शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

वसई तालुक्यात हितेंद्र ठाकूरांना धक्का, पाच ग्रामपंचायती बविआ विरोधकांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:04 IST

या तालुक्यातील आठ पैकी पाच ग्रामपंचायतींमध्ये बविआ विरोधकांचे सरपंच निवडून आले आहेत. तालुक्यावर सत्ता गाजवणाºया बहुजन विकास आघाडीला फक्त तीनच सरपंचपदांवर समाधान मानावे लागले आहे.

- शशी करपे ।वसई : या तालुक्यातील आठ पैकी पाच ग्रामपंचायतींमध्ये बविआ विरोधकांचे सरपंच निवडून आले आहेत. तालुक्यावर सत्ता गाजवणाºया बहुजन विकास आघाडीला फक्त तीनच सरपंचपदांवर समाधान मानावे लागले आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या वसई विधानसभा मतदारसंघातील पाचपैकी चार ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवून विरोधकांनी ठाकूरांना धक्का दिला आहे.वसई तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सरपंचांच्या थेट निवडीसह पार पाडल्या. बहुजन विकास आघाडी आणि श्रमजीवी संघटनेत गावात आपापसात समझौता झाल्याने पूर्व पट्टीतील टोकरे-खैरापाडा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. याठिकाणी सरपंचपदी श्रमजीवी संघटनेच्या अनिता देसक बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर श्रमजीवीचे पाच आणि आघाडीचे चार सदस्य बिनविरोध निवडून आले होते. खर्डी ग्रामपंचायतीत सात पैकी सहा जागा आघाडीने बिनविरोध जिंकल्या होत्या. त्याचबरोबर आघाडीच्या रेखा भोईर सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर एका सदस्यासाठी निवडणूक झाली. ती जागा बहुजन विकास आघाडीने जिंकली. पूर्व पट्टीतील टिवरी ग्रामपंचायत आघाडीने शिवसेनेकडून खेचून घेतली. याठिकाणी शिवसेनेतच बंडाळी झाल्याने आघाडीने नऊपैकी सहा जिंकल्या. तर शिवसेनेला फक्त दोन जागा जिंकता आल्या. एक अपक्ष निवडून आला. शिवसेनेचे विद्यमान सरपंच चंद्रकांत चौधरी यांना बंटी पाटील या अपक्षाने पराभूत केले. सरपंचपदी आघाडीच्या बाजारी नरेश ठक्कर निवडून आल्या.पूर्व पट्टीत आघाडीने तीन पैकी दोन ग्रामपंचायती जिंकल्या असल्या तरी पश्चिम पट्टयात मात्र आघाडीला फक्त एकच ग्रामपंचायत जिंकता आली. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मतदारसंघात विरोधकांनी एकजूट करून पाचपैकी चार ग्रामपंचायती जिंकून ठाकूरांना धक्का दिला. विवेक पंडित यांच्या जनआंदोलनाकडे असलेल्या खोचिवडे ग्रामपंचायतीतील ९ सदस्य आणि सरपंचपद आघाडीने जिंकून एकहाती सत्ता खेचून आणली. याठिकाणी सरपंचपदी आघाडीचे नंदकुमार वैती निवडून आले.विवेक पंडित यांच्या वसईतील राजकारणातून एक्झिट झाली असली तरी कोणतेही नेतृत्व नसतांनाही जनआंदोलन समिती जिवंत ठेवण्याची धडपड काही कार्यकर्ते करीत आहेत. त्यांना यावेळी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेची साथ मिळाली. त्यामुळे या एकजुटीने पश्चिम पट्ट्यात ठाकूरांना रोखण्यात यश मिळविले. रानगाव ग्रामपंचायत स्वबळावर लढवून भाजपाने ८ जागा जिंकल्या. आघाडीला दोन तर शिवसेनेला एक-एक जागा जिंकता आली. सरपंचपदी भाजपाच्या निलम मेहेर निवडून आल्या.टेंभी-कोल्हापूर ग्रामपंचायतीच्या ११ पैकी सहा जागा बहुजन विकास आघाडीने जिंकल्या. पाच जागी जनआंदोलन, भाजपा आणि शिवसेना आघाडी निवडून आली असून सरपंचपदी आघाडीच्या माधुरी मांगेला निवडून आल्या. विद्यमान सरपंच पुष्पा घोरविंदे यांना पराभव पत्करावा लागला. वासळई ग्रामपंचायतीत विरोधकांनी ग्रामसुधारणा मंडळाच्या माध्यमातून ११ पैकी ७ जागा जिंकल्या. बहुजन विकास आघाडीला सहा जागा जिंकता आल्या. सरपंचपदी मंडळाच्या जसिंता कोलासो निवडून आल्या.कांँग्रेसमध्ये झालेल्या बंडाळीमुळे तरखड ग्रामपंचायत निवडणुकीकडे सगळ््यांचे लक्ष लागले होते. काँग्रेसचे माजी जिल्हा सचिव बिपीन कुटीन्हो यांनी जनआंदोलन समिती आणि शिवसेनेशी युती करून उमेदवार मैदानात उतरवले होते.तर काँग्रेसचेही अधिकृत उमेदवार मैदानात होते. असे असतानाही कुटीन्हो यांच्या आघाडीने ९ पैकी ७ सात जागा जिंकून सरपंचपदी सचिन किणी यांनाही निवडून आणले. तर बहुजन विकास आघाडीला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले.विरोधक यशस्वीआपल्या मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकांकडे ठाकूर स्वत: जातीने लक्ष ठेवून होते. त्यांनी प्रचारातही भाग घेतला. मतदानाच्या दिवशी या परिसरात ते ठाण मांडून बसले होते. बहुजन विकास आघाडीनेही या भागावर लक्ष केंद्रीत केले होते. दुसरीकडे, विरोधकांकडे कोणतेही नेतृत्व नव्हते. उलट तरखडसारख्या ठिकाणी बंडाळी झाली होती. असे असतांनाही विरोधकांनी पाच पैकी चार सरपंच निवडून आणून ठाकूरांना धक्का देण्याचे काम केले.