शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

आरोग्य उपकेंद्रच मरणपंथाला

By admin | Updated: January 12, 2017 05:50 IST

आरोग्यासाठी बनवलेल्या नंडोरे येथील आरोग्य उपकेंद्राची असूनही नसल्यासारखी गत आहे. परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात

निखिल मेस्त्री / नंडोरेआरोग्यासाठी बनवलेल्या नंडोरे येथील आरोग्य उपकेंद्राची असूनही नसल्यासारखी गत आहे. परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदने २००७ साली ५ लाख ७२ हजार ३४४ रुपये खर्च करून या वास्तूची उभारणी केली. मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नंडोरे-देवखोप ग्रामपंचायतीत व ग्रामपंचयातीसमोर असलेले हे उपकेंद्र जेव्हा पहावे तेव्हा बंदच असल्याचे गावकाऱ्यांचे म्हणणे असून आरोग्य सेवा घेण्यासाठी आलेल्या येथील लोकांना खाजगी दवाखान्याची वाट धरावी लागते आहे. या परिसरापासून मासवण व पालघरचे प्राथमिक आरोग्य केंद्र दूर आहे. गावातच शासकीय सेवा असूनही खाजगी दवाखान्यात जाणे येथील लोकांना परवडत नाही तरीही पदरमोड करून प्रवासभाडे करून तेथे जाण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही व यामुळे येथील गावकाऱ्यांची ससेहोलपाट होते आहे.भव्य जागेत कुंपण बंदिस्त व सुंदर असे बांधलेले हे आरोग्य उपकेंद्र फक्त दिसण्यापूरतेच सुंदर आहे. तेथे जर आरोग्य सुविधाच मिळत नसतील तर हे आरोग्य उपकेंद्र सुंदर असण्याचा काय फायदा व लक्षावधी रुपये खर्चून लोकसेवेसाठी बांधलेले व लोकार्पण झालेले हे उपकेंद्र बंद राहत असेल तर शासनाने या उपकेंद्रासाठी एवढा खर्च कशासाठी करावा असा प्रश्न आहे. या आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका नाही. उपकेंद्रात कायमस्वरूपी निवासी आरोग्यसेविका गरजेचे असतांना व त्या उपकेंद्रातच राहणे अपेक्षित असतांना फिरतीचा कार्यक्र म लावून त्या आठवडाभर त्यांचा कामानिमित्त अन्यत्र फिरत असतात. त्या पाड्यावर किंवा अन्य ठिकाणी फिरतीवर गेल्या की हे उपकेंद्र बंदच राहते. उपकेंद्राबाहेरील पाटीवर सिस्टर अमूक ठिकाणी गेल्या आहेत असे खडूने लिहिलेली पाटी दिसते व केंद्राला ठोकलेले टाळे ही दिसते. असे महिन्यातून बऱ्याचदा होते व अशा वेळेस रु ग्ण येथे उपचारार्थ आला असता त्याची निराशा होते व न परवडणाऱ्या खाजगी दवाखान्याची वाट त्याला धारावी लागते. या उपकेंद्रातील आरोग्यसेविका कामानिमित्त बाहेर जात असतील तर इथे आरोग्यसेविकेचे आणखीन एक पद निर्माण करून ते का भरल ेजात नाही? असा जनतेचा सवाल आहे. नंडोरे-देवखोप ग्रामपंचायतीतील सुमारे १४ पाडे असून येथील आश्रमशाळा तसेच परिसरातील गाव-पाडे व पडघा येथील आश्रमशाळा याच उपकेंद्राच्या परिसरात आहेत. असे असताना येथे किमान २ पदे आरोग्यसेविकेची हवीत पण याउलट येथे एकच निवासी पद कार्यरत आहे. त्यातही फिरतीच्या कार्यक्र मामुळे अनियमतिता आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना याविषयी विचारले असता त्यांनी याबाबतीत आश्वासने दिली पण ती सत्यात मात्र कधी उतरलेली नाहीत. जर महिन्याभरात हा प्रश्न सुटला नाही तर उग्र आंदोलन करण्याच्या मनस्थितीत येथील रहिवासी आहेत.जिल्हा परिषदेच्या तडफदार मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी आणि जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यात लक्ष घालून रुग्णांना दिलासा देतील काय याकडे सगळ््या जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.