शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी भात खरेदीचे पैसे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 00:54 IST

शेतकरी अडचणीत : कर्ज फेडायचे कसे अन् खायचे काय?

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : कोरोनामुळे आधीच संकटात असताना आधारभूत भात खरेदी केंद्रावरून भात खरेदीची रक्कम खात्यात जमा न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. लॉकडाऊन असताना शेतीच्या कामात सूट दिली असतानाही हातात पैसे नसल्यामुळे शेतीची कामे कशी करायची, हा प्रश्न शेतकरी वर्गापुढे उभा राहिला आहे. तसेच मार्चअखेरीस शेतकऱ्यांना घेतलेले पीक कर्ज भरावे लागते, ते कसे फेडायचे या विवंचनेत ते सापडले आहेत.

सहकारी सोसायटीकडून घेतलेले कर्ज शेतकरी भात विकून भरत असतो, पण शासनाच्या भात खरेदी केंद्रावर भात विकूनही दोन महिन्यांपासून पैसे मिळाले नसल्याने आम्ही कर्ज भरायचे तरी कसे, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. यावर्षी दरात वाढ करून १८५० व ५०० रुपयांचा बाेनस असा दर लागू झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत हाेते. या वर्षी झालेल्या नुकसानीनंतर भात खरेदी केंद्रांवर चांगला भाव मिळाल्याने हाती चांगले पैसे पडतील, अशी आशा शेतकऱ्यांना हाेती. भात पीक घेणे हे आता शेतकऱ्यांसाठी महागडे ठरत आहे. बी बियाणे, खते, औषधे, मजुरी, ट्रॅक्टरचे वाढणारे दर, निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकऱ्यांना भात पीक घेणे परवडत नाही. 

भात पिकाची लागवड करून हाती येणाऱ्या पिकातून खर्च वजा करून हाती काहीच उत्पन्न पडत नाही. व्यापारी भाताला क्विंटलला १२०० ते १५०० रुपयांचा भाव देतात. ही पिळवणूक थांबवण्यासाठी वसईतील शेतकऱ्यांचे भात खरेदी करण्यासाठी राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक कार्यालय जव्हार अंतर्गत वसई तालुक्यात दोन भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. त्याअंतर्गत शिरवली, मेढे व भिनार या ठिकाणी भात खरेदी सुरू करण्यात आली.

महामंडळाला कागदपत्रे सादरजानेवारीपासून भात खरेदी सुरू झाली. मात्र, शेतकऱ्यांनी या केंद्रात विकलेल्या भाताचे पैसे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमाच झाले नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. आदिवासी विकास महामंडळाकडे याबाबतची कागदपत्रे सादर केली आहेत. मंडळाकडे निधी मंजूर होताच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार असल्याचे अधिकारी कल्पेश चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार