शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारीचे किती बळी?, शॉक लागून माय - लेकराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:53 IST

प्रशासनाने स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध न केल्याने आदिवासी मजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागले आहे.

हुसेन मेमन जव्हार : एकीकडे अवकाळी पावसाने शेती उद्ध्वस्त झाली, त्यामुळे शेतीतील रोजगार नाही तर दुसरीकडे प्रशासनाने स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध न केल्याने आदिवासी मजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागले आहे. यातूनच गेल्या आठवड्यात दीड वर्षाला मुलासह आईचा शॉक लागून मृत्यू झाला. यानिमित्ताने पुन्हा एकदा रोजगार हमीसह इतर आदिवासी योजना शासनाच्या उदासीनतेमुळे अंमलात न आल्याने आदिवासींना रोजगारासाठी किती कष्ट घ्यावे लागतात ते समोर आले आहे.वास्तविक, आदिवासी भागात शेतीचे काम संपताच म्हणजे २ आॅक्टोबर, गांधी जयंतीपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू करणे आवश्यक आहे. तसे शासनाचे धोरणही आहे. मात्र, प्रशासनाने येथे कामेच सुरू केलेली नाहीत. त्यातच यंदा अवकाळी पावसाने खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. त्यामुळे स्थानिक ठिकाणी शेतीचा रोजगारच उपलब्ध झाला नाही. त्यामुळे शेतमजूर बेरोजगार झाला आहे, तर भूमिहीन शेतकरी उपासमारीच्या खाईत ढकलला गेला आहे. त्यामुळे मजुरांनी पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर केले आहे. याच स्थलांतराने मोखाड्यातील पळसुंडा येथील विकास वाडीतील माय - लेकरांचा बळी घेतला आहे.विकास वाडीतील काळू, ज्योती हे जोडपे आपल्या दीड वर्षांच्या राघोला घेऊन २०० रूपये रोजाच्या मजुरीसाठी नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथे शेतातील कामासाठी स्थलांतर केले. येथे शेतातच झोपडी बांधून हे कुटूंब रहात होते. तेथेच ४ नोव्हेंबर रोजी झोपडीत असलेल्या दीड वर्षांच्या राघोला विजेचा शॉक लागला. त्याला सोडवण्यासाठी ज्योती धावली आणि दोघांनाही शॉक लागल्याने त्यातच या मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.मुळात रोजगात हमी, घरकूल योजना, रेशनवर धान्य, विधवांना पगार अशा अनेक योजना आदिवासींसाठी शासन राबवित आहे. मात्र या योजना किती पोकळ आहेत, त्या केवळ कागदावरच कशा राहतात, हे यावरून समोर येते.>या भागातील लोकांना रोजगारासाठी वावण भटकावे लागते. त्यातून अशा दुर्दैवी घटनाही घडत आहेत. यामुळे आजवरच्या लोकप्रतिनिधींनी काय केले, या भानगडीत न पडता या लोकांना स्थानिक पातळीवर पुरेसा रोजगार कसा उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करायचे आहेत. हा स्थलांतराचा डाग पुसण्यासाठी येत्या काळात युद्ध पातळीवर प्रयत्न करणार आहे.- सुनील भुसारा, आमदार, विक्रमगड मतदारसंघ