शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
5
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
6
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
7
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
8
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
9
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
10
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
11
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
12
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
13
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
14
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
15
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
16
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
17
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
18
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
19
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
20
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना

पाण्याशिवाय कोरोनाशी लढा द्यायचा कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 02:26 IST

तर एमआयडीसीकडून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

पंकज राऊतबोईसर : येथील केशव नगर ते साईबाबानगर या पट्ट्यातील सुमारे दीडशे इमारतींपैकी काही इमारतींच्या कूपनलिका (बोअरवेल) कोरड्या झाल्या आहेत. तर काही कोरड्या होण्याच्या मार्गावर असून काही भागातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. तर एमआयडीसीकडून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे.ग्रामपंचायतीकडून केवळ प्यायला पुरेल एवढाच पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याअभावी कोरोनाशी दोन हात करायचे कसे, असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर सध्या उभा आहे. वाढत्या उकाड्याच्या काळात केशव नगर, खोदाराम बाग, मंगलमूर्ती नगर, साईबाबा नगर, परमाणू नगर, दीजयनगर, नाईक नगर, अवधूत नगर येथे भेडसावणाऱ्या पाणी समस्येमुळे येथील काही इमारतींमधील रहिवाशांना पाण्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते आहे.बोईसर ग्रामपंचायतीकडून प्रत्येक विभागात केवळ दोन तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात वीजपुरववठा खंडित झाला किंवा दाब कमी झाला तर पुरवठ्याची पूर्ण साखळी तुटून पुढील संपूर्ण भागाचा पुरवठा विस्कळीत होतो. यामुळे एमआयडीसीने बोईसर ग्रामपंचायतीचा पुरवठा वाढण्याची आवश्यकता असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे.येथील लोकसंख्या दीड लाखांच्या घरात असून येथील बहुसंख्य नागरिक हे तारापूर एमआयडीसीत काम करतात. त्याच एमआयडीसीकडून पुरेसे पाणी मिळत नसल्याने ग्रामपंचायत हतबल आहे. परंतु आंघोळ, कपडे, शौचालयाबरोबरच वेळोवेळी हात स्वच्छ धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात लागणारे पाणी उपलब्ध होत नाही. हे पाणी आणायचे कोठून असा प्रश्न उपस्थित होत असून टँकरच्या अशुद्ध पाण्यामुळे रोगराईची भीती व्यक्त होत आहे. वसई-विरार मनपा क्षेत्रानंतर सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पालघर तालुक्यात आहेत.>एमआयडीसीकडून येणाºया पाण्याचा पुरवठा प्रत्येक भागातील नागरी वस्तीमध्ये पिण्यासाठी करण्यात येतो. परंतु, काही भागातील बिल्डिंग एरियामधील भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने तेथे इतर वापरासाठी टंचाई आहे. तर एमआयडीसीकडून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्यामुळे मुबलक पाणी मिळत नाही.- कमलेश संखे, ग्रामविकास अधिकारी, बोईसर ग्रामपंचायत>एमआयडीसी पुरेशा दाबाने ग्रामपंचायतींना २४ तास पाणीपुरवठा करीत आहे. मंजूर कोट्यापेक्षा जर जास्त पाणी हवे असेल तर पाणी बिलाची थकबाकी भरून ग्रामपंचायतीने कोटा वाढवून घेणे गरजेचे आहे.- राजेंद्र अनासने, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग एमआयडीसी, तारापूर