शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

पाणी न मिळाल्यास ग्रामस्थांचे उग्र आंदोलन

By admin | Updated: November 4, 2016 02:59 IST

एमआयडीसीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींची आज बैठक घेऊन पाणी पुरवठा जास्तीत जास्त सुरळीत करण्याचे आश्वासन दिले

बोईसर : चाळीस टक्के पाणी कपातीनंतर तीव्र टंचाईला सामोरे जात असलेल्या सालवड, पास्थळ व बोईसर ग्रामपंचायतीने आंदोलनाचे पत्र देताच एमआयडीसीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींची आज बैठक घेऊन पाणी पुरवठा जास्तीत जास्त सुरळीत करण्याचे आश्वासन दिले मात्र आज देण्यात आलेले आश्वासन न पाळल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा उपस्थित प्रतिनिधिंनी दिला आहे.अतिरिक्त सांडपाण्यावर नियंत्रण आणण्याकरिता राष्ट्रीय हरीत लवादाच्या आदेशानंतर एमआयडीसी ने तारापूर औद्योगिक क्षेत्राबरोबरच औद्योगिक क्षेत्रालगतच्या ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने तिन्ही ग्रामपंचायतीने दि. ३ व ४ असे दोन दिवस आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.आज तारापूर एमआयडीसी च्या कार्यालयात एमआयडीसीचे अधिक्षक अभियंता रमाकांत पंडितराव, कार्यकारी अभियंता एम. एस. कलकुटकी, उपअभियंता त.म. करवा, आर पी. पाटील या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्या बैठकीस सालवडच्या सरपंच सुगंधा पाटील, पास्थळच्या सरपंच मंजुळा गोवारी, पास्थळचे उपसरपंच गोपिनाथ घरत, बोईसरचे उपसरपंच राजू करवीर, सालवडचे ग्रामपंचायत सदस्य संजय ना. पाटील, पास्थळचे सदस्य हरेश इ. उपस्थित होते.बैठकीत राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशान्वये चाळीस टक्के पाणी कपात सुरू केल्याचे अधिक्षक अभियंता रमाकांत पंडितराव यांनी ग्रामपंचातीच्या प्रतिनिधींना सांगितले. त्यावेळी अधिक्षक अभियंत्यांनी पाण्याचा साठा कमी पडणार नाही यासाठी जेवढे करता येईल तेवढे करा, असा आदेश एमआयडीसीच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिला. यापूर्वी दिलेली आश्वासने कृतीत उतरलेली नाहीत त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी पाणी पुरवठ्यात सुधारण न झाल्यास तीव्र आंदोलन करू त्याची जबाबदारी एमआयडीसीवर असेल असा इशारा दिला. (वार्ताहर)>काय आहे वस्तुस्थिती?आम्हास मुळातच कमी दाबाने होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याला सतत तोंड द्यावे लागते त्यामध्ये ४० टक्के पाणी कपातीची भर पडल्याने ग्रामस्थ पाण्यावाचून हवालदिल झाले असून रोज त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अशी वस्तुस्थिती सरपंच व उपसरपंचांनी मांडली.