शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

बचत गटांना हॉटेल्स, ढाब्यात हक्काच्या जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 5:59 AM

पालघरला झाली बैठक : जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला व्यावसायिकांनी दिला सकारात्मक प्रतिसाद

पालघर : उपलब्ध साधनसामग्री आणि नैसर्गिक साधनांचा पुरेपूर वापर करून इथल्या महिला बचत गटांनी नवनवीन उत्पादने निर्माण केली आहेत. त्यांंची विक्री व्हावी या साठी जिल्ह्यातील हॉटेल आणि रिसॉर्ट मालकांनी थोडी जागा उपलब्ध करून द्यावी या जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे ह्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने बचत गटांना आता आर्थिक स्थैर्य मिळणार आहे.

राज्य व केंद्र शासनाने बचत गटासाठी विविध विकास योजना आखल्या असून त्यांनी उभ्या केलेल्या व्यवसायाला बँके कडून होणाºया कर्जपुरवठयावरील मुद्रांकशुल्क ही माफ केले आहे. या कर्जाद्वारे उभारण्यात आलेल्या व्यवसायाची वृद्धी होऊन त्या महिला आर्थिक व सामाजिक दृष्टया सक्षम होणे अपेक्षित आहे. त्यासाठी बचत गटांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ निर्माण व्हावी यासाठी सरस महोत्सव आयोजूनही फारसा उपयोग होत नव्हता त्यामुळे बचतगट नाउमेद होत होते. त्यामुळे या उत्पादनांना कायमस्वरूपी जागा मिळावी याकरीता महामार्गालगतच्या हॉटेल व ढाब्यांनी जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी जिल्हाधिकाºयांना केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे.मुख्यमंत्री कार्यालयातून बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्र ीसाठी काही विशेष धोरणे आखण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांना देण्यात आल्यानंतर गुरुवारी नियोजन भवनात जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स मालक, रिसॉर्ट मालक आदींची बैठक बोलाविण्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे, मंत्रालयीन अधिकारी प्रिया खान, नियोजन अधिकारी गो. रा. भारती, तहसीलदार उज्वला भगत सह हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.

जिल्ह्यात एकूण १० हजार ८२३ बचत गट असून पालघर तालुक्यात ४ हजार १०५ बचत गट, डहाणूमध्ये १ हजार ०२८ तलासरी तालुक्यात १ हजार ९४५, विक्रमगड १ हजार ४१३, जव्हार २ हजार ००३, मोखाडा १ हजार ०१७, वाडा १ हजार ४७७, वसई ६९८ इतके बचत गट असून १ लाख ४४ हजार ६६१ महिलांचे संसार अवलंबून आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयाने पर्यटनाबाबत उघडलेल्या वेबसाईट मध्ये आपले नाव, हॉटेल-रिसॉर्ट चे नाव, पत्ता, इ-मेल नंबर नोंदविण्याची विनंती केली.तसेच प्रत्येकाने आपल्या हॉटेल-रिसॉर्ट मध्ये ‘कंटेनर टाइप शॉप’ साठी छोटीशी केबिन बचतगटांच्या माल विक्र ीसाठी तयार करावी या जिल्हाधिकाºयांच्या विनंतीला सर्वांनी मान्यता दिली.त्यामुळे नैसर्गिक औषधी वनस्पती, कंदमुळे, सुके मासे, त्यापासून बनविलेली लोणची आदी नानाविध पदार्थ, बांबू पासून बनविलेल्या वस्तू, वारली चित्रकला, आदी उत्पादित वस्तू हॉटेल्स, रिसॉर्ट मध्ये येणाºया पर्यटकांपर्यंत पोहचून यातून विक्रीची उलाढाल वाढून बचतगटांचे सक्षमीकरण होणार आहे.महामार्गालगतची हॉटेल्स रात्री उशिरापर्यंत चालू ठेवाअनेक मागण्या केल्या सादरच्बैठकी दरम्यान हॉटेल-रिसॉर्ट व्यावसायिकांच्या अनेक समस्यांबाबत आपले म्हणणे मांडताना किनारपट्टीवरील, केळवे, डहाणू, बोर्डी पर्यटनस्थळाकडे अधिक पर्यटक आकर्षित करण्याच्या दृष्टीने स्कुबा डायव्हिंग,वॉटर स्पोर्ट्स, पॅरासेलिंग, निर्माण करावे.च्मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक २४ तास सुरू असल्याने रात्री ११ वाजता हॉटेल्स बंद करण्याचे आदेश असल्याने परिमटरुम वगळता खाद्यपदार्थ ठेवणाºया हॉटेल्स उशिरापर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी मिळावी. करण्याबाबत तात्काळ पावले उचलली जावीत.च्वसई तालुक्यातील किनाºया वरील अनेक हॉटेल्स मालकांनी बांधकामाची रीतसर परवानगी मिळवूनही त्यांना बांधकामाची परवानगी न देता उलट तोडण्याच्या नोटीसा बजावल्या जातात, जव्हार मध्ये दाभोसा, जयविलास पॅलेस, हनुमान पॉर्इंट्स या सारख्या स्पॉटकडे जाण्यासाठी रस्ते करावेत.च्जिल्ह्यातील समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळे येथे मूलभूत सुविधा तातडीने निर्माण केल्या जाव्यात आदी मागण्या केळवे बीचपर्यटन उद्योग विकास संघाचे अध्यक्ष आशिष पाटील व हॉटेल, रिसॉर्ट, ढाबे व्यावसायिकांनी यावेळी जिल्हाधिकाºयांकडेकेल्यात. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघरVirarविरार