शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

पाण्याशिवाय कोरोनाशी लढा द्यायचा कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 02:26 IST

तर एमआयडीसीकडून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

पंकज राऊतबोईसर : येथील केशव नगर ते साईबाबानगर या पट्ट्यातील सुमारे दीडशे इमारतींपैकी काही इमारतींच्या कूपनलिका (बोअरवेल) कोरड्या झाल्या आहेत. तर काही कोरड्या होण्याच्या मार्गावर असून काही भागातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. तर एमआयडीसीकडून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे.ग्रामपंचायतीकडून केवळ प्यायला पुरेल एवढाच पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याअभावी कोरोनाशी दोन हात करायचे कसे, असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर सध्या उभा आहे. वाढत्या उकाड्याच्या काळात केशव नगर, खोदाराम बाग, मंगलमूर्ती नगर, साईबाबा नगर, परमाणू नगर, दीजयनगर, नाईक नगर, अवधूत नगर येथे भेडसावणाऱ्या पाणी समस्येमुळे येथील काही इमारतींमधील रहिवाशांना पाण्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते आहे.बोईसर ग्रामपंचायतीकडून प्रत्येक विभागात केवळ दोन तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात वीजपुरववठा खंडित झाला किंवा दाब कमी झाला तर पुरवठ्याची पूर्ण साखळी तुटून पुढील संपूर्ण भागाचा पुरवठा विस्कळीत होतो. यामुळे एमआयडीसीने बोईसर ग्रामपंचायतीचा पुरवठा वाढण्याची आवश्यकता असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे.येथील लोकसंख्या दीड लाखांच्या घरात असून येथील बहुसंख्य नागरिक हे तारापूर एमआयडीसीत काम करतात. त्याच एमआयडीसीकडून पुरेसे पाणी मिळत नसल्याने ग्रामपंचायत हतबल आहे. परंतु आंघोळ, कपडे, शौचालयाबरोबरच वेळोवेळी हात स्वच्छ धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात लागणारे पाणी उपलब्ध होत नाही. हे पाणी आणायचे कोठून असा प्रश्न उपस्थित होत असून टँकरच्या अशुद्ध पाण्यामुळे रोगराईची भीती व्यक्त होत आहे. वसई-विरार मनपा क्षेत्रानंतर सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पालघर तालुक्यात आहेत.>एमआयडीसीकडून येणाºया पाण्याचा पुरवठा प्रत्येक भागातील नागरी वस्तीमध्ये पिण्यासाठी करण्यात येतो. परंतु, काही भागातील बिल्डिंग एरियामधील भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने तेथे इतर वापरासाठी टंचाई आहे. तर एमआयडीसीकडून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्यामुळे मुबलक पाणी मिळत नाही.- कमलेश संखे, ग्रामविकास अधिकारी, बोईसर ग्रामपंचायत>एमआयडीसी पुरेशा दाबाने ग्रामपंचायतींना २४ तास पाणीपुरवठा करीत आहे. मंजूर कोट्यापेक्षा जर जास्त पाणी हवे असेल तर पाणी बिलाची थकबाकी भरून ग्रामपंचायतीने कोटा वाढवून घेणे गरजेचे आहे.- राजेंद्र अनासने, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग एमआयडीसी, तारापूर