शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

काेराेना रुग्णांचा आलेख घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 00:23 IST

पालघर ग्रामीणमधील स्थिती : वेळीच काेराेना चाचणी झाल्याने याेग्य उपचार

राहुल वाडेकरलोकमत न्यूज नेटवर्क विक्रमगड : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना प्रादुर्भाव पसरत हाेता. त्यावर आरोग्य प्रशासनाने तातडीने उपाययाेजना करून ग्रामीण भागात अँटिजन चाचणी आराखडा तयार केला. आराखड्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण दुर्गम भागातील जोडलेल्या ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांत अँटिजन चाचण्यांवर भर दिल्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या कमी होत चालल्याचा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातील बाधित रुग्णांवर नियंत्रण आणण्यासाठी केलेल्या चाचणी आराखड्यामुळे रुग्णांना वेळीच उपचार मिळू शकले.

जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कक्षेतील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतून ग्रामीण भागातील नागरिकांची अँटिजन तपासणी करण्यात आली. त्यामुळे रुग्ण गंभीर हाेण्याआधीच त्यांना उपचार मिळत आहेत. ज्या नागरिकांना लक्षणे नाहीत, मात्र त्यांना लागण झाली आहे अशांना गृह विलगीकरणात ठेवून त्यांंच्यावर औषधाेपचार करण्यात येत आहेत. तर लक्षणे असणाऱ्यांना विलगीकरण केंद्रांत पाठवले जात आहे. या नियोजनामुळे जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांच्या खाटांची उपलब्धता वाढत आहे. तसेच, प्राणवायूचे योग्य नियोजन होत असून मृत्युदर नियंत्रणात आला आहे, असे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यात १२ एप्रिल ते १८ एप्रिल या दुसऱ्या आठवड्यात ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण बाधित होते. प्रतिजन चाचण्यांवर भर दिल्यामुळे हीच रुग्णसंख्या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात व मेच्या पहिल्या आठवड्यात कमी होत गेली. २६ एप्रिल ते ५ मे यादरम्यान केलेल्या सर्वेक्षणात अँटिजन चाचण्यांवर भर दिल्यामुळे तीन आठवड्यांत रुग्णसंख्या सुमारे ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. याच बरोबरीने मृत्युदरही १.६८ टक्क्यांवरून ०.७३ टक्क्यांवर आला आहे.जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालाला विलंब होत असल्याने अँटिजन चाचण्यांवर भर देऊन त्याद्वारे रुग्ण शोधमोहीम राबवली गेल्याने रुग्णवाढीचा आलेख खालावत गेला. 

आराेग्य केंद्रे, रुग्णालयांत चाचणीवर भर

जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यकक्षेंतर्गत असलेल्या आठ तालुक्यांतील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २५ हजार १९० अँटिजन चाचण्या १६ एप्रिल ते ४ मे दरम्यान करण्यात आल्या. यात पाच हजार ७९ काेराेनाबाधित रुग्ण आढळले.

 जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत असलेल्या ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालय यामध्ये याच कालावधीत नऊ हजार ७६ चाचण्या करण्यात आल्या. यात २३१९ रुग्ण आढळले. तर काही खासगी रुग्णालयांमध्ये ५६८ चाचण्यातून २०९ रुग्ण सापडले.

माेठा निधी केला खर्चजिल्हा प्रशासनाने यासाठी मोठा निधी खर्च करून अँटिजन चाचणी संच मोठ्या प्रमाणात खरेदी केले.  चाचणी पाॅझिटिव्ह आल्यानंतर बाधित रुग्णांवर ताबडतोब उपचारासाठी पुरेसा औषधसाठ्यासाठी जिल्ह्याने मोठा निधी खर्च केला आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

अँटिजन चाचणीचा अहवाल विनाविलंब मिळत असल्याने रुग्णांना वेळीच उपचार शक्य झाले. त्यामुळे रुग्णसंख्या घटत आहे आणि यापुढेही घटेल, असा विश्वास आहे.- डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्या