शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

वसईतील शेकडो बावखळे बुजवली तर असलेल्यांची झाली पार दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:07 IST

वसई विरार महापालिकेचे हात वर : पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून मात्र पाठपुरावा सुरू

पारोळ : वसईत पूर्वजांनी पावसाचे पाणी साठवण्यासाठी शेकडो बावखळे खणली. एके काळी ही बावखळे वसईतील गारवा आणि हिरवळ जोपासण्याचे काम करीत होती. मात्र आज बहुसंख्य बावखळे कोरडी पडली आहेत. कचराकुंडीसारखा त्याचा उपयोग होत आहे. काही ठिकाणी तर बावखळ बुजवून घरे बांधण्यात आली आहेत. बावखलांच्या संवर्धनासाठी विनंती केली असता वसई विरार महापालिकेने हात वर केले असून, ही बाब दुर्दैवी असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा कुळकर्णी यांनी म्हटले आहे.

पर्यावरणासाठी काम करणाऱ्या ध्यास फाउंडेशन च्या खजिनदार आणि ग्रीन अंब्रेला आँर्गनायझेशनच्या सदस्य असलेल्या कुलकर्णी यांनी बावखलांच्या संवर्धनाचा प्रश्न समाज माध्यमातून उचलून धरला असता, त्यांना दोनच दिवसात शेकडो नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन, ह्या विषयावर काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त करून त्यांच्याशी संपर्क साधला आहे. बावखळांची स्वच्छता व खोलीकरण हा जनसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे याचेच हे द्योतक असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

वर्षागणिक पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढतच आहे. भूजल पातळी खाली जात आहे. अशा परिस्थितीत बावखळांचे पुनरु ज्जीवन करणे जरुरीचे आहे असा विचार करुन ध्यास फाउंडेशन मार्फत आम्ही वसई विरार महानगरपालिकेशी मदतीसाठी संपर्क साधला. सुरवातीला आचार संहितेमुळे आमचे हात बांधले आहेत. अशी भूमिका त्यांनी घेतली होती. एप्रिल महिन्यात महापालिकेचे आयुक्त आणि उपमहापौर यांच्या उपस्थितीत वसईतील पूरसमस्येवर आयोजित कार्यक्रमात बावखळांबद्दल महानगरपालिकेला प्रश्न विचारण्यात आला होता. बावखळे खाजगी मालकीची असल्याने माहानगरपालिका काही करु शकत नाही असे उत्तर देऊन महापालिकेने या प्रकरणी हात वर केल्याचे त्या म्हणाल्या.

त्यांना बावखळे स्वच्छ करावयाची इच्छा आहे असे आढळून आल्याचे त्यांनी म्हटले आहे. बावखळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी संघटीत प्रयत्न होणे जरुरीचे आहे. महापालिकेने ग्रामस्थांना अशा कामासाठी प्रोत्साहन द्यावे.

त्यांना तांत्रिक मार्गदर्शन आणि आर्थिक मदत द्यावी. शेततळ्यांसाठी शासकीय अनुदान मिळते. रेन वॉटर हार्वेस्टींगसाठी महापालिका मदत करते. मग बावखळांच्या पुनरुज्जीवनासाठीही महापालिकेने मदत करायला हवी, अशी जाहीर मागणी कुलकर्णी यांनी केली आहे. भूजलाच्या पुर्नभरणासाठी बावखळे जगली पाहिजेत, जमिनीत पाणी असेल तरच हिरवाई दिसेल, हरित वसई सुंदर वसई या

महापालिकेच्या धोरणाचाच हा एक भाग आहे. सर्व सुजाण नागरिकांनी, जाणत्या लोकनेत्यांनी एकत्र येऊन उपाययोजना करणे जरु रीचे आहे. बावखळे वाचवा, पाणी जिरवा ही वसईसाठी लोकचळवळ व्हावयास हवी, असेही त्यांनी आपल्या जाहीर निवेदनात म्हटले आहे.

जनतेचा उत्साही प्रतिसादमहाराष्ट्रात पाणी अडवा पाणी जिरवा आणि जलयुक्त शिवार असे कार्यक्रम राबवले जात आहेत. वसईतील जाणत्या पूर्वजांनी निर्माण केलेली बावखळे कोरडी पडत आहेत. आणि वसईतील सुजाण नागरिक, जाणते लोकनेते, प्रगतिशील महापालिका हातावर हात ठेवून गप्प बसले आहेत, हे चित्र मन विषण्ण करणारे आहे. अशा उद्वीग्न मनस्थितीत मी स्वत:च ह्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याचे ठरवले. मुळगाव, किरवली, होळी, सांडोर येथील बावखळांची पाहणी केली. तेथील नागरिकांशी चर्चा केली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार