शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

‘तुम्ही येथून गेला नाहीत, तर गोळ्या घालू!’; पोलिसांचा खलाशांना दम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 06:16 IST

स्थानिकांकडून दगडफेक, पोलिसांनी कापले ट्रॉलर्सचे दोरखंड

हितेन नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : गुजरातमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील सुमारे ५५० खलाशी कामगारांना कुणी वालीच उरलेला नाही. रात्रीच्या अंधारात गुजरातच्या स्थानिकांकडून ट्रॉलर्सवर अमानुषपणे दगडफेक केली गेली, तर त्या ट्रॉलर्सचे दोरखंड पोलिसांनी कापून त्यांना पुन्हा भुकेलेल्या अवस्थेत माघारी वेरावल बंदरात हाकलून लावले. ‘तुम्ही येथून गेला नाही, तर गोळ्या घालू’ असा दमही पोलिसांनी भरल्याचे एका कामगाराने सांगितले.पोरबंदर, ओखा, वेरावल आदी गुजरातच्या विविध बंदरांतून ७ महिन्याच्या कालावधीनंतर आपल्या घरी परतण्यासाठी सुमारे १ हजार ८०० खलाशी उंबरगाव येथे आल्यानंतर रविवारी फक्त गुजरात, दमण व सेलवासा येथील खलाशांना ट्रॉलर्सवरून उतरविण्यात आले. त्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करून घरी पाठवण्यात आले. परंतु महाराष्ट्रातील खलाशांना उतरवण्यास गुजरात सरकार व पोलिसांनी नकार देत त्यांना जबरदस्तीने ट्रॉलर्सवर रोखले. ‘लोकमत’ने पालकमंत्री दादासाहेब भुसे यांना मोबाईल, स्वीय सचिव, मेसेजद्वारे अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. खासदार राजेंद्र गावित, आमदार हितेंद्र ठाकूर, आ. रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ.क्कैलास शिंदे आदींशी संपर्क साधून जिल्ह्यातील ५५० खलाशांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याबाबत वारंवार कळवूनही स्थानिक कामगारांना आणण्यासाठी सर्वांना अपयश आले. मोठ्या आशेने हे कामगार लोकप्रतिनिधी व प्रशासन आपल्यासाठी काहीतरी करतील अशी वाट पाहत होते. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांना दिलासा देणारा निर्णय न आल्याने त्यांचे मनोधैर्य खचले होते. यादरम्यान २-३ कामगारांना फिटही आल्याने बेशुद्धावस्थेतील कामगारांना योग्य उपचारही गुजरातच्या आरोग्य विभागाकडून न मिळाल्याने कांदा फोडून त्यांच्या नाकाला लावून त्यांना शुद्धीवर आणण्यात आल्याची माहिती एका कामगाराने आपल्या मोबाईलवरून स्थानिकांना दिली.पालकमंत्री ‘नॉट रिचेबल’पालघर जिल्ह्याला उशिराने भेट देणाऱ्या कृषिमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या लेटलतीफ कारभाराचा फटका या कामगारांनाही बसला. त्यांना रविवारी कॉल करून मेसेज टाकून त्यांच्या सचिवांशी बोलून परिस्थितीचे गांभीर्य समजावूनही त्यांनी व्यवस्थेविषयी सकारात्मक निर्णय घेतला नाही. सोमवारी वसई येथे पालक मंत्र्यांशी मोबाइलवरून या परिस्थितीबाबत बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या सचिवांनी हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही.आज अन्य राज्यातून पालघर जिल्ह्यात रोजगारासाठी आलेल्या १५ ते २० हजार कामगारांच्या राहण्याचा, आरोग्य तपासणीचा, जेवणाचा खर्च मागील अनेक दिवसांपासून राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन उचलीत असताना ७ महिन्यांपासून कुटुंबापासून लांब असलेल्या आणि आपल्या घरापासून १० ते १२ किमी अंतरावर थांबलेल्या ५५० स्थानिक कामगारांसाठी पालकमंत्री काहीही उपाययोजना आखू न शकल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Gujaratगुजरात