शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
2
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
3
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
4
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
5
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
6
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
7
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
8
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
9
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
10
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
11
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
12
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
13
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
14
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
15
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
16
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
17
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
18
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
19
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
20
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी

संततधार पाऊस न थांबल्यास भात शेतीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:44 IST

गेल्या दोन महिन्यामध्ये भातशेतीला पोषक असा पाऊस होत असल्याने शेती बहरलेली असतांनाच गेल्या काही दिवसांपासून पावसाने आपली संततधार सुरुच ठेवल्याने नदी, नाले तुडूंब वाहू लागल्याने भातशेती पाण्यामध्ये जाऊ लागली

विक्रमगड : गेल्या दोन महिन्यामध्ये भातशेतीला पोषक असा पाऊस होत असल्याने शेती बहरलेली असतांनाच गेल्या काही दिवसांपासून पावसाने आपली संततधार सुरुच ठेवल्याने नदी, नाले तुडूंब वाहू लागल्याने भातशेती पाण्यामध्ये जाऊ लागली आहे़ जर पाऊस असाच कोसळत राहिला तर सतत पाण्याखाली राहील्याने भाताचे पीक कुजण्याची व त्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे ेक़ारण हाळव्या भाताची कणसे तयार होऊ लागली आहेत. जास्त पावसाने ती निवसवण्याची शक्यता आहे़ गेल्या आठवडाभरामध्ये विक्रमगड सर्कलमध्ये ३७६ मि़ मि तर तलवाडा सर्कलमध्ये ३२६ मि़ मि पावसाची नोंद करण्यात आली आहे़ आतापर्यत तालुक्यात ३००० मि़ मि पावसाची नोंद झाली आहे़शेती योग्य असा पाऊस झाल्याने गेल्या आठवड्यात सर्वत्र भातपिके बहरलेली होती.त्यांना अपेक्षित पोषक वातावरण मिळत होते़ विक्रमगड तालुक्यात समाधानकारक पाउस झाल्यान व नंतर त्याने उघडीप दिली तरी शेतक-यांनी भातमोसमातच शेतीचे कामे व लागवड केली. त्यामुळे सध्या या पिकाची कणसे भरली जात आहेत. या काळात उघडीपीची आणि उन्हाची गरज असते. त्याऐवजी सतत पाऊस पडत राहिला तर ही कणसे भरली जात नाहीत. त्यातील दाणे पोचट राहतात. आता भातपिकास भक्त शिडपणाची आवश्यकता असल्याने अधिक पाऊस धोकादायक ठरणारा आहे.गत आठवड्यापर्यंत सध्या भातपिकाची स्थिती उत्तम असून शेतकरी जरी सुखावला असला तरी गणरायाच्या सोबत आगमन करणाºया पावसाने संततधार सुरू ठेवल्याने गेल्याकाही वर्षात जसे भातपिकाचे नुकसान झाले होते तशीच परिस्थिती आताही निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़भाताला पोटरी येऊन कणसे तयार होऊ लागली आहेत़ सध्या भातशेतीचा कालावधी हा पोटरीचा आहे़ भाताच्ंया रोपांना फुले येत आहेत़ मात्र नेमका याच कालावधीत पाउस लांबल्यास पुढील प्रक्रिया थांबून पावसाच्या पाण्याने ही फुले कुजण्याची शक्यता असते त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत येऊ शकतो़ म्हणूनच आता थांब रे बाबा, अशी आळवणी शेतकरी करीत आहेत.