शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
6
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
7
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...
8
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
9
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
10
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
11
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
12
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
13
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
14
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
15
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
16
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
17
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
18
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
19
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
20
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...

वर्दीच्या फुकटेगिरीविरोधात हॉटेलवाले एकवटले

By admin | Updated: April 12, 2016 00:27 IST

फुकटचे खाऊन-पिऊन हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदाराला बडतर्फ केले पाहिजे, अशी मागणी करीत वसई तालुका हॉटेल असोसिएशनने पोलीसी अत्याचाराविरोधात आता

- शशी करपे,  वसईफुकटचे खाऊन-पिऊन हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदाराला बडतर्फ केले पाहिजे, अशी मागणी करीत वसई तालुका हॉटेल असोसिएशनने पोलीसी अत्याचाराविरोधात आता आवाज उठवला आहे. पोलीसी अत्याचारामुळे हॉटेल व्यावसायिक संतप्त झाले असून हवालदाराला बडतर्फ केले नाही तर बेमुदत बंद पुकारला जाईल, असा इशारा दिला आहे.गेल्या आठवड्यात माणिकपूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार नितीन नलावडे यांनी तृप्ती बारमध्ये दारू पिऊन बिल मागीतल्याने घिंगाणा घातला होता. तसेच हॉटेल मालकाला शिवीगाळ करीत मारहाण केली होती. याची तक्रार सीसीटीव्ही फुटेजसहीत केल्यानंतरही पोलिसांनी साधी एनसी नोंदवून नलावडेवर कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे संतापलेल्या हॉटेल व्यावसायिकांनी पोलीसी अत्याचाराचा पाढा सीसीटीव्ही फुटेजसह पत्रकारांपुढे मांडला. पोलीस हॉटेल व्यावसायिकांवर करीत असलेल्या अत्याचाराची सचित्र माहिती चक्रावून सोडणारी आहे. काही महिन्यांपूर्वी तुळींज पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल बैनवाड यांनी मोरेगाव येथील क्यू अँड क्यू बारमध्ये धिंंगाणा घातल्याचे चित्रीकरण दाखवण्यात आले. विरारमध्ये मनवेल पाडा येथील मनाली बार आणि वसईतील ग्रीन हाऊस बारमध्ये पोलिसांनी धिंंगाणा घातल्याचे चित्रीकरण हॉटेल व्यावसायिकांनी दाखवून पोलिस अत्याचाराने सीमा ओलांडल्याचा आरोप असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश हेगडे यांनी केला आहे. पोलिसांचा हा अत्याचार थांबवायचा असेल तर नलावडे सारख्या अत्याचारी पोलिसाला बडतर्फ करायलाच हवे, अशी मागणी हेगडे आणि त्यांच्या सहकार्यांनी केली आहे. नाकाबंदी, साहेबांचा दौरा, कार्यक्रंमासाठी हजारो रुपयांचे फुकटचे जेवण, बाराही महिने फुकटे बिसलरी पाणी ही फुकटेगिरी पोलिसांकडून सुरु आहे. आता बारमध्ये फुकटची दारू पिऊन धिंंगाणा घालू लागले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक त्रस्त झाले आहेत, असे हेगडे यांनी सांगितले. राज्य व केंद्र सरकारचे विविध पाच-सहा सेवा कर बार-परमीट रुमवाले हॉटेल व्यावसायिक •करीत आहेत, असे असताना पोलिसांचा अत्याचार सहन करावा लागत असून वर्दीच्या जाचाला कंटाळून वसईतील ७५ टक्के हॉटेलवाले व्यवसाय बदलायच्या मनस्थितीत आहेत, असेही हेगडे यांनी सांगितले.