दिसते  असे मुख्यमंत्री म्हणाले . 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोडEknath Shindeएकनाथ शिंदे