शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

अंबाडी रेल्वे उड्डाण पुलावरून वाहन नेल्यास २००चा ‘झब्बू’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 22:41 IST

अचानक कारवाई झाल्याने वाहनचालक संतप्त : दंडाची वसुली जनतेच्या सुरक्षिततेसाठीच

वसई : जुन्या अंबाडी पुलाच्या दुरूस्तीसाठी मुहूर्त मिळाल्यानंतर रेल्वेकडून पुलावरील भार काढण्यास १३ आॅक्टोबर पासून सुरवात करण्यात आली होती. मात्र थातूमातूर काम केल्यानंतर पुन्हा या पुलाच्या डागडुजीचे काम रखडले आहे. नवीन वर्षात सोमवारपासून (दि.7) या पूलावरून वाहने चालविण्या-यांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या या पुलावरून वाहतूक करण्यास बंदी असतानाही दुचाकी व चारचाकी वाहनचालक आपली वाहने सर्रास पूलावरून नेत आहेत .वाहतूक पोलिसही या गोष्टी कडे दुर्लक्ष करीत होते. १३आॅक्टोबर पासून जुन्या अंबाडी रोड रेल्वे उड्डाणपूलावरील पालिकेच्या जलवाहिन्या, महावितणाच्या केबल्स, खाजगी मोबाईल कंपन्यांच्या केबल्स काढून टाकण्यास सुरवात झाली. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुरूस्तीचा निधी येई पर्यंत दुरस्तीचे काम सुरू केले जाणार असल्याचे रेल्वेने सांगितले होते. या पुलाच्या पश्चिम दिशेकडील लोखंडी बॅरिकेडस काढण्यात आल्यामुळे सुरवातीला दुचाकी वाहनचालकांनी या पुलावरून वाहने नेण्यास सुरूवात केली. गाड्या नेतांना वाहतूक पोलिस अटकाव करत नसल्याचे पाहून चारचाकी वाहनेही या पुलावरून राजरोसपणे नेत होते. मात्र सोमवारपासून पुलाच्या पश्चिम दिशेकडून वाहतूक पोलिसांनी बॅरिकेडस लाऊन पूलावरून वाहने चालवणा-या चालकांना २०० रुपये दंड करण्यास सुरूवात केली आहे. अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वेने सर्व धोकादायक पुल बंद केले होते. त्या पुलांची पाहणी करून ते दुरूस्त केले जाणार होते. वसईच्या अंबाडी रोडवरील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा ३८ वर्षाचा पूल बंद करण्यात आला होता. त्यानंतर वाहतूक नव्या पूलावरून वळविण्यात येत आहे. मात्र अनेक महिने उलटूनही जुन्या पुलाची दुरूस्ती सुरू न झाल्याने नागरिकाकडून संताप व्यक्त होत होता.दंड न करता फक्त समज देऊन सोडा!च्अनेक दुचाकीस्वारांची वाहतूक पोलिसांसोबत तू तू मै मै सुरू होती. एकेरी वाहतूक प्रवेश बंद मार्गावरून वाहने नेल्यामूळे दोनशे रूपये दंड आकारला जात असतांना, या उड्डाणपूलाच्या पूर्वेकडून, औद्योगिक वसाहतीकडून येणाऱ्या मार्गावर कोणताही फलक लावण्यात आलेला नव्हता, तसेच अवैधरीत्या गॅरेजवाल्यांनी पार्किंग केलेल्या गाड्यांवर मात्र वाहतूक पोलिसांची खास मर्जी असल्याचा आरोप आता वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. रायझींग सप्ताहात तरी दंड न करता समज देऊन सोडावे असेही म्हटले गेले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार