शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
2
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
3
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
4
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
5
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
6
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न
7
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
8
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
9
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
10
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
11
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
12
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
13
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
14
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
15
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
16
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
17
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
18
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
19
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
20
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!

डम्पिंग दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 00:56 IST

भोयदापाडा येथे पालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे.

नालासोपारा : वसई पूर्वेकडील भोयदापाडा येथील गोखिवरे गावाच्या हद्दीत वसई - विरार महानगरपालिकेचे डम्पिंग ग्राऊंड आहे. तेथील कचऱ्याचे योग्य प्रकारे नियोजन होत नसल्याने आसपास राहणाºया नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होते आहे. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.भोयदापाडा येथे पालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे. शहरातून जमा केला जाणारा ओला तसेच सुका कचरा या ठिकाणी आणून टाकला जातो. परंतु, घनकचरा प्रकल्प बंद पडल्याने येथे कचºयाचे ढिग साचले आहेत. मध्यंतरी महानगरपालिकेने तात्पुरता पर्याय म्हणून कचरा ढिगाºयाच्या सपाटीकरणाचे काम हाती घेतले होते. आता तर कचरा पेटत असल्याने वातावरणात पसरणाºया दूषित धुरामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दररोजची दुर्गंधी व घाणीमुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून सत्ताधारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नेतेमंडळी तसेच मनपा अधिकाऱ्यांना अधिकाºयांना आमच्या समस्यांबाबत कोणतेही सोयरसुतक नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रात्री भोयदापाडा आणि आसपासच्या परिसरात कचºयाची दुर्गंधी पसरत असल्याने ग्रामस्थांना श्वासोच्छवास घेणेही दुरापास्त होऊन बसले आहे. तर दुसरीकडे या कचºयाच्या धुरामुळे ग्रामस्थांना श्वसन विकारासह उलट्या, डोळ्यांची जळजळ, पोटदुखी, जुलाब, दमा अशा आजारांना तोंड द्यावे लागत आहे.मनपा घनकचरा व्यवस्थापन अपयशी?वसई विरार मनपाची गोखिवरे येथील सर्व्हे नंबर ३० (हिस्सा क्रमांक अ - ३१, ३२) येथे १९ हेक्टर जागेवर डम्पिंग ग्राऊंड आहे. ठाणे जिल्हाधिकाºयांकडून घनकचरा प्रकल्पासाठी २०१४ मध्ये ५० एकर जागा नि:शुल्क देण्यात आली होती. महानगरपालिकेला १० वर्ष पूर्ण होऊनही गोखिवरे येथील घनकचरा प्रकल्पात निरंक प्रक्रिया होत नाही.सध्या महानगरपालिका क्षेत्रात दररोज ८०० मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. घनकचरा व्यवस्थापनासाठी महानगरपालिकेने ४१३ कोटींचा प्रकल्प आखला होता. मात्र त्याची अंमलबजावाणी होत असल्याचे दिसून येत नाही. या कचºयाचे वर्गीकरण होत नाही. मिथेन गॅस, जैवइंधन (बायोगॅस) तसेच खत तयार केले जात नाही. परिणामी या कचºयाचे डोंगर दिवसेंदिवस वाढत आहेत.डंपिंग ग्राऊंडवर सध्या घनकचरा प्रकल्प नाही. २०१३ मध्ये तो जळून गेला आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून येथे ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात आहे.- माधव जवादे, शहर अभियंताडंपिंग ग्राऊंडच्या धुरामुळे या परिसरात राहणाºया रहिवाशांना श्वसनाचे अनेक आजार झाले आहे. धुरामुळे घसा दुखणे आणि डोळ्यांची आग होत आहे.- शंभू चौधरी, गोखिवरेआग लागल्यावर निघणाºया धुरामुळे घराचे दरवाजे, खिडक्या बंद ठेवायला लागते. धुरामुळे घसा खवखवतो, उलटीचाही त्रास होतो.- रेणुका यादव, स्थानिक

टॅग्स :Vasai Virarवसई विरार