शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

भाडे मान्य नसेल तर रिक्षात बसू नका, दरवाढीला आरटीओने आक्षेप घेतल्यानंतरही रिक्षाचालकांची मनमानी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 03:49 IST

वाहतूक पोलीस आणि आरटीओचे आर्थिक हितसंबंध जपणाºया रिक्षाचालकांनी आता मनमानी भाडेवाढ करून प्रवाशांना वेठीस धरले आहे.

वसई : वाहतूक पोलीस आणि आरटीओचे आर्थिक हितसंबंध जपणाºया रिक्षाचालकांनी आता मनमानी भाडेवाढ करून प्रवाशांना वेठीस धरले आहे. भाडे परवडत नसेल तर रिक्षात बसू नका असा फलकच रिक्षा चालकांनी नायगावमध्ये लावला आहे. त्यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये वादावादी होऊ लागली आहे.वसईतील रिक्षाचालक कोणतेही नियम पाळत नाहीत. एकही अधिकृत रिक्षा स्टँड नाही. अनधिकृत रिक्षांची संख्याही प्रचंड आहे. एका स्टँडवर एकावेळी असंख्य रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे वाहतूककोंडी होत असते. त्यातच शेअर रिक्षाच्या नावाखाली पाच-पाच प्रवाशांची वाहतूक एकाच रिक्षातून केली जाते. त्याचबरोबर मनमानी भाडेही आकारले जात असल्याचे प्रकार अ़नेकदा घडले आहेत. मात्र, वाहतूक पोलीस आणि आरटीओशी आर्थिक हितसंबंध असल्याने रिक्षा चालकांची ही मनमानी आणि दादागिरी वाढू लागली आहे.नायगाव पश्चिमेला असाच नवा वाद रिक्षाचालकांनी उकरून काढला आहे. चालकांनी १५ सप्टेंबरपासून भाड्यात अचानक बेकायदेशीर वाढ केली आहे. याप्रकरणी प्रवाशांच्या तक्रारीवरून रिक्षाचालक, आरटीओ, पोलीस आणि प्रवाशांची बैठकही झाली. यात आरटीओने भाडेवाढ बेकायदेशीर ठरवत सर्वेक्षण होऊन भाडेदर निश्चित केले जातील. तोपर्यंत जुन्या दराने भाडे आकारा असे आदेश त्यावरून प्रवाशी आणि रिक्षाचालकांमध्ये वाद होऊ लागले आहेत.चालकांनी आरटीओचे आदेश धुडकावत वाढीव दरानुसार नुसार भाडे वसूली सुरु ठेवली आहे. वाढीव भाडे न देणाºया प्रवाशांवर रिक्षाचालक टोळीने दादागिरी करीत असून प्रसंगी धक्काबुकीही करीत आहेत. इतकेच नाही तर रिक्षाचालकांनी वाढीव दरानेच भाडे द्यावे लागेल. ज्यांना ते परवडत असेल. त्यांनी रिक्षात बसावे. ज्यांना परवडत नसेल त्यांनी रिक्षात बसू नये कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये, असे फर्मानच रिक्षा चालकांनी फलकाद्वारे सोडले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार प्रवाशांनी आरटीओ आणि पोलिसांच्या नजरेस आणून दिल्यानंतरही त्यांनी कोणतेही कारवाई केलेली नाही. त्यामुळे रिक्षाचालकांनी मनमानी भाडे आकारणी सुरुच ठेवून प्रवाशांना वेठीस धरले आहे. दरम्यान, रिक्शा चालकांच्या या दादागिरीविरोधात आता वसईतून प्रवाशांनी सह्यांची मोहिम सुरू केली आहे. तसेच ईमेल द्वारे रिक्षाचालकांविरोधात तक्रार केल्या जात आहेत.