शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

लगीन घरी पाऊसाने उडवली वºहाडाची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:43 IST

लवकरच सुरू होणारा पौष महिना त्यातच १२ डिसेंबर पर्यंतच असलेले लग्नाचे मुहूर्त त्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेल्या लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमांवर सोमवारी सायंकाळ पासून लागलेल्या पावसाने पाणी फिरवले

बोईसर : लवकरच सुरू होणारा पौष महिना त्यातच १२ डिसेंबर पर्यंतच असलेले लग्नाचे मुहूर्त त्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेल्या लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमांवर सोमवारी सायंकाळ पासून लागलेल्या पावसाने पाणी फिरवले. लगीन घरी अनपेक्षितरित्या दाखल झालेल्या वादळी पावसाने तारांबळ उडवली.अवकाळी पावसाच्या या फटकेबाजीमुळे सिमला मिरची सह भाजीपाला उत्पादकही प्रचंड चिंतेत टाकले आहे. अरबी समुद्रातील ओखी चक्र ीवादळ किनारपट्टीला धडकण्या अगोदरच पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागा सह सर्वत्र सुरू झालेल्या मुसळधार वादळी पाऊसामूळे विवाह सोहळ्या करीता उभे करण्यात आलेल्या लग्न मंडपांना धोका पोहचला असून अनेक ठिकाणी वºहाडांची पळापळ झाली आहे. दल दल आणि चिखलमय जमिनीवर मंडप कसे उभारायचे त्याच बरोबरच पाहुणे मंडळींच्या कार पार्र्किंगचा मोठा प्रश्न लग्न असणाºया घरातील मंडळीना पडला आहे.सोमवारी सायंकाळी तारापूर पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभारे यांनी तारापूर येथील समुद्र किनारी वास्तव्यास असलेल्या मच्छिमारांनची बैठक घेऊन खबरदारी म्हणून कुणीही किनारपट्टी भागात जाऊ नये असे आवाहन केले होते. मंगळवारी सकाळी आठ वाजे पर्यंत बोईसर सर्कल भागात १५.४ मि. मी. तर तारापूर सर्कल मध्ये १५.४ मी. मी. इतका पाऊस पडला असून मंगळवारी दिवसभर कधी मुसळधार तर कधी रिप रिप असा पाऊस सुरू होता.यामुळे हवेत गारवा येऊन हूडहुडी भरत होती. पाऊसाचा सर्व घटकातील नागरिकांसह मंडप डेकोरेटर, गवत- पावली व्यापारी, शेतकरी, मच्छीमार, सिमला मिरचीचे व भाजीपाला उत्पादक, बोईसर मध्ये सुरू असलेली सर्कस इत्यादी सर्व व्यावसायिकांना जबर फटका बसून मानिसक व आर्थिक त्रास सहन करावा लागणार आहे. तर हीच परिस्थिती पुढील काही दिवस राहणार असल्याची माहती हवामान खात्याकडून मिळत आहे.पावसामध्ये कार्पेट, उच्च प्रतीचा कपडा, लायिटंग, सोफा व इतर साहित्य कमी जास्त फरकाने भिजल्याने प्रचंड नुकसान होणार आहे तर काही कामे रद्द झाली असून पुढील आॅर्डरच्या वेळी ती पूर्ण करण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागणार आहे.- दिलीप शिर्के, मालक ,मंडप डेकोरेटर ,बोईसर