शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
4
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
5
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
6
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
7
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
8
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
9
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
10
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
11
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
12
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
13
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
14
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
15
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
16
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
17
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
19
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
20
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!

भाडे मान्य नसेल तर रिक्षात बसू नका, दरवाढीला आरटीओने आक्षेप घेतल्यानंतरही रिक्षाचालकांची मनमानी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 03:49 IST

वाहतूक पोलीस आणि आरटीओचे आर्थिक हितसंबंध जपणाºया रिक्षाचालकांनी आता मनमानी भाडेवाढ करून प्रवाशांना वेठीस धरले आहे.

वसई : वाहतूक पोलीस आणि आरटीओचे आर्थिक हितसंबंध जपणाºया रिक्षाचालकांनी आता मनमानी भाडेवाढ करून प्रवाशांना वेठीस धरले आहे. भाडे परवडत नसेल तर रिक्षात बसू नका असा फलकच रिक्षा चालकांनी नायगावमध्ये लावला आहे. त्यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये वादावादी होऊ लागली आहे.वसईतील रिक्षाचालक कोणतेही नियम पाळत नाहीत. एकही अधिकृत रिक्षा स्टँड नाही. अनधिकृत रिक्षांची संख्याही प्रचंड आहे. एका स्टँडवर एकावेळी असंख्य रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे वाहतूककोंडी होत असते. त्यातच शेअर रिक्षाच्या नावाखाली पाच-पाच प्रवाशांची वाहतूक एकाच रिक्षातून केली जाते. त्याचबरोबर मनमानी भाडेही आकारले जात असल्याचे प्रकार अ़नेकदा घडले आहेत. मात्र, वाहतूक पोलीस आणि आरटीओशी आर्थिक हितसंबंध असल्याने रिक्षा चालकांची ही मनमानी आणि दादागिरी वाढू लागली आहे.नायगाव पश्चिमेला असाच नवा वाद रिक्षाचालकांनी उकरून काढला आहे. चालकांनी १५ सप्टेंबरपासून भाड्यात अचानक बेकायदेशीर वाढ केली आहे. याप्रकरणी प्रवाशांच्या तक्रारीवरून रिक्षाचालक, आरटीओ, पोलीस आणि प्रवाशांची बैठकही झाली. यात आरटीओने भाडेवाढ बेकायदेशीर ठरवत सर्वेक्षण होऊन भाडेदर निश्चित केले जातील. तोपर्यंत जुन्या दराने भाडे आकारा असे आदेश त्यावरून प्रवाशी आणि रिक्षाचालकांमध्ये वाद होऊ लागले आहेत.चालकांनी आरटीओचे आदेश धुडकावत वाढीव दरानुसार नुसार भाडे वसूली सुरु ठेवली आहे. वाढीव भाडे न देणाºया प्रवाशांवर रिक्षाचालक टोळीने दादागिरी करीत असून प्रसंगी धक्काबुकीही करीत आहेत. इतकेच नाही तर रिक्षाचालकांनी वाढीव दरानेच भाडे द्यावे लागेल. ज्यांना ते परवडत असेल. त्यांनी रिक्षात बसावे. ज्यांना परवडत नसेल त्यांनी रिक्षात बसू नये कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये, असे फर्मानच रिक्षा चालकांनी फलकाद्वारे सोडले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार प्रवाशांनी आरटीओ आणि पोलिसांच्या नजरेस आणून दिल्यानंतरही त्यांनी कोणतेही कारवाई केलेली नाही. त्यामुळे रिक्षाचालकांनी मनमानी भाडे आकारणी सुरुच ठेवून प्रवाशांना वेठीस धरले आहे. दरम्यान, रिक्शा चालकांच्या या दादागिरीविरोधात आता वसईतून प्रवाशांनी सह्यांची मोहिम सुरू केली आहे. तसेच ईमेल द्वारे रिक्षाचालकांविरोधात तक्रार केल्या जात आहेत.