शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याशिवाय कोरोनाशी लढा द्यायचा कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 02:26 IST

तर एमआयडीसीकडून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

पंकज राऊतबोईसर : येथील केशव नगर ते साईबाबानगर या पट्ट्यातील सुमारे दीडशे इमारतींपैकी काही इमारतींच्या कूपनलिका (बोअरवेल) कोरड्या झाल्या आहेत. तर काही कोरड्या होण्याच्या मार्गावर असून काही भागातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. तर एमआयडीसीकडून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे.ग्रामपंचायतीकडून केवळ प्यायला पुरेल एवढाच पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याअभावी कोरोनाशी दोन हात करायचे कसे, असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर सध्या उभा आहे. वाढत्या उकाड्याच्या काळात केशव नगर, खोदाराम बाग, मंगलमूर्ती नगर, साईबाबा नगर, परमाणू नगर, दीजयनगर, नाईक नगर, अवधूत नगर येथे भेडसावणाऱ्या पाणी समस्येमुळे येथील काही इमारतींमधील रहिवाशांना पाण्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते आहे.बोईसर ग्रामपंचायतीकडून प्रत्येक विभागात केवळ दोन तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात वीजपुरववठा खंडित झाला किंवा दाब कमी झाला तर पुरवठ्याची पूर्ण साखळी तुटून पुढील संपूर्ण भागाचा पुरवठा विस्कळीत होतो. यामुळे एमआयडीसीने बोईसर ग्रामपंचायतीचा पुरवठा वाढण्याची आवश्यकता असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे.येथील लोकसंख्या दीड लाखांच्या घरात असून येथील बहुसंख्य नागरिक हे तारापूर एमआयडीसीत काम करतात. त्याच एमआयडीसीकडून पुरेसे पाणी मिळत नसल्याने ग्रामपंचायत हतबल आहे. परंतु आंघोळ, कपडे, शौचालयाबरोबरच वेळोवेळी हात स्वच्छ धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात लागणारे पाणी उपलब्ध होत नाही. हे पाणी आणायचे कोठून असा प्रश्न उपस्थित होत असून टँकरच्या अशुद्ध पाण्यामुळे रोगराईची भीती व्यक्त होत आहे. वसई-विरार मनपा क्षेत्रानंतर सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पालघर तालुक्यात आहेत.>एमआयडीसीकडून येणाºया पाण्याचा पुरवठा प्रत्येक भागातील नागरी वस्तीमध्ये पिण्यासाठी करण्यात येतो. परंतु, काही भागातील बिल्डिंग एरियामधील भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने तेथे इतर वापरासाठी टंचाई आहे. तर एमआयडीसीकडून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्यामुळे मुबलक पाणी मिळत नाही.- कमलेश संखे, ग्रामविकास अधिकारी, बोईसर ग्रामपंचायत>एमआयडीसी पुरेशा दाबाने ग्रामपंचायतींना २४ तास पाणीपुरवठा करीत आहे. मंजूर कोट्यापेक्षा जर जास्त पाणी हवे असेल तर पाणी बिलाची थकबाकी भरून ग्रामपंचायतीने कोटा वाढवून घेणे गरजेचे आहे.- राजेंद्र अनासने, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग एमआयडीसी, तारापूर