शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भाडे मान्य नसेल तर रिक्षात बसू नका, दरवाढीला आरटीओने आक्षेप घेतल्यानंतरही रिक्षाचालकांची मनमानी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 03:49 IST

वाहतूक पोलीस आणि आरटीओचे आर्थिक हितसंबंध जपणाºया रिक्षाचालकांनी आता मनमानी भाडेवाढ करून प्रवाशांना वेठीस धरले आहे.

वसई : वाहतूक पोलीस आणि आरटीओचे आर्थिक हितसंबंध जपणाºया रिक्षाचालकांनी आता मनमानी भाडेवाढ करून प्रवाशांना वेठीस धरले आहे. भाडे परवडत नसेल तर रिक्षात बसू नका असा फलकच रिक्षा चालकांनी नायगावमध्ये लावला आहे. त्यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये वादावादी होऊ लागली आहे.वसईतील रिक्षाचालक कोणतेही नियम पाळत नाहीत. एकही अधिकृत रिक्षा स्टँड नाही. अनधिकृत रिक्षांची संख्याही प्रचंड आहे. एका स्टँडवर एकावेळी असंख्य रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे वाहतूककोंडी होत असते. त्यातच शेअर रिक्षाच्या नावाखाली पाच-पाच प्रवाशांची वाहतूक एकाच रिक्षातून केली जाते. त्याचबरोबर मनमानी भाडेही आकारले जात असल्याचे प्रकार अ़नेकदा घडले आहेत. मात्र, वाहतूक पोलीस आणि आरटीओशी आर्थिक हितसंबंध असल्याने रिक्षा चालकांची ही मनमानी आणि दादागिरी वाढू लागली आहे.नायगाव पश्चिमेला असाच नवा वाद रिक्षाचालकांनी उकरून काढला आहे. चालकांनी १५ सप्टेंबरपासून भाड्यात अचानक बेकायदेशीर वाढ केली आहे. याप्रकरणी प्रवाशांच्या तक्रारीवरून रिक्षाचालक, आरटीओ, पोलीस आणि प्रवाशांची बैठकही झाली. यात आरटीओने भाडेवाढ बेकायदेशीर ठरवत सर्वेक्षण होऊन भाडेदर निश्चित केले जातील. तोपर्यंत जुन्या दराने भाडे आकारा असे आदेश त्यावरून प्रवाशी आणि रिक्षाचालकांमध्ये वाद होऊ लागले आहेत.चालकांनी आरटीओचे आदेश धुडकावत वाढीव दरानुसार नुसार भाडे वसूली सुरु ठेवली आहे. वाढीव भाडे न देणाºया प्रवाशांवर रिक्षाचालक टोळीने दादागिरी करीत असून प्रसंगी धक्काबुकीही करीत आहेत. इतकेच नाही तर रिक्षाचालकांनी वाढीव दरानेच भाडे द्यावे लागेल. ज्यांना ते परवडत असेल. त्यांनी रिक्षात बसावे. ज्यांना परवडत नसेल त्यांनी रिक्षात बसू नये कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये, असे फर्मानच रिक्षा चालकांनी फलकाद्वारे सोडले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार प्रवाशांनी आरटीओ आणि पोलिसांच्या नजरेस आणून दिल्यानंतरही त्यांनी कोणतेही कारवाई केलेली नाही. त्यामुळे रिक्षाचालकांनी मनमानी भाडे आकारणी सुरुच ठेवून प्रवाशांना वेठीस धरले आहे. दरम्यान, रिक्शा चालकांच्या या दादागिरीविरोधात आता वसईतून प्रवाशांनी सह्यांची मोहिम सुरू केली आहे. तसेच ईमेल द्वारे रिक्षाचालकांविरोधात तक्रार केल्या जात आहेत.