शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
4
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
5
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
6
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
7
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
8
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
9
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
10
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
11
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
13
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
14
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
15
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
16
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
17
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
18
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
19
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
20
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश

कासा भागात जोरदार; शेतीच्या कामांना आता येणार वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:31 IST

डहाणू तालुक्यातील कासा भागात शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. पेरणी केलेल्या पिकाला पाणी मिळाले असून बळीराजा सुखावला आहे.

- शशिकांत ठाकूरकासा  - डहाणू तालुक्यातील कासा भागात शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. पेरणी केलेल्या पिकाला पाणी मिळाले असून बळीराजा सुखावला आहे.कासा भागात पावसाअभावी भात पेरण्या खोळंबल्या होत्या तर सायवन भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. तर ज्या शेतकऱ्यांनी सुरु वातीला पेरण्या केल्या त्याचे पीक पावसाअभावी करपू लागले होते. काही शेतकऱ्यांनी मोटारने, इंजिनने पाणी देऊन ती वाचविली. परंतु जेथे हे शक्य नव्हते तेथील बियाणे पाण्याअभावी न रुजल्याने वाया गेली. मात्र शुक्र वारी सकाळपासून पावसाने जोरदार सुरुवात केल्याने कासा भागातील शेतीत मोठ्या प्रमाणावर सर्वत्र पाणी साचलेले होते. त्यामुळे शेतीच्या कामाना आता वेग येणार असून रखडलेली भात शेतीची पेरणी व नांगरणीची कामे सुरू होणार आहेत. कारण गेल्या पंधरा दिवसापासून शेतकरी पावसाची वाट पाहात होते. उशिरा पावसामुळे यंदा पेरणी बरोबरच रोपणीची कामेही लांबणीवर जाणार आहेत. तर यापुढेही पाऊस असाच सुरू राहिला तर भाताचे पीक चांगले येईल.कुडूसची बाजारपेठ जलमयवाडा : गेले अनेक दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. मात्र गुरूवारपासून पावसाचे पुन्हा आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे. दरम्यान, रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असल्याने बाजारपेठेत सर्वत्र पाणी तुंबल्याने कुडूस गाव पाण्यात गेले आहे. पावसाअगोदर गटारीची साफसफाई न केल्याने पाणी तुंबल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.वाडा तालुक्यातील अनेक शेतकºयांनी कोरड भात पेरणीची कामे केली होती. मात्र त्यानंतर आठ ते दहा दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. आता कालपासून पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात शेतकºयांनी भात, नाचणी, वरई यांची कोरड पेरणीची कामे निम्म्याहून अधिक पूर्ण केली होती. कोरड पेरण्या झाल्यानंतर आठ दहा दिवस पाऊस गायब झाला होता. तो कालपासून संततधार बरसतो आहे. 

टॅग्स :RainपाऊसVasai Virarवसई विरार