शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

जनता दरबारात हितेंद्र ठाकूर यांची आयुक्तांना दमदाटी; ऑफिसमध्ये येऊन फटकावेन, अशी दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 09:44 IST

सामान्य नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांचे पालिका अधिकाऱ्यांकडून योग्य उत्तर मिळत नसल्याचे पाहून हितेंद्र ठाकूर चांगलेच संतापले.

लोकमत न्यूज नेटवर्क, विरार : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत वसई-विरार महापालिका मुख्यालयात जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी सामान्य नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांचे पालिका अधिकाऱ्यांकडून योग्य उत्तर मिळत नसल्याचे पाहून वसई विधानसभा मतदारसंघाचे आमदार हितेंद्र ठाकूर चांगलेच संतापले. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरत चक्क शिवीगाळ केली. तसेच महापालिका आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांना ‘ऑफिसमध्ये येऊन फटकावेन’ अशा भाषेत दमदाटी केली. 

अनधिकृत बांधकामे, अनियमित पाणीपुरवठा, अनधिकृत पार्किंग व आठ वर्षांपासून रखडलेले फेरीवाला धोरण, महावितरणचा गैरकारभार, अशा विविध समस्यांवर सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी आमदार ठाकूर यांच्यासमोर पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना प्रश्न केले. जनतेच्या या प्रश्नांचा प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या खुलाशाने नागरिकांचे समाधान होत नसल्याचे पाहून आमदारांनी भर सभागृहात उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरत शिवीगाळ केली. तर काही प्रश्नांवर उत्तर देणाऱ्या अन्य अधिकाऱ्यांना गप्प करत  मला पालिका आयुक्तांकडूनच उत्तर हवे, असेही खडसावले.

नागरिकांनी उपस्थित केलेल्या सर्व समस्यांवर दोन दिवसांत तोडगा काढला जाईल. जेथे कारवाई करावी लागेल, त्याठिकाणी कारवाई करून प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जनता दरबारात नागरिकांना दिले.

महापालिकेवर प्रशासकीय राजवट

मागील तीन वर्षांपासून वसई-विरार महापालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. या काळात अधिकारी ऐकेनासे झाले आहेत. त्यांना आपला धाक राहिलेला नाही, असा समज बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांचा झालेला आहे. अधिकाऱ्यांचा हा समज खोटा ठरवण्यासाठी व नागरिकांत आपली वाहवा घडवून आणण्यासाठीच आमदारांनी जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांना जनता दरबारात धारेवर घेतले असावे, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारHitendra Thakurहितेंद्र ठाकूर