शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

दिवा-वसईच्या प्रवाशांना कोणी वाली आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 10:32 IST

रेल्वे प्रशासनाने या मार्गावर सेवा सुरू करण्याच्या प्रवाशांच्या मागणीला सतत वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

कल्पेश पोवळे, उपसंपादक

महामुंबईतील उपनगरी रेल्वे सेवेवर जेवढे बोलावे तेवढे कमी. लोकल प्रवाशांच्या समस्यांना अंत नाही. कल्याण-डोबिंवलीपासून ते पश्चिम उपनगरांतील अनेक स्टेशनवरील प्रवाशांचे लोकल प्रवासात रोज हाल होतात. त्यात दिवा व वसईकरांच्या समस्यां जैसे थे आहेत. पूर्वीच्या दिवा-वसई या मार्गाला उपनगरी सेवेचा दर्जा देऊन एक दशक लोटले आहे. पण, या मार्गावर उपनगरी सेवा सुरू झालेली नाही. ही सेवा सुरू करण्याबाबत आतापर्यंत हजारो वेळा त्या-त्या वेळच्या सरकारांनी आश्वासन दिले. मात्र, त्याचा त्यांना विसर पडतो. सुरुवातीला रेल्वेकडे गाड्या नव्हत्या. पण, आता ती कमतरताही भरून निघाली आहे. रेल्वे प्रशासनाने या मार्गावर सेवा सुरू करण्याच्या प्रवाशांच्या मागणीला सतत वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

उपनगरी रेल्वेच्या सध्याच्या हार्बर, मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेमार्ग यांना सहज जोडणारा मार्ग म्हणून पनवेल-वसई मार्गाकडे पाहायला हवे. मुंबई-गोवा, मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक, मुंबई-अहमदाबाद या चारही महामार्गांना जोडणारा हा मार्ग आहे. उरणपासून (जेएनपीटी) दिल्लीपर्यंत जाणारा जलदगती मालवाहतूक मार्ग या मार्गाला लागूनच आहे. अशात काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात पनवेल-दिवा-वसई या मार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी दिली होती. मात्र, अद्याप हे काम पूर्णत्वास गेलेले नाही. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास दिवा-पनवेल, दिवा-वसई या मार्गांवरील प्रवास जलदगतीने होईल.सध्या या मार्गावर ‘मेमू’च्या माध्यमातून सेवा सुरू आहे. त्याच्या पनवेल आणि दिव्याकडून वसईच्या दिशेने आठ फेऱ्या होतात. पण, या परिसरातील नागरीकरण वाढत आहे, तसेच भिवंडी येथे मोठ्या प्रमाणात गोदामांची संख्या आहे. तसेच, अनेक उद्योगधंदे या भागात आहेत. त्यामुळे येथे मोठ्या संख्येने नोकरदार आणि व्यापाऱ्यांची ये-जा असते. मात्र, या मार्गावरील प्रवासी रडगाथा संपण्याची चिन्हे नाहीत. या मार्गावर मेमू वेळेवर येत नसल्याचा अनुभव अनेकदा येतो. अशात काही दिवसांपूर्वी मेमू उशिराने आल्याने प्रवाशांनी भिवंडी रोड रेल्वे स्थानकात रेल्वे रोको आंदोलन केले होते. प्रवाशांनी आता आंदोलने तरी किती वेळा करायची. त्यांना तात्पुरते आश्वासन दिले जाते. पुन्हा पहिले पाढे पच्चावन्न.

नव्या पर्यायामुळे गर्दीवर उतारा

रायगड जिल्हा त्यासोबतच मुंबई-गोवा, मुंबई-पुणे महामार्गावरील प्रवाशांना पालघर पट्ट्यात, पुढे गुजरातच्या दिशेने जलदगतीने पोहोचण्यासाठी पनवेल-दिवा-वसई मार्गावर लोकल सुरू करणे गरजेचे आहे. त्यातून मध्य रेल्वेचे मुख्य, हार्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वे जोडले जातील. गर्दीवर उतारा मिळेल. तसेच, पनवेल, कोपर, भिवंडी, वसईकरांना प्रवासाचा नवा पर्याय खुला होईल.

का आहे या मार्गाची गरज?

पनवेल ते कोपर, भिवंडी, खारबाव, जुचंद्र या भागात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्पांचे काम सुरू आहे. या मार्गावर लोकल सेवा सुरू झाली, तर त्यांना सोयीचा वाहतूक पर्याय उपलब्ध होईल. तसेच मध्य व पश्चिम रेल्वेमार्गाला जोडणारा नवा पर्याय उपलब्ध झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळू शकतो.  

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेwestern railwayपश्चिम रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे