शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

दारिद्र्यरेषेखालील गोडेंना घरकुल मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 03:10 IST

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना केंद्र शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदातून घरकुले बांधून दिली जात आहेत.

हुसेन मेमन ।जव्हार : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना केंद्र शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदातून घरकुले बांधून दिली जात आहेत. दारिद्र्य रेषेखालील व कुड, मातीच्या घरात राहणाºया गरिब कुटुंबांना पक्के घर मिळावे म्हणून शासनाने आदिवासी विकास शबरी महामंडळाच्या मार्फत लोकसंख्यनुसार दरवर्षी लाभार्थ्यांची निवड करून अनुदान दिले जाते. तसेच आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत कातकरी (आदिम) जातीसाठी देखील घरकुल योजना आहे. ऐवढ्या योजना असल्या तरी सर्व योजनांच्या सर्व निकषांना पात्र ठरून पवारपाडा येथील गोडे कुटुंबीय घरकुलापासून वंचित आहे.या तालुक्यातील कौलाळे ग्रामपंचायत पैकी पवारपाडा गावातील दयानंद पांडुरंग गोडे यांच्या घरात पती, पत्नी, सून, नातवंड अशी एकूण सहा माणसे राहत असून त्यांचे कुटुंब दारिद्र्य रेषेखालील आहे. तसेच ते स्वातंत्र्यपासून पवारपाडा येथेच राहत आहे. या कुटुंबांचा दारिद्य्र रेषेखालील नंबर ४९ आहे. पात्रता यादीत त्यांना एकूण १६ गुण मिळालेले आहेत. असे असूनही त्यांना अद्यापर्यंत कोणत्याही योजनेतून घरकुल मिळालेले नाही. त्यामुळे हे कुटुंब कुडाच्या घरात राहत आहे. सध्या हे घर वादळ,वारा, पाऊस यामुळे मोडकळीस आले आहे. त्यामुळे त्याला टेकू लावावे लागले आहेत. ते कधी कोसळेल याची शाश्वती नाही. म्हणून त्यांच्यावर गेल्या वर्षभरापासून दुसºयांच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. आजही त्याचे कुटुंब दुसºयांच्या आश्रयाला आहे.या कुटुंबांने आजवर सर्वच घरकुल योजनांचे अर्ज भरले, विनंत्या केल्या परंतु, कोणत्याच योजनेचे ते लाभार्थी ठरले नाहीत. लाभार्थ्यांच्या यादीत अनेक बोगस आणि अपात्र घुसवले गेलेत. काहींनी घरेही बळकावलीत परंतु या पात्र कुटुंबाची मात्र घराअभावी परवड होते आहे. या कडे स्वत: जिल्हाधिकारी लक्ष देतील काय? असा सवाल त्यांनी केला आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय या सगळ््यांनी त्यांची निराशा केल्यामुळे नाईलाजाने त्यांनी लोकमतकडे धाव घेतली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर नवे कलेक्टर अथवा जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष आपली ही समस्या सोडवतील का? असाही सवाल त्यांनी लोकमतशी बोलतांना केला.कौलाळे ग्रामपंचायतीची ग्रामसभा आहे. त्यामुळे त्या लाभार्थ्यांचा ग्रामसभेपुढे विषय ठेवून निर्णय घेतला जाईल. त्या लाभार्थ्यांनी त्यांची अडचण ग्रामसभेत मांडावी.- राजेश वातास,सरपंच,कौलाळे.मी गेल्या मार्च महिन्यापासून कौलाळे ग्रामपंचायतीचा कार्यभार माझ्याकडे आहे. त्यामुळे मी नवीन असल्याने मला याबाबत काहीच बोलता येणार नाही. जुन्या यादीत या लाभार्थ्यांचे नाव नाही. पुढील ग्रामसभेनंतर त्याचा ग्रामसभेत ठराव घेवून त्यावर विचार करू.- शिंदे, ग्रामसेवक,कौलाळे ग्रा.