शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

विक्रमगडमधील रोजगार हमी याेजनेतील सिंचन विहिरी अडकल्या लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 02:03 IST

लाभार्थ्यांचे हेलपाटे

राहुल वाडेकरविक्रमगड : शेतीला सिंचनासाठी शासनाच्या रोजगार हमी योजनेनुसार सिंचन विहिरीची योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, कागदपत्रांच्या जंजाळात अडकलेल्या या याेजनेंतर्गत ९४ गाव-पाडे असणाऱ्या विक्रमगड तालुक्यात सध्या रोहयो योजनेंतर्गत सिंचन विहिरीचे एकही काम सुरू नाही. तालुक्यातील विविध गावांतील ३० विहिरींचे प्रस्ताव ३४ प्रकारच्या विविध कागदपत्रांची पूर्तता नसल्याने अपूर्ण असल्याचे कारण देत दाेन वर्षांपासून जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीकडे परत पाठवण्यात येत आहेत. त्यामुळे ही याेजना लालफितीत अडकल्याची स्थिती दिसत आहे.

रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींची कामे सुरू करण्यास दिरंगाई केली जात आहे, असा आराेप लाभार्थी करत आहेत. या विहिरींना जि.प. व पं.स.कडून मंजुरी देऊन ही सिंचन विहिरींची कामे सुरू करण्याची मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे. या याेजनेमुळे पाणीटंचाईवर मोठी मात होऊ शकते. मात्र, जि.प. व पं.स. कागदपत्रांच्या पूर्ततेत ही याेजना अडकवून दिरंगाई करत असल्याचा आरोप लाभार्थी करत आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांना विहिरीच्या बांधकामासाठी शासन तीन लाखांचे अनुदान देते. त्यामुळे लाभार्थीसंख्या वाढत आहे. माझ्या शेतीला सिंचन व्यवस्था नसल्याने तीन वर्षांपासून रोहयोंतर्गत विहिरींसाठी सर्व कागदपत्रे जमा करून ग्रामपंचायतीकडे सादर केली. त्यासाठी अपूर्ण कागदपत्रांचे कारण दिले जात आहे. पं.स. विक्रमगड येथे जाऊन अधिकाऱ्यांकडे दोन वर्षांत अनेक वेळा विचारणा केली. जि.प. पालघर येथे मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केल्याचे सांगण्यात आल्याचे ओंदे येथील शेतकरी बबन सांबरे यांनी सांगितले.

रोहयोंतर्गत विक्रमगड तालुक्यातील ३० सिंचन विहिरींचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवले होते. ३४ प्रकारची कागदपत्रांची पूर्तता नसल्याने हे प्रस्ताव अपूर्ण असल्याने ते पुन्हा आमच्या कार्यालयाकडे आले. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवणार आहोत. वरिष्ठ कार्यालयाने मंजुरी दिल्यानंतरच तालुक्यात रोहयोंतर्गत सिंचन विहिरींची कामे सुरू होऊ शकतील.- बाबासाहेब गायकवाड, प्रकल्प अधिकारी, रोहयो,पंचायत समिती, विक्रमगड

n अनेक शेतकरी भाजीपाला पिकवतात. रब्बी हंगामात त्यांना त्यातून राेजगार उपलब्ध हाेताे. n त्यामुळे अनेक शेतकरी सिंचन याेजनेतील विहिरींसाठी अर्ज करत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर