शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

विक्रमगडमध्ये नऊ तासांचे असह्य भारनियमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 23:46 IST

शहरात वीज वितरणात फारच गोंधळ आहे़ ग्राहकांच्या तक्रारीकडे लक्ष देण्याऐवजी व सेवेत सुधारणा करण्याऐवजी येथे अन्यायकारक भारनियमन केले जाते आहे़.

विक्रमगड : या तालुक्यात व शहरात वीज वितरणात फारच गोंधळ आहे़ ग्राहकांच्या तक्रारीकडे लक्ष देण्याऐवजी व सेवेत सुधारणा करण्याऐवजी येथे अन्यायकारक भारनियमन केले जाते आहे़. सद्यस्थितीत या तालुक्यात तीनवेळेस नऊ तासांचे भारनियन चालू आहे़ त्यामुळे येथील व्यवसाय ठप्प होत असून या भारनियमनाला कंटाळून अनेक व्यापारी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत होण्याच्या मार्गावर आहेत़ तर शेती व्यवसायालाही यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अगोदरच कमी विजेच्या दाबामुळे अनेक इलेट्रीक यंत्रे निट चालत नाही व नऊ तासांचे भारनियम असल्याने सर्वच व्यवहार ठप्प होत आहे़ त्यामुळे येथील जनता या महावितरणाच्या भारनियमनाला कंटाळलेली असून नाराजी व्यक्त करीत आहे़भाजप सरकारने निवडणूकीत संपूर्ण महाराष्टÑ भारनियमन मुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? असा सवाल वीज ग्राहक विचारीत आहेत़ या भारनियमनामुळे व्यापारी वर्गाला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असून अनेक व्यापार, उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. हातावर गुजराण करणा-यांवर तर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे़ तर सध्या परिक्षा सुरू असल्याने खेडयापाड्यातील मुलांना अभ्यास करतांना दिव्याचा आसरा घ्यावा लागत आहे. तर दिवाळीही अंधारात जाणार की काय? असा सवाल केला जातो आहे़विक्रमगड तालुक्यातील भारनियमानाचे वेळापत्रक बनवितांना स्थानिक व्यापारी वर्ग, वीज ग्राहक यांची सोय लक्षात घ्यायला हवी होती. ते न केल्याने येथील शेतकरी, बागायतदार व व्यापारीवर्गाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे़ संध्याकाळी महावितरणने तीन तासांचे भारनियमन केले आहे़ त्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरून कुणाला कोणतेही काम करता येत नाही. रस्त्यावरून वावणेही मुश्किल होऊन गेले आहे.>या तालुक्यातील एकही लोकप्रतिनिधी या समस्येकडे गांभीर्याने पाहत नाही त्यामुळे आमच्या नशिबी हा अन्याय कायमचा पूजला गेला आहे़ महावितरणने भारनियमनाचे तास कमी करावे. अगर पूर्वीप्रमाणेच दोनवेळेचे भारनियमन लागू करावे़ ९ तासांचे भारनियमन तातडीने बंद करावे, अन्यथा या गावातील व्यापार, उद्योग ठप्प होईल.- जयवंत मोतीभाई पटेल, व्यापारी, विक्रमगड