शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हवाई हल्ला होताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
3
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
4
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
5
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
6
"माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
7
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
8
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
9
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
10
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
11
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
12
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
13
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
14
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
15
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
16
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
17
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
18
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
19
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
20
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 

पालकमंत्री अद्याप गप्प कसे? सूर्या पाणीबचाव संघर्ष समितीच्या उपोषणाचा तिसरा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 03:17 IST

जिल्ह्यातील वाडा आणि जव्हार तालुक्यातील आदिवासी आणि शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करणारा पिंजाळ प्रकल्प रद्द करून दमणगंगा-पिंजाळ हा नवीन नदी जोड प्रकल्पा द्वारे इथले पाणी मुंबईला नेले जात असल्याने इथला स्थानिक उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

पालघर : जिल्ह्यातील वाडा आणि जव्हार तालुक्यातील आदिवासी आणि शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करणारा पिंजाळ प्रकल्प रद्द करून दमणगंगा-पिंजाळ हा नवीन नदी जोड प्रकल्पा द्वारे इथले पाणी मुंबईला नेले जात असल्याने इथला स्थानिक उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अश्यावेळी आमचे पालकमंत्र्यासह स्थानिक प्रतिनिधी मात्र नेहमी प्रमाणे गप्प बसले असले तरी सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने आयोजित केलेल्या उपोषणाच्या तिसºया दिवशी या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा वाढत असल्याचे वृत्त आहे.जिल्ह्यातील पालघर, डहाणू, विक्र मगड तालुक्यातील शेतकरी व आदिवासी ह्यांच्या १४ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ व्हावा ह्यासाठी उभारलेल्या सूर्या प्रकल्पाचे पाणी मुंबई, वसई आणि मिरा-भार्इंदर कडे वळविल्याने त्यांच्या जमिनी सिंचना विना ओसाड पडत आहेत. त्यामुळे इथले भूमीपुत्र एक बाजूला पाण्याच्या तर दुसºया बाजूला भूमीच्या अशा दुहेरी संकटात सापडला आहेत.आज जव्हार, मोखाडा, विक्र मगड, वाडा येथे प्रत्येक वर्षी पाण्याची टंचाई भासत असताना त्यांची थट्टा करून इथलं उरल सुरल पाणीही पळविले जात आहे. आणि आमचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा मात्र ह्या विरोधात एक अवाच्चर शब्द ही काढायला तयार नसल्याने त्यांच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. त्यांच्या बरोबरीने आमदार अमित घोडा, आ. विलास तरे, आ. पास्कल धनारे, विधान परिषदेचे आ.आनंद ठाकूर हेही पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नाबाबत आवाज उठवीत नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. शेतकºयांच्या नावाने अश्रू ढाळणारे भाजप सरकार प्रत्यक्षात मात्र शेतकºयांचे सिंचन क्षेत्र कमी करून त्यांना कसे उध्वस्त करता येईल ह्या दृष्टीने आपल्या पाठीराख्या साठी तर काम करीत नाहीत ना? अशीही चर्चा इथे सुरू आहे.हे उपोषण शेतकरी, आदिवासी आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी असल्याने आणि भविष्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला पाण्याच्या दुर्भिक्षतेला सामोरे जावे लागणार असल्या ब्रायन लोबो ह्यांनी सांगितले.हे तर निषेधार्हजिल्ह्यातील पिण्याच्या पाण्या सारख्या ज्वलंत प्रश्नाच्या हक्कासाठी हे उपोषणकर्ते आपल्या जीवाची बाजी लावत आहेत. अशा वेळी आपले आदिवासी विकासमंत्री, काही लोकप्रतिनिधी, प्रशासन ह्यांना त्यांची साधी दखल घ्यावीशी वाटत नसल्याचा निषेध निलेश सांबरे यांनी केला आहे.बुधवारी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, काळूराम धोदडे, हनुमान नगरचे प्रकल्पग्रस्त आदींनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश शहा, आरपीआय , आदींनी लेखी पाठिंबा दिला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार