शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

हातावर बांधले घड्याळ!

By admin | Updated: July 4, 2017 06:40 IST

भाजपाला शह देण्यासाठी शिवसेनेला सोबत घेण्याची रणनिती काँग्रेसमध्ये आखली जात असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील पूर्वीच्या

लोकमत न्युज नेटवर्क मीरा रोड : भाजपाला शह देण्यासाठी शिवसेनेला सोबत घेण्याची रणनिती काँग्रेसमध्ये आखली जात असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील पूर्वीच्या आपल्याच नेत्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देत हातावर घड्याळ बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दोन्ही पक्षांतील अनेक उमेदवारांनी आधीच भाजपा, शिवसेनेत प्रवेश करून आपले बस्तान मांडल्यानंतर खिळखिळे होऊनही या पक्षांतील गटबाजी, बंडखोरी उफाळून आली आहे. त्यातूनच राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये म्हणजे पूर्वीच्या स्वगृही प्रवेश केला आहे.मीरा-भार्इंदरचे माजी आ. गिल्बर्ट मेंडोन्सांसह पक्षाचे २७ नगरसेवक, पदाधिकारी बाहेर पडल्याने आधीच राष्ट्रवादी खिळखिळी आहे. पण माजी मंत्री गणेश नाईक, माजी खा. संजीव नाईक यांच्याकडून ही गळती वेळीच थांबविण्याचे प्रयत्न झाले नाहीत. त्या काळात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत माजी उपमहापौर जयंत पाटील यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद देण्याचा आग्रह धरला. गणेश नाईक यांनीही त्यांना पद स्वीकारण्यास सांगितले. मात्र, ते स्वीकारताच पक्षात संघर्ष पेटला, गटबाजीला उधाण आले.पाटील यांनी पक्षाला राजीनाम्याचा इशारा दिल्यावर सारे काही आलबेल असल्याचे चित्र उभे करण्यात आले. पण त्यातून इतर गट नाराज झाल्याने, उरलासुरला पक्षही फुटीच्या उंबरठ्यावर उभा राहिल्याने अखेर त्यांनी राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे माजी आ. मुझफ्फर हुसेन यांच्या मीरा रोड येथील निवासस्थानी रविवारी जयंत पाटील यांनी माजी नगरसेवक प्रकाश दुबोले, माजी नगरसेविका करुणा पाटील, सुरेश दळवी, आझाद पटेल, माधुरी तांबे, कुंदन भोईर, रजनी गुप्ता, सुरेश पांढरे, कुणाल जयंत पाटील, राजवंत सिंह, ललिता वंजत्री, रीना सैदा, प्रकाश नागणे आदी राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवार, कार्यकर्त्यांसह त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जयंत पाटील व सुरेश दळवी हे दोघेही मूळचे काँग्रेसचे नेते. त्यांच्यासह अन्य पदाधिकारी पक्षात आल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत उत्साह वाढल्याचे हुसेन म्हणाले.