शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
2
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
3
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
4
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
5
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
6
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
7
Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
8
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
9
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
10
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
11
Thane: पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण'
12
ATP Masters 1000: वयाच्या ३८व्या वर्षीही नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
13
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
14
Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा 
15
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर
16
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
17
Nitish Reddy Flying Catch: नितीश रेड्डी बनला सुपरमॅन, सिराजच्या गोलंदाजीवर घेतला जबरदस्त कॅच!
18
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
19
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
20
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात

सागरी महामार्गाच्या विरोधात एकजूट, शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 06:03 IST

सुमारे १० वर्षांपासून रखडलेल्या प्रस्तावित सागरी महामार्गाला आता नव्याने पुनरु जिवीत करण्याचा प्रयत्न शासन पातळीवरून केला जात असताना ज्या शेतक-यांच्या जमिनी ह्या मार्गात जातात त्यांना विचारायचे साधे सौजन्यही प्रशासन पाळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकºयानी जिल्हाधिका-यांची भेट घेत आपला रोष व्यक्त केला.

- हितेन नाईकपालघर - सुमारे १० वर्षांपासून रखडलेल्या प्रस्तावित सागरी महामार्गाला आता नव्याने पुनरु जिवीत करण्याचा प्रयत्न शासन पातळीवरून केला जात असताना ज्या शेतक-यांच्या जमिनी ह्या मार्गात जातात त्यांना विचारायचे साधे सौजन्यही प्रशासन पाळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकºयानी जिल्हाधिका-यांची भेट घेत आपला रोष व्यक्त केला.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परनाली- मोरेकुरण-आगवन-दापोली असा सुमारे ९ किमी आणि २५ कोटींचा सागरी महामार्ग सन २००७-०८ च्या सुमारास बांधावयास घेण्यात आला होता. समुद्राशी काडी मात्र संबंध नसलेल्या ह्या सागरी महामार्गाची उभारणीच चुकीच्या आधारे झाल्यानंतर अनेक वर्षांपासून तो व दुधखाडीवर उभारलेल्या पुलाचे काम बंद होते.झाई-बोर्डी-दापोली-रेवस-रेड्डी असा कोकणपर्यंत जाणाºया ह्या सागरी महामार्गाच्या रस्त्याच्या अपूर्णावस्थेतील कामे पूर्णत्वास नेण्याबाबत इथला लोकप्रतिनिधी उदासीन होता. जिल्हा निर्मिती नंतर पुन्हा ह्या रखडलेल्या रस्त्याच्या कामाला सुरु वात करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने बाधित शेतकºयांनी जिल्हाधिकाºयकडे हरकती नोंदवून तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यामुळे शेतकºयांशी चर्चा करण्याची इच्छा जिल्हाधिका ºयांनी व्यक्त करून त्यांना गुरु वारी चर्चेला बोलाविले होते. शेतकºयांना विश्वासात न घेता निवीदा प्रकीया काढली गेल्याने संबंधीत महामार्गातील बाधित शेतकरी हे संतप्त झाले असून प्रथम आमच्या जमिनीचा मोबदला द्या नंतरच कामाला सुरु वात करा. अन्यथा या विरोधात सरकारशी दोन हात करण्याच्या आम्ही तयार आहोत असा इशारा उपस्थित निर्धार संघटनेचे अध्यक्ष कुंदन संखे यांनी दिला.सरकारच्या दडपशाहीचा केला निषेधहा सागरी महामार्ग अनेक वर्षांपासून रखडलेला असून अनेक शेतकºयांच्या जमिनीत चुकीच्या पद्धतीने वृक्ष तोड करून, मातीचा भराव केल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मोरेकुरण, दापोली, आंबेडकर नगर, कुंभवली गावातील प्रभावित शेतकºयांनी सरकारच्या दडपशाही धोरणाचा निषेध करून आंदोलने केली असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले असता, प्रशासनाचे धोरण हे शेतकºयांना पूरक व त्यांना संपूर्ण विश्वासात घेऊनचं आखण्यात येईल. असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.रस्त्याच्या निवीदा तातडीने थांबवण्याचे आदेश देऊन, उपस्थित असलेले उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सा. बां. वि. चे कार्यकारी अभियंता, भूसंपादन अधिकारी, यांना सागरी महामार्गा बाबतचे धोरण शेतकºयांना विश्वासात घेऊनच निश्चित करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित अधिकाºयांना दिल्याचे कुंदन संखे यांनी सांगितले.यावेळी सुनिल राऊत, तसेच गणेश पिंपळे, प्रल्हाद संखे, रु पेश संखे, निलीम संखे, सुधाकर संखे, ललित संखे, दशरथ संखे,आदी उपस्थित होते. यावेळी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी जिल्हाधिकाºयांना परिस्थितीचे वास्तव पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी