शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पालघरच्या राजकारणावर लोकसभेचाच प्रभाव, युतीत भाजपाला स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 06:14 IST

लोकसभेसाठी युतीच्या वाटाघाटीत कळीचा मुद्दा ठरलेला पालघर मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेल्याचे मानले जात असले, तरी पालघर नगरपालिका निवडणुकीचे मतदान होईपर्यंत तेथील उमेदवार जाहीर करणे आणि त्यातून भाजपातील नाराजी ओढवून घेणे शिवसेनेने टाळले आहे.

पालघर - लोकसभेसाठी युतीच्या वाटाघाटीत कळीचा मुद्दा ठरलेला पालघर मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेल्याचे मानले जात असले, तरी पालघर नगरपालिका निवडणुकीचे मतदान होईपर्यंत तेथील उमेदवार जाहीर करणे आणि त्यातून भाजपातील नाराजी ओढवून घेणे शिवसेनेने टाळले आहे. त्याचवेळी बहुजन विकास आघाडीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दलाला साथ देत लोकसभेसाठी मैत्रीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.पालघर नगरपालिकेसाठी रविवारी (ता. २४) मतदान होणार आहे. तेथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तीन उमेदवारांत अटीतटीची लढत होत आहे. दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने २६ जागांसाठी ९० उमेदवार रिंगणात आहेत.पालिकेसाठीच्या जागावाटपात भाजपाला झुकते माप देत सांभाळून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. १९९९ ला नगरपालिका अस्तित्वात येताच १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने १० जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. तेव्हा शिवसेनेला चार, भाजपाला एक, अपक्षांना तीन जागा मिळाल्या होत्या. २००४ मध्ये थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला, तर २५ जागांपैकी १७ जागा जिंकत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली. जनाधार पार्टी तीन, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तीन,भाजपा एक आणि बविआ एक अशी स्थिती होती. २००९ मध्ये शिवसेनेविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, बविआ, अपक्षांनी एकता परिषद स्थापना केली. त्यानंतर २५ पैकी शिवसेनेने १२, काँग्रेसने पाच, राष्ट्रवादीने तीन, बविआने तीन व अपक्षांना दोन जागा मिळाल्या. सत्ता स्थापनेवेळी एकता परिषदेसा दोन अपक्षांची साथ दिली. २०१४ मध्ये २८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने १७ जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादीला १०, काँग्रेसला एक जागा मिळाली.यंदा सेना-भाजपाची प्रथमच युती झाली आहे. २८ जागांपैकी १७ जागी शिवसेना, तर नऊ जागी भाजपा लढते आहे. महायुतीत सहभागी असूनही आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाला एकही जागा सोडण्यात आलेली नाही. नगराध्यक्षपद शिवसेनेला सोडण्यात आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, बविआत आघाडी झाली असून राष्ट्रवादी १५, काँग्रेस सात, बविआ पाच, तर जनता दल एका जागेवर लढत आहे.अशा घडल्या राजकीय घडामोडीशिवसेनेचा वरचष्मा असूनही मुख्यमंत्र्यांनी सभा घेत या परिसरावर आपले लक्ष असल्याचे दाखवून दिले. शिवसेनेच्या प्रचाराची धुरा आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, तर भाजपाची राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी प्रचारात हजेरी लावली नाही. बविआने मात्र लोकसभेवर लक्ष केंद्रित करत हितेंद्र ठाकूर यांच्या मदतीने प्रचाराची धुरा सांभाळली.

टॅग्स :palgharपालघरElectionनिवडणूक