शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छीमाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 08:57 IST

अनेक वर्षांपासून पाकिस्तानी तुरुंगात खितपत पडलेल्या भारतीय मच्छिमारांपैकी काही मच्छिमारांची पाकिस्तान सरकारने टप्प्याटप्प्याने सुटका करण्यास सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेल्या सोमनाथ (गीर) येथील रहिवासी भूपतभाई जीवा भाई (वय ५२) या मच्छिमाराचा ९ ऑक्टोबरला मृत्यू झाला. गुजरात राज्यातील ट्रॉलरमधून मासेमारी करताना भारताची समुद्र हद्द ओलांडल्याने पाकिस्तान सैनिकांनी त्याला अटक केली होती. भूपतभाई याचा मृतदेह एक महिन्यानंतर मायदेशात पाठविला जाणार आहे.

   अरबी समुद्रात मासेमारी करताना पाकिस्तानी सैनिकांनी अटक केलेल्या आणि अनेक वर्षांपासून पाकिस्तानी तुरुंगात खितपत पडलेल्या भारतीय मच्छिमारांपैकी काही मच्छिमारांची पाकिस्तान सरकारने टप्प्याटप्प्याने सुटका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अजूनही शेकडो भारतीय मच्छिमार, खलाशी पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडले आहेत. त्यातील काही लोकांच्या शिक्षेचा कालावधीही पूर्ण झाला तरी त्यांना सोडण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यापूर्वी जगदीश मंगल (वय ३५) या मच्छिमाराचा ६ ऑगस्टला मृत्यू झाला होता. तोही गुजरात राज्यातील होता. त्यांचे पार्थिव ४० दिवसांनी परत आणले गेले. भूपतभाई यांचे पार्थिव लवकरच परत आणले जाईल, असा विश्वास त्यांच्या नातेवाइकांकडून व्यक्त केला जात आहे.

२६४ जण तुरुंगातआजमितीस २६४ भारतीय मच्छिमार पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. २५० हून अधिक भारतीय मच्छिमारांनी त्यांची शिक्षा पूर्ण केली असून, त्यांचे राष्ट्रीयत्वही निश्चित झाले आहे. या मच्छिमारांची तत्काळ सुटका करावी, अशी मागणी इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमॉक्रॅसी संस्थेचे माजी सचिव जतिन देसाई यांनी केली आहे.

पाकिस्तान सरकार २ जुलैला १०० भारतीय मच्छिमारांना सोडणार होते; परंतु, काही अपरिहार्य कारणांमुळे त्यांनी त्यांची सुटका केली नाही.  भारतानेही ७४ पाकिस्तानी मच्छिमारांना ताब्यात घेतले आहे. या मच्छिमारांनी अनावधानाने समुद्रातील सीमा ओलांडून पलीकडच्या देशाच्या सीमेत प्रवेश केल्याचा ठपका ठेवून  त्यांना अटक करू नये. त्याऐवजी, त्यांना त्यांच्या देशाच्या सीमेत परत पाठवावे. - जतीन देसाई, माजी सचिव, इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस ॲण्ड डेमॉक्रॅसी संस्था

टॅग्स :Pakistanपाकिस्तान