शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

वसई विरार महापालिकेसाठी लसीचा पुरवठा वाढवा; आमदार हितेंद्र ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 12:43 IST

कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून कोविड-19 नियंत्रणासाठी लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे

- आशिष राणे

वसई :वसई-विरार शहर महानगरपलिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये शासनाने दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार कीविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. वसई-विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लोकसंख्या सुमारे 23 लाख इतकी असून कोविड-19 ने बाधीत रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 

कोविड-19  प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून कोविड-19 नियंत्रणासाठी लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे आणि त्यासाठी जास्त संख्येने लस पुरवठा करण्याची मागणी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. 

आम.हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे कि,आतापर्यंत कोव्हिशिल्ड लसीचे 98 हजार 192 डोस व कोवॅक्सीन लसीचे 4 हजार 800 डोस असे दोन्ही मिळून एकूण लसीचे 1लाख 2 हजार 992 डोस वसई-विरार शहर महापालिकेच्या वैदयकिय आरोग्य विभागाला प्राप्त झाले आणि त्याप्रमाणे 1लाख 2 हजार 992 इतक्या लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. 

यात प्रथम डोसचे लाभार्थी 84287 इतके असून दुस-या डोसचे लाभार्थी 18705 इतके आहेत. वसई विरार शहराची लोकसंख्या लक्षात घेता लाखो नागरिक आजही लसीकरणापासून वंचित आहेत. अपु-या लस पुरवठयामुळे लसीकरण करून घेण्यासाठी नागरिक महानगरपालिकेने स्थापित केलेल्या लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. तर काही नागरिक नजीकच्या मिरा-भाईंदर महानगरपालिकेत मुबलक लस पुरवठा असल्याने तेथे जाऊन अपले लसीकरण करून घेत आहेत. 

दरम्यान शहरांतील जास्त लोकसंख्या लक्षात घेता किमान 10 लाख डोसेस मिळाले तर 25 लाख  लोकसंख्येचे कोविड 19 पासून नियंत्रण करता येईल. पालघर जिल्हयाला होणा-या लस पुरवठया पैकी 50 टक्के लस ही वसई विरार शहर महानगरपालिकेस मिळावी जेणे करून कोविड 19 प्रादुर्भावाला आळा घालता येईल अशी मागणी आम.हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या पत्रात केली आहे. 

तसेच वय वर्षे 18 ते 44 पर्यंतचे लसीकरण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतेवेळी वेळ कमी असल्याने रजिस्ट्रेशन करताना अनेक अडचणी येत असून नोंद केलेल्या नागरिकांना देखील लस मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.तरी कृपया वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रासाठी पहिल्या टप्यात किमान 10 लाख लसीकरण डोस मंजूर करून ते पालिकेला द्यावेत अशी मागणी पत्राद्वारे आम.हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. 

ऑक्सिजन पुरवठ्यात वाढ करण्याची माजी महापौर प्रवीण शेट्टी यांची मागणी 

पालघर जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास 30 लाखाच्या मध्ये असून त्यातील 22 ते 25 लाख लोकसंख्या हि वसई विरारच्या असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्नांची संख्या वाढत आहे सद्याच्या घडीला 25 मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज वसई विरारला असताना याठिकाणी फक्त 16 ते 17 टन ऑक्सिजन  मिळत असल्याने येथील रुग्णांना  त्याचा फटका बसत आहे. तरी ऑक्सिजन पुरवठ्यात वाढ करावी अशी मागणी  प्रवीण शेट्टी यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्य यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरारUddhav Thackerayउद्धव ठाकरे