शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पाऊस न थांबल्यास भात शेतीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:44 IST

गेल्या दोन महिन्यामध्ये भातशेतीला पोषक असा पाऊस होत असल्याने शेती बहरलेली असतांनाच गेल्या काही दिवसांपासून पावसाने आपली संततधार सुरुच ठेवल्याने नदी, नाले तुडूंब वाहू लागल्याने भातशेती पाण्यामध्ये जाऊ लागली

विक्रमगड : गेल्या दोन महिन्यामध्ये भातशेतीला पोषक असा पाऊस होत असल्याने शेती बहरलेली असतांनाच गेल्या काही दिवसांपासून पावसाने आपली संततधार सुरुच ठेवल्याने नदी, नाले तुडूंब वाहू लागल्याने भातशेती पाण्यामध्ये जाऊ लागली आहे़ जर पाऊस असाच कोसळत राहिला तर सतत पाण्याखाली राहील्याने भाताचे पीक कुजण्याची व त्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे ेक़ारण हाळव्या भाताची कणसे तयार होऊ लागली आहेत. जास्त पावसाने ती निवसवण्याची शक्यता आहे़ गेल्या आठवडाभरामध्ये विक्रमगड सर्कलमध्ये ३७६ मि़ मि तर तलवाडा सर्कलमध्ये ३२६ मि़ मि पावसाची नोंद करण्यात आली आहे़ आतापर्यत तालुक्यात ३००० मि़ मि पावसाची नोंद झाली आहे़शेती योग्य असा पाऊस झाल्याने गेल्या आठवड्यात सर्वत्र भातपिके बहरलेली होती.त्यांना अपेक्षित पोषक वातावरण मिळत होते़ विक्रमगड तालुक्यात समाधानकारक पाउस झाल्यान व नंतर त्याने उघडीप दिली तरी शेतक-यांनी भातमोसमातच शेतीचे कामे व लागवड केली. त्यामुळे सध्या या पिकाची कणसे भरली जात आहेत. या काळात उघडीपीची आणि उन्हाची गरज असते. त्याऐवजी सतत पाऊस पडत राहिला तर ही कणसे भरली जात नाहीत. त्यातील दाणे पोचट राहतात. आता भातपिकास भक्त शिडपणाची आवश्यकता असल्याने अधिक पाऊस धोकादायक ठरणारा आहे.गत आठवड्यापर्यंत सध्या भातपिकाची स्थिती उत्तम असून शेतकरी जरी सुखावला असला तरी गणरायाच्या सोबत आगमन करणाºया पावसाने संततधार सुरू ठेवल्याने गेल्याकाही वर्षात जसे भातपिकाचे नुकसान झाले होते तशीच परिस्थिती आताही निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़भाताला पोटरी येऊन कणसे तयार होऊ लागली आहेत़ सध्या भातशेतीचा कालावधी हा पोटरीचा आहे़ भाताच्ंया रोपांना फुले येत आहेत़ मात्र नेमका याच कालावधीत पाउस लांबल्यास पुढील प्रक्रिया थांबून पावसाच्या पाण्याने ही फुले कुजण्याची शक्यता असते त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत येऊ शकतो़ म्हणूनच आता थांब रे बाबा, अशी आळवणी शेतकरी करीत आहेत.