शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अंबाडी रेल्वे उड्डाण पुलावरून वाहन नेल्यास २००चा ‘झब्बू’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 22:41 IST

अचानक कारवाई झाल्याने वाहनचालक संतप्त : दंडाची वसुली जनतेच्या सुरक्षिततेसाठीच

वसई : जुन्या अंबाडी पुलाच्या दुरूस्तीसाठी मुहूर्त मिळाल्यानंतर रेल्वेकडून पुलावरील भार काढण्यास १३ आॅक्टोबर पासून सुरवात करण्यात आली होती. मात्र थातूमातूर काम केल्यानंतर पुन्हा या पुलाच्या डागडुजीचे काम रखडले आहे. नवीन वर्षात सोमवारपासून (दि.7) या पूलावरून वाहने चालविण्या-यांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या या पुलावरून वाहतूक करण्यास बंदी असतानाही दुचाकी व चारचाकी वाहनचालक आपली वाहने सर्रास पूलावरून नेत आहेत .वाहतूक पोलिसही या गोष्टी कडे दुर्लक्ष करीत होते. १३आॅक्टोबर पासून जुन्या अंबाडी रोड रेल्वे उड्डाणपूलावरील पालिकेच्या जलवाहिन्या, महावितणाच्या केबल्स, खाजगी मोबाईल कंपन्यांच्या केबल्स काढून टाकण्यास सुरवात झाली. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुरूस्तीचा निधी येई पर्यंत दुरस्तीचे काम सुरू केले जाणार असल्याचे रेल्वेने सांगितले होते. या पुलाच्या पश्चिम दिशेकडील लोखंडी बॅरिकेडस काढण्यात आल्यामुळे सुरवातीला दुचाकी वाहनचालकांनी या पुलावरून वाहने नेण्यास सुरूवात केली. गाड्या नेतांना वाहतूक पोलिस अटकाव करत नसल्याचे पाहून चारचाकी वाहनेही या पुलावरून राजरोसपणे नेत होते. मात्र सोमवारपासून पुलाच्या पश्चिम दिशेकडून वाहतूक पोलिसांनी बॅरिकेडस लाऊन पूलावरून वाहने चालवणा-या चालकांना २०० रुपये दंड करण्यास सुरूवात केली आहे. अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वेने सर्व धोकादायक पुल बंद केले होते. त्या पुलांची पाहणी करून ते दुरूस्त केले जाणार होते. वसईच्या अंबाडी रोडवरील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा ३८ वर्षाचा पूल बंद करण्यात आला होता. त्यानंतर वाहतूक नव्या पूलावरून वळविण्यात येत आहे. मात्र अनेक महिने उलटूनही जुन्या पुलाची दुरूस्ती सुरू न झाल्याने नागरिकाकडून संताप व्यक्त होत होता.दंड न करता फक्त समज देऊन सोडा!च्अनेक दुचाकीस्वारांची वाहतूक पोलिसांसोबत तू तू मै मै सुरू होती. एकेरी वाहतूक प्रवेश बंद मार्गावरून वाहने नेल्यामूळे दोनशे रूपये दंड आकारला जात असतांना, या उड्डाणपूलाच्या पूर्वेकडून, औद्योगिक वसाहतीकडून येणाऱ्या मार्गावर कोणताही फलक लावण्यात आलेला नव्हता, तसेच अवैधरीत्या गॅरेजवाल्यांनी पार्किंग केलेल्या गाड्यांवर मात्र वाहतूक पोलिसांची खास मर्जी असल्याचा आरोप आता वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. रायझींग सप्ताहात तरी दंड न करता समज देऊन सोडावे असेही म्हटले गेले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार