शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

बेरोजगारीचे किती बळी?, शॉक लागून माय - लेकराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:53 IST

प्रशासनाने स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध न केल्याने आदिवासी मजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागले आहे.

हुसेन मेमन जव्हार : एकीकडे अवकाळी पावसाने शेती उद्ध्वस्त झाली, त्यामुळे शेतीतील रोजगार नाही तर दुसरीकडे प्रशासनाने स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध न केल्याने आदिवासी मजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागले आहे. यातूनच गेल्या आठवड्यात दीड वर्षाला मुलासह आईचा शॉक लागून मृत्यू झाला. यानिमित्ताने पुन्हा एकदा रोजगार हमीसह इतर आदिवासी योजना शासनाच्या उदासीनतेमुळे अंमलात न आल्याने आदिवासींना रोजगारासाठी किती कष्ट घ्यावे लागतात ते समोर आले आहे.वास्तविक, आदिवासी भागात शेतीचे काम संपताच म्हणजे २ आॅक्टोबर, गांधी जयंतीपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू करणे आवश्यक आहे. तसे शासनाचे धोरणही आहे. मात्र, प्रशासनाने येथे कामेच सुरू केलेली नाहीत. त्यातच यंदा अवकाळी पावसाने खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. त्यामुळे स्थानिक ठिकाणी शेतीचा रोजगारच उपलब्ध झाला नाही. त्यामुळे शेतमजूर बेरोजगार झाला आहे, तर भूमिहीन शेतकरी उपासमारीच्या खाईत ढकलला गेला आहे. त्यामुळे मजुरांनी पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर केले आहे. याच स्थलांतराने मोखाड्यातील पळसुंडा येथील विकास वाडीतील माय - लेकरांचा बळी घेतला आहे.विकास वाडीतील काळू, ज्योती हे जोडपे आपल्या दीड वर्षांच्या राघोला घेऊन २०० रूपये रोजाच्या मजुरीसाठी नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथे शेतातील कामासाठी स्थलांतर केले. येथे शेतातच झोपडी बांधून हे कुटूंब रहात होते. तेथेच ४ नोव्हेंबर रोजी झोपडीत असलेल्या दीड वर्षांच्या राघोला विजेचा शॉक लागला. त्याला सोडवण्यासाठी ज्योती धावली आणि दोघांनाही शॉक लागल्याने त्यातच या मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.मुळात रोजगात हमी, घरकूल योजना, रेशनवर धान्य, विधवांना पगार अशा अनेक योजना आदिवासींसाठी शासन राबवित आहे. मात्र या योजना किती पोकळ आहेत, त्या केवळ कागदावरच कशा राहतात, हे यावरून समोर येते.>या भागातील लोकांना रोजगारासाठी वावण भटकावे लागते. त्यातून अशा दुर्दैवी घटनाही घडत आहेत. यामुळे आजवरच्या लोकप्रतिनिधींनी काय केले, या भानगडीत न पडता या लोकांना स्थानिक पातळीवर पुरेसा रोजगार कसा उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करायचे आहेत. हा स्थलांतराचा डाग पुसण्यासाठी येत्या काळात युद्ध पातळीवर प्रयत्न करणार आहे.- सुनील भुसारा, आमदार, विक्रमगड मतदारसंघ