शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
4
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
5
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
6
"इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
7
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
8
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
9
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
10
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
11
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
12
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
13
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
14
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
15
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
16
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
17
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
18
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
19
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
20
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील शेकडो बावखळे बुजवली तर असलेल्यांची झाली पार दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:07 IST

वसई विरार महापालिकेचे हात वर : पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून मात्र पाठपुरावा सुरू

पारोळ : वसईत पूर्वजांनी पावसाचे पाणी साठवण्यासाठी शेकडो बावखळे खणली. एके काळी ही बावखळे वसईतील गारवा आणि हिरवळ जोपासण्याचे काम करीत होती. मात्र आज बहुसंख्य बावखळे कोरडी पडली आहेत. कचराकुंडीसारखा त्याचा उपयोग होत आहे. काही ठिकाणी तर बावखळ बुजवून घरे बांधण्यात आली आहेत. बावखलांच्या संवर्धनासाठी विनंती केली असता वसई विरार महापालिकेने हात वर केले असून, ही बाब दुर्दैवी असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा कुळकर्णी यांनी म्हटले आहे.

पर्यावरणासाठी काम करणाऱ्या ध्यास फाउंडेशन च्या खजिनदार आणि ग्रीन अंब्रेला आँर्गनायझेशनच्या सदस्य असलेल्या कुलकर्णी यांनी बावखलांच्या संवर्धनाचा प्रश्न समाज माध्यमातून उचलून धरला असता, त्यांना दोनच दिवसात शेकडो नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन, ह्या विषयावर काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त करून त्यांच्याशी संपर्क साधला आहे. बावखळांची स्वच्छता व खोलीकरण हा जनसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे याचेच हे द्योतक असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

वर्षागणिक पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढतच आहे. भूजल पातळी खाली जात आहे. अशा परिस्थितीत बावखळांचे पुनरु ज्जीवन करणे जरुरीचे आहे असा विचार करुन ध्यास फाउंडेशन मार्फत आम्ही वसई विरार महानगरपालिकेशी मदतीसाठी संपर्क साधला. सुरवातीला आचार संहितेमुळे आमचे हात बांधले आहेत. अशी भूमिका त्यांनी घेतली होती. एप्रिल महिन्यात महापालिकेचे आयुक्त आणि उपमहापौर यांच्या उपस्थितीत वसईतील पूरसमस्येवर आयोजित कार्यक्रमात बावखळांबद्दल महानगरपालिकेला प्रश्न विचारण्यात आला होता. बावखळे खाजगी मालकीची असल्याने माहानगरपालिका काही करु शकत नाही असे उत्तर देऊन महापालिकेने या प्रकरणी हात वर केल्याचे त्या म्हणाल्या.

त्यांना बावखळे स्वच्छ करावयाची इच्छा आहे असे आढळून आल्याचे त्यांनी म्हटले आहे. बावखळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी संघटीत प्रयत्न होणे जरुरीचे आहे. महापालिकेने ग्रामस्थांना अशा कामासाठी प्रोत्साहन द्यावे.

त्यांना तांत्रिक मार्गदर्शन आणि आर्थिक मदत द्यावी. शेततळ्यांसाठी शासकीय अनुदान मिळते. रेन वॉटर हार्वेस्टींगसाठी महापालिका मदत करते. मग बावखळांच्या पुनरुज्जीवनासाठीही महापालिकेने मदत करायला हवी, अशी जाहीर मागणी कुलकर्णी यांनी केली आहे. भूजलाच्या पुर्नभरणासाठी बावखळे जगली पाहिजेत, जमिनीत पाणी असेल तरच हिरवाई दिसेल, हरित वसई सुंदर वसई या

महापालिकेच्या धोरणाचाच हा एक भाग आहे. सर्व सुजाण नागरिकांनी, जाणत्या लोकनेत्यांनी एकत्र येऊन उपाययोजना करणे जरु रीचे आहे. बावखळे वाचवा, पाणी जिरवा ही वसईसाठी लोकचळवळ व्हावयास हवी, असेही त्यांनी आपल्या जाहीर निवेदनात म्हटले आहे.

जनतेचा उत्साही प्रतिसादमहाराष्ट्रात पाणी अडवा पाणी जिरवा आणि जलयुक्त शिवार असे कार्यक्रम राबवले जात आहेत. वसईतील जाणत्या पूर्वजांनी निर्माण केलेली बावखळे कोरडी पडत आहेत. आणि वसईतील सुजाण नागरिक, जाणते लोकनेते, प्रगतिशील महापालिका हातावर हात ठेवून गप्प बसले आहेत, हे चित्र मन विषण्ण करणारे आहे. अशा उद्वीग्न मनस्थितीत मी स्वत:च ह्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याचे ठरवले. मुळगाव, किरवली, होळी, सांडोर येथील बावखळांची पाहणी केली. तेथील नागरिकांशी चर्चा केली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार