शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

कासा भागात जोरदार; शेतीच्या कामांना आता येणार वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:31 IST

डहाणू तालुक्यातील कासा भागात शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. पेरणी केलेल्या पिकाला पाणी मिळाले असून बळीराजा सुखावला आहे.

- शशिकांत ठाकूरकासा  - डहाणू तालुक्यातील कासा भागात शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. पेरणी केलेल्या पिकाला पाणी मिळाले असून बळीराजा सुखावला आहे.कासा भागात पावसाअभावी भात पेरण्या खोळंबल्या होत्या तर सायवन भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. तर ज्या शेतकऱ्यांनी सुरु वातीला पेरण्या केल्या त्याचे पीक पावसाअभावी करपू लागले होते. काही शेतकऱ्यांनी मोटारने, इंजिनने पाणी देऊन ती वाचविली. परंतु जेथे हे शक्य नव्हते तेथील बियाणे पाण्याअभावी न रुजल्याने वाया गेली. मात्र शुक्र वारी सकाळपासून पावसाने जोरदार सुरुवात केल्याने कासा भागातील शेतीत मोठ्या प्रमाणावर सर्वत्र पाणी साचलेले होते. त्यामुळे शेतीच्या कामाना आता वेग येणार असून रखडलेली भात शेतीची पेरणी व नांगरणीची कामे सुरू होणार आहेत. कारण गेल्या पंधरा दिवसापासून शेतकरी पावसाची वाट पाहात होते. उशिरा पावसामुळे यंदा पेरणी बरोबरच रोपणीची कामेही लांबणीवर जाणार आहेत. तर यापुढेही पाऊस असाच सुरू राहिला तर भाताचे पीक चांगले येईल.कुडूसची बाजारपेठ जलमयवाडा : गेले अनेक दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. मात्र गुरूवारपासून पावसाचे पुन्हा आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे. दरम्यान, रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असल्याने बाजारपेठेत सर्वत्र पाणी तुंबल्याने कुडूस गाव पाण्यात गेले आहे. पावसाअगोदर गटारीची साफसफाई न केल्याने पाणी तुंबल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.वाडा तालुक्यातील अनेक शेतकºयांनी कोरड भात पेरणीची कामे केली होती. मात्र त्यानंतर आठ ते दहा दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. आता कालपासून पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात शेतकºयांनी भात, नाचणी, वरई यांची कोरड पेरणीची कामे निम्म्याहून अधिक पूर्ण केली होती. कोरड पेरण्या झाल्यानंतर आठ दहा दिवस पाऊस गायब झाला होता. तो कालपासून संततधार बरसतो आहे. 

टॅग्स :RainपाऊसVasai Virarवसई विरार