शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
2
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
3
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याला पुन्हा भाव! मात्र, चांदी घसरली; आजचे दर काय?
4
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
5
IND vs SA : कोण आहे Senuran Muthusamy? कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी खास कनेक्शन अन् बरंच काही
6
४०व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार सोनम कपूर, हटके मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष
7
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
8
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
9
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
10
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
11
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
12
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
13
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
14
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
15
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
16
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
17
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
18
नाशिक: तस्कर टोळीतील एकाने वनपथकाच्या हाती दिल्या तुरी; बाऱ्हे वनविश्रामगृहातून ठोकली धूम
19
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
20
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंशामुळे जिल्ह्यातील मृत्यूचे वाढले प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:10 IST

दहा महिन्यात नऊ जण दगावले

हितेंन नाईक/अनिरुद्ध पाटीललोकमत न्यूज नेटवर्कपालघर/बोर्डी : पालघर जिल्ह्यात मागील दहा महिन्यात सर्पदंशाने नऊ जण दगावले आहेत, तर एकाला विंचूदंशाने प्राण गमवावा लागला आहे. गत तीन वर्षांत सर्पदंशाने सतरा जणांचा आणि तिघांचा विंचूदंशाने मृत्यू झाल्याची नोंद पालघर जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातील आहे. पालघर जिल्ह्यातील सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अधिवासाची ठिकाणे विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या नानाविध प्रकल्पांच्या कामामुळे उद्ध्वस्त होत असून, नवीन वास्तव्याच्या शोधार्थ साप, विंचू आदी विषारी सरपटणारे प्राणी मानवी वस्तीच्या जवळ येत आहेत. तसेच हवेतली उष्णताही वाढत चालली असून, त्यापासून बचाव करण्यासाठी नेहमी रात्री बाहेर पडणाऱ्या प्राण्यांच्या हालचाली आता दिवसाढवळ्याही वाढू लागल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीणबहुल भागात सर्पदंश, विंचूदंशाचे प्रमाण मोठे असल्याचे दिसून आले आहे. शेतामध्ये, घराच्या आडोशाला, रस्त्यात चालताना अंधारात पाय पडल्याने हे दंश होत आहेत. सर्पदंशामुळे गेल्या तीन वर्षांत उपचारादरम्यान हे १७ जण दगावले आहेत. या प्रकारे मृत्यू होऊनही नोंदी न झाल्यामुळे ही आकडेवारी आणखी वाढू शकते. पालघर जिल्ह्यात गेल्या वर्षी सर्वाधिक सर्पदंशाने चार मृत्यू हे डहाणू तालुक्यातील कासा रुग्णालयात झालेले आहेत. तर जव्हार रुग्णालयात तीन आणि मनोर रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत प्रत्येकी चार मृत्यू झाले असले तरी त्या तुलनेत या वर्षी मृत्यू झाल्याचा आकडा वाढला आहे. एप्रिल ते जानेवारीपर्यंत नऊ जण दगावले आहेत.

सर्प-विंचूदंश झाल्यानंतर दंश झालेल्या व्यक्तीला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले जाते. तिथे प्राथमिक उपचार किंवा दंशाची लस देऊन पुढे उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात येते. बहुतांश वेळेला सर्पदंश झाल्यानंतर प्राथमिक उपचाराचे सखोल ज्ञान अथवा योग्य औषधोपचार मिळण्यास उशीर होत असल्याने त्या व्यक्तीवर उपचार करणे शक्य होत नाही. परिणामी, उपचारांमध्ये गुंतागुंत निर्माण होत असल्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागतो.

गतवर्षी दोन हजारांहून अधिक नागरिकांना सर्पदंश गेल्या वर्षी दोन हजारांहून अधिक जणांना सर्पदंश झाले होते. २०१९-२० साली तीन हजारांच्या जवळपास तर २०१८-१९ साली तीन हजारांहून अधिक जणांना सर्पदंश झाले होते. या वर्षी २२३ जणांना विंचूदंश, गेल्या वर्षी ४५२ जणांना व १८-१९ मध्ये ३९३ जणांना विंचूदंश झाले आहेत. त्यामुळे या मृत्यूच्या घटनांमध्ये कमतरता आणण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखताना अशा रुग्णांना वेळीच उपचार मिळतील, अशी व्यवस्था उभारणे गरजेचे बनले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारsnakeसाप