शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

शासकीय अधिकारीच खंडणीला जबाबदार, चौकशी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 06:19 IST

- शशी करपेवसई - तालुक्यात सुरु असलेल्या खंडणी प्रकरणात वसई विरार महापालिका आणि पोलीसच जबाबदार असून २००९ पासून दाखल झालेल्या अर्जांची चौकशी केल्यावर अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येतील, असे काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.२००५ साली माहिती अधिकार अस्तित्वात आल्यानंतर वसईत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर खंडणीचे गुन्हे ...

- शशी करपेवसई - तालुक्यात सुरु असलेल्या खंडणी प्रकरणात वसई विरार महापालिका आणि पोलीसच जबाबदार असून २००९ पासून दाखल झालेल्या अर्जांची चौकशी केल्यावर अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येतील, असे काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.२००५ साली माहिती अधिकार अस्तित्वात आल्यानंतर वसईत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत. जनतेकडून अनधिकृत बांधकाम आहे हे कळल्यानंतरही त्या बांधकामांवर वसई विरार महापालिकेकडून कारवाई झाली असती तर सामाजिक कार्यकर्त्याला खंडणी देण्यासाठी विकासकांनी पुढाकार घेतला नसता. तसेच महाराष्ट्र पोलीस महासंचालकांनी लोकांची फसवणुक करणाऱ्या विकासकांवरही गुन्हे दाखल कराअसे स्पष्ट निर्देश पालघर पोलीस अधिक्षकांना दिले आहेत. त्यामुळे गुन्हे कोणावर दाखल करावेत हे पोलिसांनीच ठरवले पाहिजे, अशी तक्रार काँग्रेसच्या विरार शहरअध्यक्षा गीता वेर्णेकर यांनी केली आहे.अनधिकृत बांधकामे झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई न करता महापालिका अधिकारी संरक्षण देतात. त्यामुळे माहिती अधिकाराचे अर्ज, तक्रारी दाखल होतात. त्यानंतर महापालिका आणि पोलीस अधिकारीच संबंधित बिल्डर व तक्रारदाराची समेट घडवून आणतात. तिथूनच खंडणीच्या प्रकाराला सुरुवात होते. खंडणी मागणाºयांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, अनधिकृत बांधकामांना खतपाणी घालणाºया व खंडणीचा मार्ग दाखवणाºया अधिकाºयांवर कारवाई केली जात नाही, अशी तक्रार उत्तराखंड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश सभापती यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. एमआरटीपीची तक्रार आल्यानंतर पोलिसांकडून सेटलमेंट केली जाते. काही आरटीआय कार्यकर्त्यांना पोलीसच हाताशी धरुन आर्थिक फायदा करून घेतात. यासाठी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी केल्यास खंडणी प्रकरणात महापालिका आणि पोलिसांचा सहभाग निश्चित उजेडात येईल, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या तक्रारीत म्हटले आहे.अनधिकृत बांधकाम करणाºयांकडून खंडणी वसूली करण्यात एकटे आरटीआय कार्यकर्ते नसून त्यात शासकीय अधिकाºयांचाही सहभाग आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत करावी व त्यांच्या अहवालानुसारच कारवाई झाल्यास अनेक धक्कादायक बाबी उजेडात येतील, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सदस्य अ‍ॅड. जीमी घोन्सालवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.पोलीस कोठडीत बेदम मारहाणखंडणी प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या रमेश मोरे यांनी आपणाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप न्यायालयात केला. न्यायालयाने याप्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. माहिती अधिकारात माहिती मागवून बिल्डरांकडून खंडणी उकळल्या प्रकरणी वसई विरार परिसरात सध्या तब्बल दहा गुन्हे दाखल झाले आहे. त्यातील विरार पोलीस कोठडीत असलेल्या मोरे यांना बुधवारी संध्याकाळी वसई कोर्टात हजर केले असताना आपणाला तपाशी अधिकारी सोनावणे व राठोड यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने मोरे यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश देऊन याप्रकरणाच्या चौकशीचेही आदेश दिले. पोलिसांनी चौकशीदरम्यान केलेल्या मारहाणीमुळे त्यांना चालताही येत नसल्याचे अ‍ॅड. रमेश घोन्सालवीस यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, विरार येथील खंडणी प्रकरणात विवेक ठाकूर यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी त्यांचे वकिल नोएल डाबरे यांनी युक्तीवाद करताना हेतुपुरस्सर ही कारवाई होत असल्याचे सांगितले. ज्या बिल्डरांवर गुन्हे दाखल आहेत, त्यांना अटक केली जात नाही. अनधिकृत बांधकाम करणारे बिल्डर तक्रार करतात त्यात गुन्हा दाखल करून लगेचच अटक केली जात असल्याचे डाबरे यांनी न्यायालयात सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या