शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

सरकारी भात खरेदीचे पैसे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 00:54 IST

शेतकरी अडचणीत : कर्ज फेडायचे कसे अन् खायचे काय?

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : कोरोनामुळे आधीच संकटात असताना आधारभूत भात खरेदी केंद्रावरून भात खरेदीची रक्कम खात्यात जमा न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. लॉकडाऊन असताना शेतीच्या कामात सूट दिली असतानाही हातात पैसे नसल्यामुळे शेतीची कामे कशी करायची, हा प्रश्न शेतकरी वर्गापुढे उभा राहिला आहे. तसेच मार्चअखेरीस शेतकऱ्यांना घेतलेले पीक कर्ज भरावे लागते, ते कसे फेडायचे या विवंचनेत ते सापडले आहेत.

सहकारी सोसायटीकडून घेतलेले कर्ज शेतकरी भात विकून भरत असतो, पण शासनाच्या भात खरेदी केंद्रावर भात विकूनही दोन महिन्यांपासून पैसे मिळाले नसल्याने आम्ही कर्ज भरायचे तरी कसे, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. यावर्षी दरात वाढ करून १८५० व ५०० रुपयांचा बाेनस असा दर लागू झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत हाेते. या वर्षी झालेल्या नुकसानीनंतर भात खरेदी केंद्रांवर चांगला भाव मिळाल्याने हाती चांगले पैसे पडतील, अशी आशा शेतकऱ्यांना हाेती. भात पीक घेणे हे आता शेतकऱ्यांसाठी महागडे ठरत आहे. बी बियाणे, खते, औषधे, मजुरी, ट्रॅक्टरचे वाढणारे दर, निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकऱ्यांना भात पीक घेणे परवडत नाही. 

भात पिकाची लागवड करून हाती येणाऱ्या पिकातून खर्च वजा करून हाती काहीच उत्पन्न पडत नाही. व्यापारी भाताला क्विंटलला १२०० ते १५०० रुपयांचा भाव देतात. ही पिळवणूक थांबवण्यासाठी वसईतील शेतकऱ्यांचे भात खरेदी करण्यासाठी राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक कार्यालय जव्हार अंतर्गत वसई तालुक्यात दोन भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. त्याअंतर्गत शिरवली, मेढे व भिनार या ठिकाणी भात खरेदी सुरू करण्यात आली.

महामंडळाला कागदपत्रे सादरजानेवारीपासून भात खरेदी सुरू झाली. मात्र, शेतकऱ्यांनी या केंद्रात विकलेल्या भाताचे पैसे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमाच झाले नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. आदिवासी विकास महामंडळाकडे याबाबतची कागदपत्रे सादर केली आहेत. मंडळाकडे निधी मंजूर होताच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार असल्याचे अधिकारी कल्पेश चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार