शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

काेराेना रुग्णांचा आलेख घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 00:23 IST

पालघर ग्रामीणमधील स्थिती : वेळीच काेराेना चाचणी झाल्याने याेग्य उपचार

राहुल वाडेकरलोकमत न्यूज नेटवर्क विक्रमगड : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना प्रादुर्भाव पसरत हाेता. त्यावर आरोग्य प्रशासनाने तातडीने उपाययाेजना करून ग्रामीण भागात अँटिजन चाचणी आराखडा तयार केला. आराखड्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण दुर्गम भागातील जोडलेल्या ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांत अँटिजन चाचण्यांवर भर दिल्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या कमी होत चालल्याचा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातील बाधित रुग्णांवर नियंत्रण आणण्यासाठी केलेल्या चाचणी आराखड्यामुळे रुग्णांना वेळीच उपचार मिळू शकले.

जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कक्षेतील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतून ग्रामीण भागातील नागरिकांची अँटिजन तपासणी करण्यात आली. त्यामुळे रुग्ण गंभीर हाेण्याआधीच त्यांना उपचार मिळत आहेत. ज्या नागरिकांना लक्षणे नाहीत, मात्र त्यांना लागण झाली आहे अशांना गृह विलगीकरणात ठेवून त्यांंच्यावर औषधाेपचार करण्यात येत आहेत. तर लक्षणे असणाऱ्यांना विलगीकरण केंद्रांत पाठवले जात आहे. या नियोजनामुळे जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांच्या खाटांची उपलब्धता वाढत आहे. तसेच, प्राणवायूचे योग्य नियोजन होत असून मृत्युदर नियंत्रणात आला आहे, असे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यात १२ एप्रिल ते १८ एप्रिल या दुसऱ्या आठवड्यात ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण बाधित होते. प्रतिजन चाचण्यांवर भर दिल्यामुळे हीच रुग्णसंख्या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात व मेच्या पहिल्या आठवड्यात कमी होत गेली. २६ एप्रिल ते ५ मे यादरम्यान केलेल्या सर्वेक्षणात अँटिजन चाचण्यांवर भर दिल्यामुळे तीन आठवड्यांत रुग्णसंख्या सुमारे ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. याच बरोबरीने मृत्युदरही १.६८ टक्क्यांवरून ०.७३ टक्क्यांवर आला आहे.जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालाला विलंब होत असल्याने अँटिजन चाचण्यांवर भर देऊन त्याद्वारे रुग्ण शोधमोहीम राबवली गेल्याने रुग्णवाढीचा आलेख खालावत गेला. 

आराेग्य केंद्रे, रुग्णालयांत चाचणीवर भर

जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यकक्षेंतर्गत असलेल्या आठ तालुक्यांतील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २५ हजार १९० अँटिजन चाचण्या १६ एप्रिल ते ४ मे दरम्यान करण्यात आल्या. यात पाच हजार ७९ काेराेनाबाधित रुग्ण आढळले.

 जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत असलेल्या ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालय यामध्ये याच कालावधीत नऊ हजार ७६ चाचण्या करण्यात आल्या. यात २३१९ रुग्ण आढळले. तर काही खासगी रुग्णालयांमध्ये ५६८ चाचण्यातून २०९ रुग्ण सापडले.

माेठा निधी केला खर्चजिल्हा प्रशासनाने यासाठी मोठा निधी खर्च करून अँटिजन चाचणी संच मोठ्या प्रमाणात खरेदी केले.  चाचणी पाॅझिटिव्ह आल्यानंतर बाधित रुग्णांवर ताबडतोब उपचारासाठी पुरेसा औषधसाठ्यासाठी जिल्ह्याने मोठा निधी खर्च केला आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

अँटिजन चाचणीचा अहवाल विनाविलंब मिळत असल्याने रुग्णांना वेळीच उपचार शक्य झाले. त्यामुळे रुग्णसंख्या घटत आहे आणि यापुढेही घटेल, असा विश्वास आहे.- डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्या