शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

सलग चार दिवस पाऊस झाल्यास मिळणार विमा, चिकू पीक विम्याची नवीन अट जाचक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 00:38 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना मृग बहरासाठी चिकू फळालाही लागू आहे.

बोर्डी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना मृग बहरासाठी चिकू फळालाही लागू आहे. मात्र, यावर्षी नव्याने प्रमाणके निश्चित करताना २० मिमी पावसाच्या अटीचा समावेश केल्याने या लाभापासून उत्पादक वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे ही अट शिथिल करण्याची मागणी चिकू उत्पादकांनी या योजनेचे जिल्हास्तरीय अध्यक्ष आणि पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली आहे.कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरांमध्ये फळपिकांचा प्रमुख सहभाग आहे. पिकाचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र अपेक्षित उत्पन्न न आल्यास येणारा तोटा मोठा असतो. यासाठी फळपिकांना हवामान धोक्यापासून विमासंरक्षण देऊन आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने विमा योजना राबविण्यात येते. पालघर जिल्ह्याचे प्रमुख पीक असलेल्या चिकू या फळाचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या योजनेच्या लाभासाठी प्रमाणके निश्चित करण्यात आली आहेत. १ जुलै ते ३० सप्टेंबर या काळात सापेक्ष आर्द्रता सलग पाच दिवस ९० टक्क्यांपेक्षा जास्त राहिल्यास आणि प्रतिदिन २० मिमी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस सलग चार दिवस झाल्यास प्रतिहेक्टर २५ हजार तर आठ दिवस राहिल्यास ५५ हजार देय राहणार आहे.यावर्षी २० मिमी पावसाच्या अटीचा नव्याने समावेश करण्यात आल्याने चिकू उत्पादक या लाभापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारण, मुसळधार पावसानंतर पुढील काही दिवस पाऊस न झाल्यास, आर्द्रता निर्माण होऊन त्याचा फटका बागांना बसू शकतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याला कृषी शास्त्रज्ञांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे ही अट तत्काळ शिथिल करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन उत्पादकांकडून या योजनेचे जिल्हास्तरीय अध्यक्ष जिल्हाधिकारी शिंदे यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती कृषिभूषण यज्ञेश सावे यांनी दिली. यापूर्वी केवळ आर्द्रतेची अट होती, त्यामुळे विम्याचा लाभ उत्पादकांना मिळत होता. पावसाच्या या नवीन अटीचा समावेश करताना, पुणे येथे फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सभेत त्याला विरोध करण्यात आला. मात्र मागणी फेटाळल्याची माहिती उपस्थित चिकू उत्पादकांच्या प्रतिनिधींनी दिली.चिकू विम्याच्या अटींमध्ये २० मिमी पावसाच्या अटींचा समावेश केल्याने, जिल्ह्यातील बागायतदार या योजनेपासून वंचित राहण्याची भीती आहे. नुकसानामुळे उत्पादक देशोधडीला लागणार असून मजूरवर्गावर परिणाम होईल, त्यामुळे ती अट वगळण्यात यावी.- देवेंद्र राऊत, चिकू बागायतदार, नरपडमुसळधार पाऊस झाल्यानंतर पुढील २ ते ३ दिवस पाऊस न होताही आद्रता वाढून चिकू बागायतीचे नुकसान होऊ शकते.- प्रा. विलास जाधव,शास्त्रज्ञ, कृषी विज्ञानकेंद्र, कोसबाडडहाणू तालुक्यात २८३० हेक्टर क्षेत्रावर विमा उतरावलेले असून २६०२ लाभार्थी आहेत. तर या जिल्ह्यात उत्पादनक्षम चिकू झाडांचे क्षेत्र सुमारे ७ हजार हेक्टर आणि या तालुक्याचे क्षेत्र ४ हजार हेक्टर आहे.- संतोष पवार,तालुका कृषी अधिकारी, डहाणू

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनagricultureशेती