शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
7
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
8
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
9
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
10
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
11
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
12
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
13
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
14
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
15
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
16
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
17
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
18
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
19
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
20
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यातील २१ गावांत भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: May 1, 2016 02:34 IST

उन्हाचा पारा जसजसा वाढू लागला आहे तशी वाडा तालुक्यातील अनेक गावपाड्यांमध्ये आदिवासींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातून तब्बल पाच बारमाही नद्या वाहत

वाडा : उन्हाचा पारा जसजसा वाढू लागला आहे तशी वाडा तालुक्यातील अनेक गावपाड्यांमध्ये आदिवासींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातून तब्बल पाच बारमाही नद्या वाहत असताना देखील केवळ शासकीय अनास्थेमुळे नागरीकांना घोटभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.तालुक्यातून पिंजाळ, देहर्जे, गारगाई, तानसा, वैतरणा अशा तब्बल पाच बारमाही वाहणाऱ्या नद्यांची देणगी निसर्गाने दिली असताना शासकीय धोरणांमुळे व स्थानिक आमदार, खासदार, मंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळे येथील गावपाड्यांतील आदिवासींच्या घशाला ३० वर्षापासून कोरड पडली आहे. तालुक्यातील टोकरेपाडा, उज्जैनी, गावठाण, आंबेवाडी, साखरशेत, दिवेपाडा, सागमाळ, जांभूळपाडा, थावरपाडा, ओगदा, बालशेत पाडा, वरठापाडा (नाणे), वळवीपाडा (कोंढले), गाळतरे (धुसालपाडा), गुहीर, खुटल, आमगाव, अंभई, शेलटे, मुगूस्ते, साईदेवळी या गावपाड्यातील आदिवासींना घोटभर वणवण भटकावे लागत आहे. काही गावांना अनियमीत टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे तर काही गावे प्रतिक्षेत आहेत.पाणीटंचाई रोखण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्प, पाणीपुरवठ्याच्या विविध योजना, लहान मोठे बंधारे, बोअरवेल, सिंचन तलाव, विहिरी यासाठी करोडो रुपये खर्ची पडले आहेत. मात्र कागदी घोडे नाचवून विहिरी व खडकावर पोखरलेल्या कोरड्या बोअरवेल या व्यतिरीक्त काही आलेले नाही. कोकाकोला कंपनीने गांध्रे येथे वैतरणा नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यातुन थेंबभर पाण्याचीही गळती होत नाही व कंपनीला कधीही पाणीटंचाई जाणवत नाही. मात्र आमच्या गोरगरीब जनतेला मार्च महिन्यापासून पाण्यासाठी पायपीट करावी लागते व तहानेने व्याकुळ होऊन याच कंपनीने तयार केलेले मिनरल वॉटर विकव घेऊन पाणी प्यावे लागते. (वार्ताहर)पहाटेपासून पाण्याचा शोधतालुक्यातील अनेक गावातील महिलांना पहाटेपासूनच पाण्याच्या शोधात निघावे लागते. अनेक गावपाड्यांतील विहिरींनी नळ गाठल्याने पाच किलोमीटर दुर नदीवर डोक्यावर हांडे घेवून पायपीट करावी लागत आहे.वाडा तालुक्यात १९६ बोअरवेल मंजुर झाल्या आहेत. मात्र त्या प्रशासकीय मंजुरीच्या प्रतिक्षेत असून येथील सहा गावांना टँकर सुरू करण्यात आले आहे. मात्र त्याला डिझेल व बिल लवकर निघत नाही शिवाय प्रशासन पाणी देखील वेळेवर उपलब्ध करून देत नसल्याने या गावांना टँकर सुरू असून पाणी मिळत नसल्याची येथील आदिवासी नागरीकांनी व्यक्त केली.या संदर्भात वाडा पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता संतोष शिर्शिकर यांच्याशी संपर्क साधला असता १९६ बोअरवेल मंजुर आहेत मात्र त्यांना प्रशासकीय मंजुरी व वर्कआॅर्डर मिळालेली नाही. शिवाय सहा गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असून दोन गावे प्रतिक्षेत असल्याची माहिती त्यांनी दिली.