शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय अधिकारीच खंडणीला जबाबदार, चौकशी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 06:19 IST

- शशी करपेवसई - तालुक्यात सुरु असलेल्या खंडणी प्रकरणात वसई विरार महापालिका आणि पोलीसच जबाबदार असून २००९ पासून दाखल झालेल्या अर्जांची चौकशी केल्यावर अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येतील, असे काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.२००५ साली माहिती अधिकार अस्तित्वात आल्यानंतर वसईत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर खंडणीचे गुन्हे ...

- शशी करपेवसई - तालुक्यात सुरु असलेल्या खंडणी प्रकरणात वसई विरार महापालिका आणि पोलीसच जबाबदार असून २००९ पासून दाखल झालेल्या अर्जांची चौकशी केल्यावर अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येतील, असे काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.२००५ साली माहिती अधिकार अस्तित्वात आल्यानंतर वसईत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत. जनतेकडून अनधिकृत बांधकाम आहे हे कळल्यानंतरही त्या बांधकामांवर वसई विरार महापालिकेकडून कारवाई झाली असती तर सामाजिक कार्यकर्त्याला खंडणी देण्यासाठी विकासकांनी पुढाकार घेतला नसता. तसेच महाराष्ट्र पोलीस महासंचालकांनी लोकांची फसवणुक करणाऱ्या विकासकांवरही गुन्हे दाखल कराअसे स्पष्ट निर्देश पालघर पोलीस अधिक्षकांना दिले आहेत. त्यामुळे गुन्हे कोणावर दाखल करावेत हे पोलिसांनीच ठरवले पाहिजे, अशी तक्रार काँग्रेसच्या विरार शहरअध्यक्षा गीता वेर्णेकर यांनी केली आहे.अनधिकृत बांधकामे झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई न करता महापालिका अधिकारी संरक्षण देतात. त्यामुळे माहिती अधिकाराचे अर्ज, तक्रारी दाखल होतात. त्यानंतर महापालिका आणि पोलीस अधिकारीच संबंधित बिल्डर व तक्रारदाराची समेट घडवून आणतात. तिथूनच खंडणीच्या प्रकाराला सुरुवात होते. खंडणी मागणाºयांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, अनधिकृत बांधकामांना खतपाणी घालणाºया व खंडणीचा मार्ग दाखवणाºया अधिकाºयांवर कारवाई केली जात नाही, अशी तक्रार उत्तराखंड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश सभापती यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. एमआरटीपीची तक्रार आल्यानंतर पोलिसांकडून सेटलमेंट केली जाते. काही आरटीआय कार्यकर्त्यांना पोलीसच हाताशी धरुन आर्थिक फायदा करून घेतात. यासाठी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी केल्यास खंडणी प्रकरणात महापालिका आणि पोलिसांचा सहभाग निश्चित उजेडात येईल, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या तक्रारीत म्हटले आहे.अनधिकृत बांधकाम करणाºयांकडून खंडणी वसूली करण्यात एकटे आरटीआय कार्यकर्ते नसून त्यात शासकीय अधिकाºयांचाही सहभाग आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत करावी व त्यांच्या अहवालानुसारच कारवाई झाल्यास अनेक धक्कादायक बाबी उजेडात येतील, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सदस्य अ‍ॅड. जीमी घोन्सालवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.पोलीस कोठडीत बेदम मारहाणखंडणी प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या रमेश मोरे यांनी आपणाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप न्यायालयात केला. न्यायालयाने याप्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. माहिती अधिकारात माहिती मागवून बिल्डरांकडून खंडणी उकळल्या प्रकरणी वसई विरार परिसरात सध्या तब्बल दहा गुन्हे दाखल झाले आहे. त्यातील विरार पोलीस कोठडीत असलेल्या मोरे यांना बुधवारी संध्याकाळी वसई कोर्टात हजर केले असताना आपणाला तपाशी अधिकारी सोनावणे व राठोड यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने मोरे यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश देऊन याप्रकरणाच्या चौकशीचेही आदेश दिले. पोलिसांनी चौकशीदरम्यान केलेल्या मारहाणीमुळे त्यांना चालताही येत नसल्याचे अ‍ॅड. रमेश घोन्सालवीस यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, विरार येथील खंडणी प्रकरणात विवेक ठाकूर यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी त्यांचे वकिल नोएल डाबरे यांनी युक्तीवाद करताना हेतुपुरस्सर ही कारवाई होत असल्याचे सांगितले. ज्या बिल्डरांवर गुन्हे दाखल आहेत, त्यांना अटक केली जात नाही. अनधिकृत बांधकाम करणारे बिल्डर तक्रार करतात त्यात गुन्हा दाखल करून लगेचच अटक केली जात असल्याचे डाबरे यांनी न्यायालयात सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या