शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

वसई विरार शहर महापालिकेच्या विविध प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 11:25 PM

दिवाणमान अंबाडी रोड येथे महापालिकेने जलतरण तलाव परिसरात दुसºया मजल्यावर अत्याधुनिक वातानुकुलित आंतरराष्ट्रीय दर्जाचे शुटींग रेंजची उभारणा केलेली आहे.

नालासोपारा : वसई विरार शहर महानगरपालिकेने विकसित केलेल्या विविध प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा मंगळवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि नालासोपाऱ्याचे आमदार क्षीतिज ठाकूर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेने तामतलाव येथे अद्यावत सेमी आॅलिम्पक दर्जाचा जलतरण तलाव उभारला असून सदर जलतरण तलावासाठी साडे चार कोटी इतका खर्च करण्यात आलेला आहे. सदर प्रकल्पामध्ये जलतरण तलाव, बेबीजलतरण तलाव, इनडोअर स्पोर्टस कॉम्प्लेक्स इत्यादी कामाचा समावेश आहे.

दिवाणमान अंबाडी रोड येथे महापालिकेने जलतरण तलाव परिसरात दुसºया मजल्यावर अत्याधुनिक वातानुकुलित आंतरराष्ट्रीय दर्जाचे शुटींग रेंजची उभारणा केलेली आहे. त्यासाठी एक कोटी इतका खर्च करण्यात आलेला आहे. सदरचा शुटींग रेंजमध्ये १० मी. एयर रायफल, एयर पिस्तोल, अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाची इलेक्ट्रॉनिक स्कोअरिंग टार्गेट (थ्रीडी स्फोअर) ८ टार्गेटची सुविधा असणार आहे. वसई, पालघर, अंधेरी या परिसरामध्ये अशा प्रकारचे अत्याधुनिक शुटींग रेंज अस्तित्वात नाही. वसई विरार शहर महानगरपालिकेस श्वेतांबर स्थानिकवासी जैन संघाने आरोग्य केंद्रासाठी माणिकपूर वसई येथे सुमारे १२०० चौ.फूट जागा उपलब्ध करून दिली आहे. सदर ठिकाणी महानगरपालिकेमार्फत मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी रूग्णासाठी पूर्णवेळ फिजिशियन, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ज्ञ उपलब्ध असणार आहे. महानगरापलिकेच्या या सुविधामुळे नवघर माणिकपूर परिसरातील गोरगरिब रूग्णांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

त्यानंतर आरोग्य केंद्र लोकापर्णाचा मुख्य कार्यक्रम समाज उन्नती मंडळ, माणिकपूर येथे होणार आहे. नागरिकांनी या कार्यक्र मास उपस्थित रहावे, असे आवाहन महापौर प्रवीण शेट्टी यांनी केले आहे. तसेच सकाळी ११ वाजता सनसिटी दिवाणमान ते वसई स्टेशन अशी महानगरपालिकेची बस सेवा चालू होणार असून त्याचे उद्घाटन प्रथम महिला महापौर प्रविणा ठाकूर व माजी महापौर नारायण मानकर यांच्या हस्ते होणार आहे.

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या स्पोर्टस विषयक विकास कामांमुळे स्थानिक खेळांडूना स्थानिक पातळीवर खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धामध्ये भाग घेणे शक्य होईल. महापालिकेने गत वर्षाच्या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी व घोषणांची अंमलबजावणी विहित मुदतीत होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलेले आहे.