शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यातील २१ गावांत भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: May 1, 2016 02:34 IST

उन्हाचा पारा जसजसा वाढू लागला आहे तशी वाडा तालुक्यातील अनेक गावपाड्यांमध्ये आदिवासींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातून तब्बल पाच बारमाही नद्या वाहत

वाडा : उन्हाचा पारा जसजसा वाढू लागला आहे तशी वाडा तालुक्यातील अनेक गावपाड्यांमध्ये आदिवासींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातून तब्बल पाच बारमाही नद्या वाहत असताना देखील केवळ शासकीय अनास्थेमुळे नागरीकांना घोटभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.तालुक्यातून पिंजाळ, देहर्जे, गारगाई, तानसा, वैतरणा अशा तब्बल पाच बारमाही वाहणाऱ्या नद्यांची देणगी निसर्गाने दिली असताना शासकीय धोरणांमुळे व स्थानिक आमदार, खासदार, मंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळे येथील गावपाड्यांतील आदिवासींच्या घशाला ३० वर्षापासून कोरड पडली आहे. तालुक्यातील टोकरेपाडा, उज्जैनी, गावठाण, आंबेवाडी, साखरशेत, दिवेपाडा, सागमाळ, जांभूळपाडा, थावरपाडा, ओगदा, बालशेत पाडा, वरठापाडा (नाणे), वळवीपाडा (कोंढले), गाळतरे (धुसालपाडा), गुहीर, खुटल, आमगाव, अंभई, शेलटे, मुगूस्ते, साईदेवळी या गावपाड्यातील आदिवासींना घोटभर वणवण भटकावे लागत आहे. काही गावांना अनियमीत टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे तर काही गावे प्रतिक्षेत आहेत.पाणीटंचाई रोखण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्प, पाणीपुरवठ्याच्या विविध योजना, लहान मोठे बंधारे, बोअरवेल, सिंचन तलाव, विहिरी यासाठी करोडो रुपये खर्ची पडले आहेत. मात्र कागदी घोडे नाचवून विहिरी व खडकावर पोखरलेल्या कोरड्या बोअरवेल या व्यतिरीक्त काही आलेले नाही. कोकाकोला कंपनीने गांध्रे येथे वैतरणा नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यातुन थेंबभर पाण्याचीही गळती होत नाही व कंपनीला कधीही पाणीटंचाई जाणवत नाही. मात्र आमच्या गोरगरीब जनतेला मार्च महिन्यापासून पाण्यासाठी पायपीट करावी लागते व तहानेने व्याकुळ होऊन याच कंपनीने तयार केलेले मिनरल वॉटर विकव घेऊन पाणी प्यावे लागते. (वार्ताहर)पहाटेपासून पाण्याचा शोधतालुक्यातील अनेक गावातील महिलांना पहाटेपासूनच पाण्याच्या शोधात निघावे लागते. अनेक गावपाड्यांतील विहिरींनी नळ गाठल्याने पाच किलोमीटर दुर नदीवर डोक्यावर हांडे घेवून पायपीट करावी लागत आहे.वाडा तालुक्यात १९६ बोअरवेल मंजुर झाल्या आहेत. मात्र त्या प्रशासकीय मंजुरीच्या प्रतिक्षेत असून येथील सहा गावांना टँकर सुरू करण्यात आले आहे. मात्र त्याला डिझेल व बिल लवकर निघत नाही शिवाय प्रशासन पाणी देखील वेळेवर उपलब्ध करून देत नसल्याने या गावांना टँकर सुरू असून पाणी मिळत नसल्याची येथील आदिवासी नागरीकांनी व्यक्त केली.या संदर्भात वाडा पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता संतोष शिर्शिकर यांच्याशी संपर्क साधला असता १९६ बोअरवेल मंजुर आहेत मात्र त्यांना प्रशासकीय मंजुरी व वर्कआॅर्डर मिळालेली नाही. शिवाय सहा गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असून दोन गावे प्रतिक्षेत असल्याची माहिती त्यांनी दिली.