शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अंबाडी रेल्वे उड्डाण पुलावरून वाहन नेल्यास २००चा ‘झब्बू’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 22:41 IST

अचानक कारवाई झाल्याने वाहनचालक संतप्त : दंडाची वसुली जनतेच्या सुरक्षिततेसाठीच

वसई : जुन्या अंबाडी पुलाच्या दुरूस्तीसाठी मुहूर्त मिळाल्यानंतर रेल्वेकडून पुलावरील भार काढण्यास १३ आॅक्टोबर पासून सुरवात करण्यात आली होती. मात्र थातूमातूर काम केल्यानंतर पुन्हा या पुलाच्या डागडुजीचे काम रखडले आहे. नवीन वर्षात सोमवारपासून (दि.7) या पूलावरून वाहने चालविण्या-यांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या या पुलावरून वाहतूक करण्यास बंदी असतानाही दुचाकी व चारचाकी वाहनचालक आपली वाहने सर्रास पूलावरून नेत आहेत .वाहतूक पोलिसही या गोष्टी कडे दुर्लक्ष करीत होते. १३आॅक्टोबर पासून जुन्या अंबाडी रोड रेल्वे उड्डाणपूलावरील पालिकेच्या जलवाहिन्या, महावितणाच्या केबल्स, खाजगी मोबाईल कंपन्यांच्या केबल्स काढून टाकण्यास सुरवात झाली. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुरूस्तीचा निधी येई पर्यंत दुरस्तीचे काम सुरू केले जाणार असल्याचे रेल्वेने सांगितले होते. या पुलाच्या पश्चिम दिशेकडील लोखंडी बॅरिकेडस काढण्यात आल्यामुळे सुरवातीला दुचाकी वाहनचालकांनी या पुलावरून वाहने नेण्यास सुरूवात केली. गाड्या नेतांना वाहतूक पोलिस अटकाव करत नसल्याचे पाहून चारचाकी वाहनेही या पुलावरून राजरोसपणे नेत होते. मात्र सोमवारपासून पुलाच्या पश्चिम दिशेकडून वाहतूक पोलिसांनी बॅरिकेडस लाऊन पूलावरून वाहने चालवणा-या चालकांना २०० रुपये दंड करण्यास सुरूवात केली आहे. अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वेने सर्व धोकादायक पुल बंद केले होते. त्या पुलांची पाहणी करून ते दुरूस्त केले जाणार होते. वसईच्या अंबाडी रोडवरील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा ३८ वर्षाचा पूल बंद करण्यात आला होता. त्यानंतर वाहतूक नव्या पूलावरून वळविण्यात येत आहे. मात्र अनेक महिने उलटूनही जुन्या पुलाची दुरूस्ती सुरू न झाल्याने नागरिकाकडून संताप व्यक्त होत होता.दंड न करता फक्त समज देऊन सोडा!च्अनेक दुचाकीस्वारांची वाहतूक पोलिसांसोबत तू तू मै मै सुरू होती. एकेरी वाहतूक प्रवेश बंद मार्गावरून वाहने नेल्यामूळे दोनशे रूपये दंड आकारला जात असतांना, या उड्डाणपूलाच्या पूर्वेकडून, औद्योगिक वसाहतीकडून येणाऱ्या मार्गावर कोणताही फलक लावण्यात आलेला नव्हता, तसेच अवैधरीत्या गॅरेजवाल्यांनी पार्किंग केलेल्या गाड्यांवर मात्र वाहतूक पोलिसांची खास मर्जी असल्याचा आरोप आता वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. रायझींग सप्ताहात तरी दंड न करता समज देऊन सोडावे असेही म्हटले गेले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार