शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
4
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
6
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
7
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
8
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
9
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
10
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
11
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
12
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
13
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
15
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
16
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
17
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
18
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
19
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
20
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना

बेरोजगारीचे किती बळी?, शॉक लागून माय - लेकराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:53 IST

प्रशासनाने स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध न केल्याने आदिवासी मजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागले आहे.

हुसेन मेमन जव्हार : एकीकडे अवकाळी पावसाने शेती उद्ध्वस्त झाली, त्यामुळे शेतीतील रोजगार नाही तर दुसरीकडे प्रशासनाने स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध न केल्याने आदिवासी मजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागले आहे. यातूनच गेल्या आठवड्यात दीड वर्षाला मुलासह आईचा शॉक लागून मृत्यू झाला. यानिमित्ताने पुन्हा एकदा रोजगार हमीसह इतर आदिवासी योजना शासनाच्या उदासीनतेमुळे अंमलात न आल्याने आदिवासींना रोजगारासाठी किती कष्ट घ्यावे लागतात ते समोर आले आहे.वास्तविक, आदिवासी भागात शेतीचे काम संपताच म्हणजे २ आॅक्टोबर, गांधी जयंतीपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू करणे आवश्यक आहे. तसे शासनाचे धोरणही आहे. मात्र, प्रशासनाने येथे कामेच सुरू केलेली नाहीत. त्यातच यंदा अवकाळी पावसाने खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. त्यामुळे स्थानिक ठिकाणी शेतीचा रोजगारच उपलब्ध झाला नाही. त्यामुळे शेतमजूर बेरोजगार झाला आहे, तर भूमिहीन शेतकरी उपासमारीच्या खाईत ढकलला गेला आहे. त्यामुळे मजुरांनी पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर केले आहे. याच स्थलांतराने मोखाड्यातील पळसुंडा येथील विकास वाडीतील माय - लेकरांचा बळी घेतला आहे.विकास वाडीतील काळू, ज्योती हे जोडपे आपल्या दीड वर्षांच्या राघोला घेऊन २०० रूपये रोजाच्या मजुरीसाठी नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथे शेतातील कामासाठी स्थलांतर केले. येथे शेतातच झोपडी बांधून हे कुटूंब रहात होते. तेथेच ४ नोव्हेंबर रोजी झोपडीत असलेल्या दीड वर्षांच्या राघोला विजेचा शॉक लागला. त्याला सोडवण्यासाठी ज्योती धावली आणि दोघांनाही शॉक लागल्याने त्यातच या मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.मुळात रोजगात हमी, घरकूल योजना, रेशनवर धान्य, विधवांना पगार अशा अनेक योजना आदिवासींसाठी शासन राबवित आहे. मात्र या योजना किती पोकळ आहेत, त्या केवळ कागदावरच कशा राहतात, हे यावरून समोर येते.>या भागातील लोकांना रोजगारासाठी वावण भटकावे लागते. त्यातून अशा दुर्दैवी घटनाही घडत आहेत. यामुळे आजवरच्या लोकप्रतिनिधींनी काय केले, या भानगडीत न पडता या लोकांना स्थानिक पातळीवर पुरेसा रोजगार कसा उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करायचे आहेत. हा स्थलांतराचा डाग पुसण्यासाठी येत्या काळात युद्ध पातळीवर प्रयत्न करणार आहे.- सुनील भुसारा, आमदार, विक्रमगड मतदारसंघ