शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

वसईतील शेकडो बावखळे बुजवली तर असलेल्यांची झाली पार दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:07 IST

वसई विरार महापालिकेचे हात वर : पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून मात्र पाठपुरावा सुरू

पारोळ : वसईत पूर्वजांनी पावसाचे पाणी साठवण्यासाठी शेकडो बावखळे खणली. एके काळी ही बावखळे वसईतील गारवा आणि हिरवळ जोपासण्याचे काम करीत होती. मात्र आज बहुसंख्य बावखळे कोरडी पडली आहेत. कचराकुंडीसारखा त्याचा उपयोग होत आहे. काही ठिकाणी तर बावखळ बुजवून घरे बांधण्यात आली आहेत. बावखलांच्या संवर्धनासाठी विनंती केली असता वसई विरार महापालिकेने हात वर केले असून, ही बाब दुर्दैवी असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा कुळकर्णी यांनी म्हटले आहे.

पर्यावरणासाठी काम करणाऱ्या ध्यास फाउंडेशन च्या खजिनदार आणि ग्रीन अंब्रेला आँर्गनायझेशनच्या सदस्य असलेल्या कुलकर्णी यांनी बावखलांच्या संवर्धनाचा प्रश्न समाज माध्यमातून उचलून धरला असता, त्यांना दोनच दिवसात शेकडो नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन, ह्या विषयावर काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त करून त्यांच्याशी संपर्क साधला आहे. बावखळांची स्वच्छता व खोलीकरण हा जनसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे याचेच हे द्योतक असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

वर्षागणिक पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढतच आहे. भूजल पातळी खाली जात आहे. अशा परिस्थितीत बावखळांचे पुनरु ज्जीवन करणे जरुरीचे आहे असा विचार करुन ध्यास फाउंडेशन मार्फत आम्ही वसई विरार महानगरपालिकेशी मदतीसाठी संपर्क साधला. सुरवातीला आचार संहितेमुळे आमचे हात बांधले आहेत. अशी भूमिका त्यांनी घेतली होती. एप्रिल महिन्यात महापालिकेचे आयुक्त आणि उपमहापौर यांच्या उपस्थितीत वसईतील पूरसमस्येवर आयोजित कार्यक्रमात बावखळांबद्दल महानगरपालिकेला प्रश्न विचारण्यात आला होता. बावखळे खाजगी मालकीची असल्याने माहानगरपालिका काही करु शकत नाही असे उत्तर देऊन महापालिकेने या प्रकरणी हात वर केल्याचे त्या म्हणाल्या.

त्यांना बावखळे स्वच्छ करावयाची इच्छा आहे असे आढळून आल्याचे त्यांनी म्हटले आहे. बावखळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी संघटीत प्रयत्न होणे जरुरीचे आहे. महापालिकेने ग्रामस्थांना अशा कामासाठी प्रोत्साहन द्यावे.

त्यांना तांत्रिक मार्गदर्शन आणि आर्थिक मदत द्यावी. शेततळ्यांसाठी शासकीय अनुदान मिळते. रेन वॉटर हार्वेस्टींगसाठी महापालिका मदत करते. मग बावखळांच्या पुनरुज्जीवनासाठीही महापालिकेने मदत करायला हवी, अशी जाहीर मागणी कुलकर्णी यांनी केली आहे. भूजलाच्या पुर्नभरणासाठी बावखळे जगली पाहिजेत, जमिनीत पाणी असेल तरच हिरवाई दिसेल, हरित वसई सुंदर वसई या

महापालिकेच्या धोरणाचाच हा एक भाग आहे. सर्व सुजाण नागरिकांनी, जाणत्या लोकनेत्यांनी एकत्र येऊन उपाययोजना करणे जरु रीचे आहे. बावखळे वाचवा, पाणी जिरवा ही वसईसाठी लोकचळवळ व्हावयास हवी, असेही त्यांनी आपल्या जाहीर निवेदनात म्हटले आहे.

जनतेचा उत्साही प्रतिसादमहाराष्ट्रात पाणी अडवा पाणी जिरवा आणि जलयुक्त शिवार असे कार्यक्रम राबवले जात आहेत. वसईतील जाणत्या पूर्वजांनी निर्माण केलेली बावखळे कोरडी पडत आहेत. आणि वसईतील सुजाण नागरिक, जाणते लोकनेते, प्रगतिशील महापालिका हातावर हात ठेवून गप्प बसले आहेत, हे चित्र मन विषण्ण करणारे आहे. अशा उद्वीग्न मनस्थितीत मी स्वत:च ह्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याचे ठरवले. मुळगाव, किरवली, होळी, सांडोर येथील बावखळांची पाहणी केली. तेथील नागरिकांशी चर्चा केली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार