शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

संततधार पाऊस न थांबल्यास भात शेतीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:44 IST

गेल्या दोन महिन्यामध्ये भातशेतीला पोषक असा पाऊस होत असल्याने शेती बहरलेली असतांनाच गेल्या काही दिवसांपासून पावसाने आपली संततधार सुरुच ठेवल्याने नदी, नाले तुडूंब वाहू लागल्याने भातशेती पाण्यामध्ये जाऊ लागली

विक्रमगड : गेल्या दोन महिन्यामध्ये भातशेतीला पोषक असा पाऊस होत असल्याने शेती बहरलेली असतांनाच गेल्या काही दिवसांपासून पावसाने आपली संततधार सुरुच ठेवल्याने नदी, नाले तुडूंब वाहू लागल्याने भातशेती पाण्यामध्ये जाऊ लागली आहे़ जर पाऊस असाच कोसळत राहिला तर सतत पाण्याखाली राहील्याने भाताचे पीक कुजण्याची व त्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे ेक़ारण हाळव्या भाताची कणसे तयार होऊ लागली आहेत. जास्त पावसाने ती निवसवण्याची शक्यता आहे़ गेल्या आठवडाभरामध्ये विक्रमगड सर्कलमध्ये ३७६ मि़ मि तर तलवाडा सर्कलमध्ये ३२६ मि़ मि पावसाची नोंद करण्यात आली आहे़ आतापर्यत तालुक्यात ३००० मि़ मि पावसाची नोंद झाली आहे़शेती योग्य असा पाऊस झाल्याने गेल्या आठवड्यात सर्वत्र भातपिके बहरलेली होती.त्यांना अपेक्षित पोषक वातावरण मिळत होते़ विक्रमगड तालुक्यात समाधानकारक पाउस झाल्यान व नंतर त्याने उघडीप दिली तरी शेतक-यांनी भातमोसमातच शेतीचे कामे व लागवड केली. त्यामुळे सध्या या पिकाची कणसे भरली जात आहेत. या काळात उघडीपीची आणि उन्हाची गरज असते. त्याऐवजी सतत पाऊस पडत राहिला तर ही कणसे भरली जात नाहीत. त्यातील दाणे पोचट राहतात. आता भातपिकास भक्त शिडपणाची आवश्यकता असल्याने अधिक पाऊस धोकादायक ठरणारा आहे.गत आठवड्यापर्यंत सध्या भातपिकाची स्थिती उत्तम असून शेतकरी जरी सुखावला असला तरी गणरायाच्या सोबत आगमन करणाºया पावसाने संततधार सुरू ठेवल्याने गेल्याकाही वर्षात जसे भातपिकाचे नुकसान झाले होते तशीच परिस्थिती आताही निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़भाताला पोटरी येऊन कणसे तयार होऊ लागली आहेत़ सध्या भातशेतीचा कालावधी हा पोटरीचा आहे़ भाताच्ंया रोपांना फुले येत आहेत़ मात्र नेमका याच कालावधीत पाउस लांबल्यास पुढील प्रक्रिया थांबून पावसाच्या पाण्याने ही फुले कुजण्याची शक्यता असते त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत येऊ शकतो़ म्हणूनच आता थांब रे बाबा, अशी आळवणी शेतकरी करीत आहेत.