शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

भारतात महिलांची उपेक्षा, पोलीस महानिरीक्षकांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:32 IST

आपल्या देशात महिलांना सांस्कृतिकदृष्टया पूजले जात असले तरी सामाजिक दृष्ट्या व्यावहारीकपणे मात्र तिची आजही उपेक्षा होत आहे.

वसई : आपल्या देशात महिलांना सांस्कृतिकदृष्टया पूजले जात असले तरी सामाजिक दृष्ट्या व्यावहारीकपणे मात्र तिची आजही उपेक्षा होत आहे. महिला सक्षमीकरण आणि समानतेच्या बाबतीत जे राष्ट्र पुढे आहेत, तेथील विकास मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येते, असे मत कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांनी वसईत बोलताना केले.पालघर जिल्हा पोलिसांनी जाणिव ट्र्स्टच्या मदतीने जिल्ह्यात मुली वाचवा आणि त्यांची सुरक्षा करा (सेव द गर्ल्स अँड प्रोटेक्ट गर्ल्स) हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. याविषयावर जनजागृती करण्यासाठी जाणिव एक एहसास हा लघु चित्रपटही तयार करण्यात आला आहे. त्याचे विमोचन बजाज यांच्या हस्ते वसईत करण्यात आले. पालघरचे पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे, वसईचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन, जाणिव ट्रस्टचे मिलिंद पोंक्षे आणि आरती वाढेर यावेळी उपस्थित होते. जाणिवच्या मदतीने मुलींच्या संवर्धन ग्रामीण भागातील तळागाळापर्यंतच्या घटकांपर्यंत पोचवणार आहोत, अशी माहिती पालघर जिल्हा पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांनी दिलीे. मुलींच्या शोषणाविरोधात यापुढे व्यापक प्रचार व प्रसाराची मोहिम हाती घेतली जाईल, असे अतिरिक्त पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी आपल्या भाषणात सांगितले. जाणिवने विविध शाळा आणि कॉलेजांमध्ये अडीचशेहून अधिक व्याख्याने दिली आहेत. येत्या २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत ५०१ व्याख्यानांचे उद्दीष्ट ठेवले आहे, अशी माहिती जाणिवचे मिलिंद पोंक्षे यांनी दिली.

टॅग्स :Policeपोलिस