शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

'मी विजबिल भरणार नाही, तुम्हीही भरू नका', हितेंद्र ठाकुरांचे वसईकरांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 23:13 IST

चक्क लॉकडाऊन काळात हितेंद्र ठाकूर यांना पाच बिले मिळून तब्बल  5 लाख 50 हजारांचे विजबिल महावितरणने पाठवल्याने त्यांनी महावितरण व राज्य सरकारवर टीका करत प्रचंड रोष व्यक्त केला आहे.

वसई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात विरारस्थित शाळा, कॉलेज बंद असताना देखील माझ्या  निवासस्थानासह अवास्तव आलेली साडेपाच लाखांची विजबिले मी अजिबात भरणार नाही, किंबहुना जी विजबिलं योग्य आहेत. ती त्यांनी जरूर भरावी. मात्र अवास्तव बिले तुम्हीही भरू नका, असे जाहीर आवाहनच आता वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर यांनी वसईतील जनतेला केले आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विरारस्थित विवा कॉलेज, शाळा व घराचे विजबिल भरमसाठ आले असून त्यांना पाच बिलं मिळून  चक्क 5 लाख 50 हजारांचे विजबिल आले असल्याची माहिती स्वतः आम हितेंद्र ठाकूर यांनी शनिवारी विरार येथे लोकमतशी बोलताना दिली.

राज्यभरात विजबिलाच्या असंख्य तक्रारींचा महापूर सुरू असताना सततच्या तक्रारींनी राज्य सरकारचीही डोकेदुखी कमालीची वाढली आहे. यात सर्वसामान्यांपासून राजकीय नेते, व्यवसायिक असतील तर यात सेलिब्रिटीं देखील असून अशा अनेकांनी जाहीररित्या वाढीव व अवास्तव विजबिलाबाबत प्रंचड रोष व्यक्त केला आहे. यामध्ये आता हितेंद्र ठाकूर यांचाही समावेश झाला आहे. चक्क लॉकडाऊन काळात हितेंद्र ठाकूर यांना पाच बिले मिळून तब्बल  5 लाख 50 हजारांचे विजबिल महावितरणने पाठवल्याने त्यांनी महावितरण व राज्य सरकारवर टीका करत प्रचंड रोष व्यक्त केला आहे. सर्वसामान्य नागरिक हैराण असून महावितरण नागरिकांना अवास्तव विजबिलं पाठवत असून अशी अवास्तव विजबिलं नागरिकांनी अजिबात भरू नये मी तुमच्या सोबत आहे. मात्र विजबिलं योग्य असतील तर जरूर भरा,असे आवाहन आता या निमित्ताने हितेंद्र ठाकूर यांनी वसईकरांना केले आहे

कोरोना संकटात आधीच जनता हैराण आहे. त्यामुळे नागरिकांना वेठीस धरु नये. कंपनी, उद्योगधंदे बंद आहेत. नोकऱ्या नाहीत, कुठं पगार नाहीत तर बहुतांश वेतन कपात देखील सुरू आहे. त्यातच लॉकडाऊनमध्ये सर्व काही बंद असून विजबिले अवास्तव कशी येऊ शकतात तर मुंबईत अदानी व अंबानी यांच्या युनिटच्या दरापेक्षा आपल्या शासनाचे वीजदर अधिक आहेत तर लॉकडाऊन सरकारने केला त्याची चूक हकनाक नागरिकांना का?  तर यावर तोडगा काढा जनतेला दिलासा द्या, असे हितेंद्र ठाकूर यांनी राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार