शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतमजुरांचे दर वाढल्याने शेती करायची कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 01:43 IST

यंत्राने होणारी कामे भातशेतीची नांगरणी, चिखलणी केल्याने शेतजमीन योग्य प्रमाणात भुसभुशीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांची अंगमेहनत, वेळ व पैशाची बचत होते.

वसंत भोईर लोकमत न्यूज नेटवर्कवाडा :  वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथील ‘वाडा कोलम’ हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. मात्र, निसर्गाचा लहरीपणा व भातशेतीसाठी लागणाऱ्या मजुरांची कमतरता, कामाचे वाढलेले दर, यामुळे बदलत्या काळानुसार येथील शेतकरी ट्रॅक्टर, पाॅवर टिलर यांसारख्या आधुनिक यंत्रांचा आधार घेऊन पारंपरिक पद्धतीच्या शेतीला छेद देत ‘हायटेक’ बनू पाहत आहेत, तरीही येथील शेतकऱ्यांना मजुरांची गरज भासत असल्याने शेतमजुरांचा प्रश्न बिकट बनला आहे.शेती व्यवसायाला पूर्वी वेगळीच धार होती. येथील शेतकरी आपल्याकडील लाकडी नांगर आणि बैलजोड्या, तसेच अन्य अवजारे एकमेकांच्या शेतात नेऊन शेती करत, परंतु काळ बदलला तसे पारंपरिक शेती व्यवसायात यांत्रिक अवजारांचा वापर सुरू झाला आहे. बैलजोडीच्या जागी शेतकरी ट्रॅक्टर, पाॅवर टिलरचा आधार घेत आहेत. दुसरीकडे पूर्वी शेतकरी एकमेकांच्या शेतात जाऊन स्वतः राबत असत. त्याच्याऐवजी आता शेतीत मजूर दिसू लागले आहेत. मात्र, शेतमजुरांचे दर गगनाला भिडले आहेत.

शेतकरी म्हणतात की... 

शासनाच्या कृषी विभागाकडून ५० टक्के अनुदानावर ट्रॅक्टर, पाॅवर टिलर राज्यातील शेतकऱ्यांना मिळत आहे, शिवाय महिला बचत गटांसाठी विशेष सवलत असल्याने शेतकरी यांत्रिक अवजारांचा वापर करू लागले आहेत. - किशोर पाटील,शेतकरी, देवघर

  बैलजोडीच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांना त्या खरेदीच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत, तसेच माळराने शिल्लक राहिली नाहीत, तसेच बैलांना चारण्यासाठी गुराखी मिळत नाहीत. त्यामुळे आता शेतकरी यंत्राचा आधार घेऊ लागला आहे.- शांताराम पाटील, शेतकरी, डाकिवली

कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागापूर्वी शेतकऱ्यांना मजुरांवर अवलंबून राहावे लागत असे. मात्र, आता कृषिकामांसाठी अनेक यंत्रे उपलब्ध झालेली असून, मजुरांच्या कामाच्या तुलनेत पाॅवर टिलर आणि ट्रॅक्टरमुळे कामे झपाट्याने होत असल्याने, शेतकऱ्यांची अंगमेहनत, पैसा आणि वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होऊ लागली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरार