शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

हितेंद्र ठाकूर यांनी खानिवली प्रचारसभेत डागली भाजपवर तोफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 02:08 IST

बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भाजपच्या सरकारवर आणि पालघरच्या पालकमंत्र्यांवर तसेच शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यावर टीकेची तोफ डागली.

वाडा : पालघर लोकसभा मतदार संघाचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांच्या प्रचारसाठी वाडा तालुक्यातील खानिवाली येथे झालेल्या प्रचार सभेत बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भाजपच्या सरकारवर आणि पालघरच्या पालकमंत्र्यांवर तसेच शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यावर टीकेची तोफ डागली.भाजपने जुन्याच योजनांना नविन नावे देऊन त्या चालू ठेवल्या आहेत. त्यांना कोणत्याही नविन योजना आणता आलेल्या नाहीत. एक खोट दहा वेळा बोलल की लोकांना खर वाटायला लागत तसेच काम भाजपचे चालू आहे. शेतकऱ्यांच्या मालाला दीड पट भाव देणार होते. तो न देताच आत्ता डबल हमीभाव देण्याची घोषणा करण्यात आली. गुजरातच्या विकासाचे मार्केटींग करण्यात आले मात्र आपल्या पेक्षाही अधिक गरीबी गुजरातमध्ये असल्याचा दावाही या वेळी हितेंद्र ठाकूर यांनी या सभेमध्ये केला.निवडणुका आल्यात की वसई-विरारची गुंडगिरी संपविण्याची भाषा केली जाते. पाच वर्ष सत्ता तुमचीच होती तेव्हा का नाही आमची गुंडगिरी संपविली असा प्रश्न ठाकूर यांनी केला. बाळासाहेब म्हणत होते कार्यकर्ता गुंड असला तरी चालेल मात्र षंढ असता कामा नये, तुम्ही म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत मात्र जनतेच्या सुखसोर्इंसाठी आणि त्यांच्या भल्यासाठीचे आम्ही गुंड आहोत अशी खोचक टीका त्यांनी या वेळी सत्ताधाऱ्यांवर केली.दोन दिवसापूर्वी सर्वांच्या भेटीगाठी घेऊन प्रचार करणाºया श्रीनिवास वनगा यांचा पालघर लोकसभेच्या उमेदवारीचा पत्ता कट करून वाºयावर सोडण्याचे काम शिवसेनेने केले असून फक्त खर्च करणारा उमेदवार पाहिजे होता म्हणून भाजपमधून शिवसेनेत घेऊन राजेंद्र गावितांना तिकीट देण्यात आले असे सांगून या पक्षातून त्या पक्षात फक्त सत्तेसाठी बेडूक उडी मारणाºया गावितांवर टीकेची झोड उठवून पालघर जिल्ह्यात शिवसेनेला एकही स्थानिक आदिवाशी उमेदवार मिळाला नाही का..? अनेक पक्षात फिरणारा उमेदवार तुमचे आमचे हित साधणार आहे का..? असे प्रश्न उपस्थित करून मतदानातून हे नंदुरबारचे पार्सल नंदुरबारला पाठविण्याचे आवाहन ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना केले.पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री हे भाजपचे आहेत मात्र त्यांना जिल्ह्यात विकासकामे करता आलेली नाहीत. जिल्हा नियोजनाच्या बैठकीमधे विकासकामे करण्यासाठी आम्ही सांगून सांगून थकलो मात्र पालकमंत्री नियोजनाच्या बैठकीत काही बोलायला तयार नाहीत तसेच त्यांचा अधिकाºयांवर कोणताही वचक उरलेला नाही. राज्याच्या विधिमंडळामधे खोटी माहिती देण्याचे कामे आदिवासी विकास मंत्र्यांकडून करण्यात आले आहे. आदिवासी प्रकल्पात ३५० जणांची भरती करण्यात आली. या ३५० जागांच्या भरतीमध्ये पालघर जिल्ह्याच्या एकाही स्थानिक उमेदवाराला स्थान न देता परजिल्ह्यातील लोकांना नोकºया देण्यात आल्याचा आरोप हितेंद्र ठाकुर यांनी या सभेत केला. या सभेवेळी आमदार हितेंद्र ठाकुर, राष्ट्वादीचे पालघर जिल्हा अध्यक्ष सुनील भुसारा, ठाणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सुनिल धानवा, मनीष गनोरे, सचिन शिंगडा आदी उपस्थित होते.>चिन्हाबाबत विरोधकांकडून घाणेरडे राजकारणचिन्हाबाबत विरोधकांकडून घाणेरडे राजकारण केले गेले. मात्र चिन्हाबाबत लोकांत एवढी उत्सुकता होती की रिक्षा ही निशाणी रात्री साडेबारा वाजता मिळाली आणि ही निशाणी रातोरात घरोघरीही पोहचली आणि रिक्षा या चिन्हाचा प्रचार आत्ता विरोधकही आपल्या प्रचारादरम्यांन करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. त्याच बरोबर आम्ही शांत बसणारे नाही आम्ही चिन्हाबबत आमच्यावर झालेल्या अन्यायाबाबत आम्ही निवडणूक आयोग तसेच न्यायालायात तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.