शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पालघरच्या राजकारणावर लोकसभेचाच प्रभाव, युतीत भाजपाला स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 06:14 IST

लोकसभेसाठी युतीच्या वाटाघाटीत कळीचा मुद्दा ठरलेला पालघर मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेल्याचे मानले जात असले, तरी पालघर नगरपालिका निवडणुकीचे मतदान होईपर्यंत तेथील उमेदवार जाहीर करणे आणि त्यातून भाजपातील नाराजी ओढवून घेणे शिवसेनेने टाळले आहे.

पालघर - लोकसभेसाठी युतीच्या वाटाघाटीत कळीचा मुद्दा ठरलेला पालघर मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेल्याचे मानले जात असले, तरी पालघर नगरपालिका निवडणुकीचे मतदान होईपर्यंत तेथील उमेदवार जाहीर करणे आणि त्यातून भाजपातील नाराजी ओढवून घेणे शिवसेनेने टाळले आहे. त्याचवेळी बहुजन विकास आघाडीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दलाला साथ देत लोकसभेसाठी मैत्रीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.पालघर नगरपालिकेसाठी रविवारी (ता. २४) मतदान होणार आहे. तेथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तीन उमेदवारांत अटीतटीची लढत होत आहे. दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने २६ जागांसाठी ९० उमेदवार रिंगणात आहेत.पालिकेसाठीच्या जागावाटपात भाजपाला झुकते माप देत सांभाळून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. १९९९ ला नगरपालिका अस्तित्वात येताच १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने १० जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. तेव्हा शिवसेनेला चार, भाजपाला एक, अपक्षांना तीन जागा मिळाल्या होत्या. २००४ मध्ये थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला, तर २५ जागांपैकी १७ जागा जिंकत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली. जनाधार पार्टी तीन, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तीन,भाजपा एक आणि बविआ एक अशी स्थिती होती. २००९ मध्ये शिवसेनेविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, बविआ, अपक्षांनी एकता परिषद स्थापना केली. त्यानंतर २५ पैकी शिवसेनेने १२, काँग्रेसने पाच, राष्ट्रवादीने तीन, बविआने तीन व अपक्षांना दोन जागा मिळाल्या. सत्ता स्थापनेवेळी एकता परिषदेसा दोन अपक्षांची साथ दिली. २०१४ मध्ये २८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने १७ जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादीला १०, काँग्रेसला एक जागा मिळाली.यंदा सेना-भाजपाची प्रथमच युती झाली आहे. २८ जागांपैकी १७ जागी शिवसेना, तर नऊ जागी भाजपा लढते आहे. महायुतीत सहभागी असूनही आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाला एकही जागा सोडण्यात आलेली नाही. नगराध्यक्षपद शिवसेनेला सोडण्यात आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, बविआत आघाडी झाली असून राष्ट्रवादी १५, काँग्रेस सात, बविआ पाच, तर जनता दल एका जागेवर लढत आहे.अशा घडल्या राजकीय घडामोडीशिवसेनेचा वरचष्मा असूनही मुख्यमंत्र्यांनी सभा घेत या परिसरावर आपले लक्ष असल्याचे दाखवून दिले. शिवसेनेच्या प्रचाराची धुरा आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, तर भाजपाची राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी प्रचारात हजेरी लावली नाही. बविआने मात्र लोकसभेवर लक्ष केंद्रित करत हितेंद्र ठाकूर यांच्या मदतीने प्रचाराची धुरा सांभाळली.

टॅग्स :palgharपालघरElectionनिवडणूक