शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सातपाटीच्या बंधाऱ्यांची तात्काळ दुरुस्ती करा! उच्च न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:48 IST

सातपाटी येथील बंधा-यांची दुरावस्था झाल्याने समुद्राच्या उधाणाचे पाणी गावात शिरून ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची वस्तुस्थिती पहिल्या नंतर तात्काळ बंधाºयाची दुरु स्ती करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्यशासनाला देत प्रशासनाला फटकारले.

पालघर : सातपाटी येथील बंधा-यांची दुरावस्था झाल्याने समुद्राच्या उधाणाचे पाणी गावात शिरून ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची वस्तुस्थिती पहिल्या नंतर तात्काळ बंधाºयाची दुरु स्ती करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्यशासनाला देत प्रशासनाला फटकारले.राज्यातील ७२० किमीच्या प्रदीर्घ किनाºयावर वसलेल्या मच्छिमार समाजाची घरे, शेती यांची होणारी धूप रोखण्यासाठी ग्रामपंचायती, संस्था, लोकप्रतिनिधी यांच्या मागणी वरून पतन यांत्रिकी विभागा कडून रायगड, मुंबई आदींसह पालघर जिल्ह्यातील सातपाटी, नवापूर, एडवण, तारापूर, कळंब, अर्नाळा, नरपड, तडीयाळे, गुंगवाडा आदी गावांना धूपप्रतिबंधक बंधाºयांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाºया काही संस्थांनी हरित लवादात दाखल केलेल्या याचिकेचा फटका या मंजूर बंधाºयांना बसत सीआरझेडशी संबंधित सर्व परवानग्या रोखण्याचे आदेश लवादाने दिले होते. त्यामुळे सर्व बंधाºयासह सातपाटी बंधाºयालाही याचा फटका बसला होता. सातपाटी येथे १५ वर्षांपूर्वी बांधलेल्या बंधाºयांची दुरावस्था झाल्याने अनेक ठिकाणी भगदाडे पडली होती. १३ जुलै पासून समुद्राच्या महाकाय लाटांचा तडाखा किनाºयावरील अनेक भागाला बसून ३५० घराना या आपत्तीचा फटका बसला होता. ड्रोन कॅमेºयाच्या साहाय्याने सातपाटी गावाला बसलेल्या या आपत्तीच्या फटक्यांचे भीषण वास्तव जगा समोर आले होते.हरितलवादाच्या आदेशामुळे शासन, प्रशासनाचे हात बांधले जात नवीन बंधारा उभारण्याचे काम होण्याची शक्यता धूसर दिसत असल्याने सातपाटी ग्रामपंचायत, वनशक्ती पब्लिक ट्रस्ट आणि दोन संस्थांनी उच्चन्यायालायत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी दरम्यान ड्रोन कॅमºयााचे फोटोग्राफस न्यायालयापुढे सादर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने लोकांच्या जीविताचा महत्वाचा गंभीर प्रश्न असल्याने बंधाºयाच्या दुरु स्तीचे काम तात्काळ हाती घेण्याचे आदेश शासनाला दिले. न्यायालयापुढे या याचिकेच्या पुढील सुनावणी दरम्यान नवीन बंधारा बांधण्या संधर्भात निर्णय देण्यात येईल असेही न्यायालयाने पुढे सांगितले.राज्याच्या पर्यावरण विभागाने आपले म्हणणे न्यायालयात मांडताना बंधाºयाच्या दुरु स्तीबाबत आम्ही पतन अभियांत्रिकी विभागाला निर्देश देऊ असे सांगितले. तर किनारा व्यवस्थापन समितीच्या परवानगीची आवश्यकता असल्यास न्यायालयाच्या निर्देशानुसार त्या परवानग्या देण्यात येईल असे पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर ह्यांनी पत्रकारांना सांगितले. सातपाटीच्या बंधाºयांची दुरु स्ती होणार असली तरी आमच्या गावासमोरील मंजूर बंधाºयाचे काय होणार?असा प्रश्न अन्य गावे उपस्थित करू लागली आहेत.सर्व परवानग्या रोखल्यापर्यावरण संरक्षणासाठी काम करणाºया काही संस्थांनी हरित लवादात दाखल केलेल्या याचिकेचा फटका या मंजूर बंधाºयांना बसत सीआरझेडशी संबंधित सर्व परवानग्या रोखण्याचे आदेश लवादाने दिले होते.जिल्ह्यातील पाणथळ जमिनीवर मोठे भराव घालून काँक्र ीट ची जंगले उभी रहात असून खारफुटी ची मोºया प्रमाणात कत्तल केली जात आहे. याचा विपरीत परिणाम होत समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून हे पाणी गाव, शहरात घुसत आहे.प्रो. भूषण भोईर, पालघर.

टॅग्स :Courtन्यायालय