शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहात, कुणी प्रवेश देता का प्रवेश!, नववीच्या विद्यार्थ्यांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 05:32 IST

नववीच्या विद्यार्थ्यांची व्यथा : अच्छे दिन फक्त कागदावर

शौकत शेख 

डहाणू : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार ठरलेल्या निवासी शासकीय वसतीगृहातील २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात नववीच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास प्रकल्पाने प्रवेश नाकारल्याने आदिवासी विद्यार्थी, पालक तसेच विविध आदिवासी संघटनामधुन संताप व्यक्त होत असून शिक्षणासाठी आदिवासी मुलामुलींना दररोज वीस ते पंचवीस कि.मी. अंतरावरून शाळेत ये-जा करण्याची वेळ आली आहे.

बहुसंख्य आदिवासी लोकवस्ती असलेल्या डहाणू, तलासरी, पालघर, वसई तालुक्यातील दुर्गम भागांत राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना मुंबई, वसई, पालघर, डहाणू, बोर्डी, कासा भागांतील महाविद्यालयात शिक्षण घेता यावे म्हणून शासनाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत रेल्वे स्टेशन, मुख्य बाजारपेठ, तसेच महत्वाच्या शहरात निवासी शासकीय वस्तीगृह सुरू केले त्यामुळे बहुसंख्य माध्यमिक तसेच उच्चशिक्षण घेणाºया हजारो आदिवासी विद्यार्थ्यांची सोय झाली. परंतु गेल्या दोन वर्षापासून आदिवासी प्रकल्पाने शासकीय वसतीगृहाच्या प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू कैैल्यान दºया खोºयांत राहणाºया आदिवासी विद्यार्थी तसेच पालकांचा गोधळ उडला आहे.गेल्या पाच ते सहा महिन्यापासून डहाणू प्रकल्प कार्यालयात स्वतंत्र प्रकल्प अधिकारी नसल्याने शासकीय वसतीगृह तसेच निवासी आश्रमशाळांचा प्रश्न गंभीर झाला आहे. विशेष म्हणजे शाळा, महाविद्यालय सुरू होण्यापूर्वीच निवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचा प्रवेश, सोयी-सुविधांबरोबरच अहाराचे नियोजन करणे आवश्यक असतांना देखिल, जून महिन्याचे म्हणजेच शाळा, महाविद्यालय सुरू झाल्यानंतर वस्तीगृह क्षमता, वाढीव इमारत क्षमता बाबतीत प्रस्ताव पाठविले जात असल्याने चार, पांच, महिने वस्तीगृह प्रवेशासाठी आदिवासी मुला-मुलींना वाट पहावी लागते. या प्रकल्पाअंतर्गत डहाणू, तलासरी, पालघर, वसई येथे १७ निवासी शासकीय वस्तीगृह आहेत. गेल्या पंधरा वर्षात शिक्षण घेणाºया आदिवासी मुलांची संख्या दुप्पट, तिप्पट, झाली असतांना मात्र शासकीय वस्तीगृह तसेच आश्रम शाळेची संख्या व क्षमता जैैसे थे असलयाने दर वर्षी शेकडो मुले मुली वस्तीगृहापासून वंचीत राहत असतात. जिल्हयात वस्तीगृहाची एक इमारत वाढत नसलयाने डोंगरकुशीत राहणाºया आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षाणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, वर्ष २०१७-१८ मधील शासकीय निवासी वस्तीगृहात नववीचे २९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. मात्र यावर्षी नववीचे एक ही विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेला नाही. या बाबतीत डहाणू आदिवासी प्रकल्प कार्यालयात चौकशी केली असता. शासन निर्णया प्रमाणे नववीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले आहे. असे सांगण्यात आले. गेल्या वर्षी निवासी वस्तीगृहात १७ वस्तीगृह एकूण १६०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. यावर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होऊन चार महिने उलटले तरी केवळ १३०० विद्यार्थ्यांनाच अद्याप प्रवेश देण्यात आला आहे. उर्वरित ३०० विद्यार्थी हे अद्याप वस्तीगृह प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहे. शिवाय बोर्डी, तसेच कासा येथील मुलांचे वस्तीगृहात इमारत क्षमतेनुसार अद्याप विद्यार्थ्यांची जागा रिक्त असतांना ही तिथे अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नसल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गैर सोय झाली आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारthaneठाणेStudentविद्यार्थी