शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
3
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
4
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
6
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
7
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
8
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
9
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
11
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
12
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
13
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
14
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
15
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
16
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
17
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
18
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 
19
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
20
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही

भाईंदरमध्ये 'डीप क्लीन ड्राईव्ह' मोहिमेवेळी फेरीवाले गायब; आयुक्त गेल्यावर पुन्हा फेरीवाल्यांचे अतिक्रमण

By धीरज परब | Published: February 09, 2024 7:22 PM

नागरिकांना रस्ते-पदपथ मोकळे करून न देण्यात पालिकेचा फेरीवाल्यांसोबतच अर्थपूर्ण सुसंवाद पुन्हा स्पष्ट झाला आहे.

मीरारोड: मीरा भाईंदर शहरातील प्रमुख ठिकाणे, नाके, रस्ते, रेल्वे स्थानक आदी परिसरात प्रचंड प्रमाणात फेरीवाल्यांचे अतिक्रमण राजरोस दिसत असताना महापालिका आयुक्तांच्या डिप क्लीन ड्राइव्ह वेळी मात्र भाईंदर पश्चिम प्रभाग समिती २ मधील रस्ते चक्क फेरीवाला मुक्त पाहून नागरिकांना सुखद पण आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. परंतु आयुक्त यांची पाठ वळल्यावर पुन्हा रस्ते-पदपथ फेरीवाल्यांनी बळकावले. त्यामुळे नागरिकांना रस्ते-पदपथ मोकळे करून न देण्यात पालिकेचा फेरीवाल्यांसोबतच अर्थपूर्ण सुसंवाद पुन्हा स्पष्ट झाला आहे.

रेल्वे स्थानक पासून १५० मीटर तर शैक्षणिक संकुल, रुग्णालय, धार्मिक स्थळ पासून १०० मीटर पर्यंतच्या परिसरात फेरीवाले - हातगाडी वाल्याना मनाई आहे. शिवाय महापालिकेने शहरातील अनेक मुख्य रस्ते हे ना फेरीवाला क्षेत्र जाहीर केलेले असून ठिकठिकाणी तसे फलक सुद्धा पालिकेने लावलेले आहेत. परंतु तरी देखील ह्या प्रतिबंधात्मक क्षेत्रात उलट सर्वात जास्त फेरीवाल्यांचे अतिक्रमण आहे.

रेल्वे स्थानके, महामार्ग, मुख्य रस्ते, प्रमुख नाके, ना फेरीवाला क्षेत्राचे रस्ते-पदपथ हे निदान नागरिकांच्या हिताचा विचार करून रहदारी आणि वाहतुकीसाठी मोकळे ठेवण्याची मुख्य जबाबदारी महापालिका आणि गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांची आहे. मात्र ह्यात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या कमाई मुळे फेरीवाले बसवणे व त्यांना संरक्षण देणे हे चराऊ कुरण बनले आहे.

त्यामुळेच महापालिका आयुक्त संजय काटकर पासून उपायुक्त मारुती गायकवाड, प्रभाग समिती अधिकारी, फेरीवाला पथक आदी कोणीच शहरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमण मुळे होणारी अडचण व कोंडी सोडवण्यास इच्छूक दिसत नाही. फेरीवाल्यांकडून वसुली प्रकरणी पालिकेचे हात देखील लाच लुचपत प्रतिबंधक शाखेच्या कारवाईत अडकलेले होते.

एरव्ही फेरीवाल्यांवर सातत्याने ठोस कारवाई पालिके कडून होत नसताना गुरुवारी मात्र भाईंदर पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, डॉ बाबासाहेब आंबेडकर ६० फुटी मार्ग, मोदी पटेल मार्ग, खाऊ गल्ली आदी विविध ठिकाणी एकही फेरीवाल्याची गाडी लागलेली नव्हती. एरव्ही चालायला जागा न ठेवणारे हे फेरीवाले असे दिसेनासे होऊन तसेच रस्ते-पदपथ मोकळे पाहून नागरिकांना सुद्धा सुखद धक्का बसला. परंतु नंतर लक्षात आले की, आयुक्त काटकर हे डिप क्लीन ड्राइव्ह साठी येणार असल्याने अधिकारी-कर्मचारी यांनी आधीच अर्थपूर्ण सुसंवाद साधून परिसर मोकळा ठेवला होता. आयुक्तांनी देखील अधिकाऱ्यांसह येऊन परिसरातलय रस्त्यांवर पाण्याचा मारा करून रस्ते धुवून काढले. आयुक्तांची पाठ वळताच परिसरात सर्वत्र फेरीवाल्यांनी बिनधास्त-बेधडकपणे हातगाड्या, बाकडे लावून धंदा चालवला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोड