शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

सागरी महामार्गाच्या विरोधात एकजूट, शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 06:03 IST

सुमारे १० वर्षांपासून रखडलेल्या प्रस्तावित सागरी महामार्गाला आता नव्याने पुनरु जिवीत करण्याचा प्रयत्न शासन पातळीवरून केला जात असताना ज्या शेतक-यांच्या जमिनी ह्या मार्गात जातात त्यांना विचारायचे साधे सौजन्यही प्रशासन पाळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकºयानी जिल्हाधिका-यांची भेट घेत आपला रोष व्यक्त केला.

- हितेन नाईकपालघर - सुमारे १० वर्षांपासून रखडलेल्या प्रस्तावित सागरी महामार्गाला आता नव्याने पुनरु जिवीत करण्याचा प्रयत्न शासन पातळीवरून केला जात असताना ज्या शेतक-यांच्या जमिनी ह्या मार्गात जातात त्यांना विचारायचे साधे सौजन्यही प्रशासन पाळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकºयानी जिल्हाधिका-यांची भेट घेत आपला रोष व्यक्त केला.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परनाली- मोरेकुरण-आगवन-दापोली असा सुमारे ९ किमी आणि २५ कोटींचा सागरी महामार्ग सन २००७-०८ च्या सुमारास बांधावयास घेण्यात आला होता. समुद्राशी काडी मात्र संबंध नसलेल्या ह्या सागरी महामार्गाची उभारणीच चुकीच्या आधारे झाल्यानंतर अनेक वर्षांपासून तो व दुधखाडीवर उभारलेल्या पुलाचे काम बंद होते.झाई-बोर्डी-दापोली-रेवस-रेड्डी असा कोकणपर्यंत जाणाºया ह्या सागरी महामार्गाच्या रस्त्याच्या अपूर्णावस्थेतील कामे पूर्णत्वास नेण्याबाबत इथला लोकप्रतिनिधी उदासीन होता. जिल्हा निर्मिती नंतर पुन्हा ह्या रखडलेल्या रस्त्याच्या कामाला सुरु वात करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने बाधित शेतकºयांनी जिल्हाधिकाºयकडे हरकती नोंदवून तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यामुळे शेतकºयांशी चर्चा करण्याची इच्छा जिल्हाधिका ºयांनी व्यक्त करून त्यांना गुरु वारी चर्चेला बोलाविले होते. शेतकºयांना विश्वासात न घेता निवीदा प्रकीया काढली गेल्याने संबंधीत महामार्गातील बाधित शेतकरी हे संतप्त झाले असून प्रथम आमच्या जमिनीचा मोबदला द्या नंतरच कामाला सुरु वात करा. अन्यथा या विरोधात सरकारशी दोन हात करण्याच्या आम्ही तयार आहोत असा इशारा उपस्थित निर्धार संघटनेचे अध्यक्ष कुंदन संखे यांनी दिला.सरकारच्या दडपशाहीचा केला निषेधहा सागरी महामार्ग अनेक वर्षांपासून रखडलेला असून अनेक शेतकºयांच्या जमिनीत चुकीच्या पद्धतीने वृक्ष तोड करून, मातीचा भराव केल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मोरेकुरण, दापोली, आंबेडकर नगर, कुंभवली गावातील प्रभावित शेतकºयांनी सरकारच्या दडपशाही धोरणाचा निषेध करून आंदोलने केली असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले असता, प्रशासनाचे धोरण हे शेतकºयांना पूरक व त्यांना संपूर्ण विश्वासात घेऊनचं आखण्यात येईल. असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.रस्त्याच्या निवीदा तातडीने थांबवण्याचे आदेश देऊन, उपस्थित असलेले उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सा. बां. वि. चे कार्यकारी अभियंता, भूसंपादन अधिकारी, यांना सागरी महामार्गा बाबतचे धोरण शेतकºयांना विश्वासात घेऊनच निश्चित करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित अधिकाºयांना दिल्याचे कुंदन संखे यांनी सांगितले.यावेळी सुनिल राऊत, तसेच गणेश पिंपळे, प्रल्हाद संखे, रु पेश संखे, निलीम संखे, सुधाकर संखे, ललित संखे, दशरथ संखे,आदी उपस्थित होते. यावेळी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी जिल्हाधिकाºयांना परिस्थितीचे वास्तव पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी