शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

बोकडचोरांची टोळी गजाआड

By admin | Updated: January 26, 2017 02:50 IST

राजस्थान येथून खरेदी केलेले ८ लाख १६ हजार रूपये किमतीच्या बोकडांसह ट्रकमधील ६ लोकांचे अपहरण करणाऱ्या ७ कुख्यात आरोपीना

हितेन नाईक / पालघरराजस्थान येथून खरेदी केलेले ८ लाख १६ हजार रूपये किमतीच्या बोकडांसह ट्रकमधील ६ लोकांचे अपहरण करणाऱ्या ७ कुख्यात आरोपीना अवघ्या ४८ तासांच्या आत स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्यावर अपहरण, दरोडासह मोक्का कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ही माहिती पोलीस अधिक्षिका शारदा राऊत यांनी दिली.राज्यस्थान येथील ओमप्रकाश खाटीक हे शेतकऱ्यांकडून बोकड खरेदी करून ते मुंबईच्या देवनार भागात विक्र ी करण्याचा व्यवसाय करीत होते. ते आपल्या सहकाऱ्यांसह ८ लाख १६ हजार रुपये किंमतीचे २७२ बोकड एका ट्रकमध्ये भरून विक्री करण्यासाठी मुंबईकडे निघाले असतांना मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांच्या ट्रकला रस्त्यावर उभ्या असणाऱ्या तरु णांनी हात दाखवून थांबण्यास भाग पाडले. तुमच्या ट्रकमध्ये गायी असल्याचे सांगून पोलीस स्टेशन मध्ये चला असे फर्मावून त्यांचे मोबाईल हिसकावून घेतले. ट्रक मधील ६ लोकांना आपल्या जवळील दोन गाड्यात कोंबून ते सर्व पालघरच्या दिशेने निघाले त्या ६ लोकांना पालघर मधील सेंट जॉन कॉलेज जवळ त्यांनी उतरविले आणि ते चोर पसार झाले. तत्पूर्वी त्या गाडी मागचा ट्रकही गायब झाला होता.आपल्याला लुटण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधला. राऊत यांनी तात्काळ ८ पथकांसह स्थानिकांच्या मदतीने शोध घेतला असता पहाटे तो विक्र मगडमार्गे मनोरकडे येत असतांना पोलीसांचा चुकवून चोरटे जंगलात पसार झाले. त्यांनी कुठलाही पुरावा मागे सोडला नसतांना पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, सहा.निरी.जितेंद्र ठाकूर, निवास कणसे, सचिन चव्हाण, हवालदार मंगेश चव्हाण, सचिन मर्दे, संदीप सूर्यवंशी, नरेश जनाठे, शंकर वळवी, जनार्दन मते, मनोज मोरे, प्रवीण पाटील यांनी १) रिजवान खान, महापोली, भिवंडी, २)अब्दुल शेख, ३)शेहवाज बागवान, ४) करीम शेख सर्व कल्याण. ५)शफीउल्ला खान, ६)समीर खान, ७)अय्याज सय्यद , वापी (गुजरात) या सात आरोपीना भिवंडी येथून ताब्यात घेतले. आरोपीनी चोरून नेलेल्या २७२ बकऱ्या पैकी १६८ बकऱ्या गणेशपुरी हद्दीतील दळेकर पाडा येथील रांनमाळात लपवून ठेवल्या होत्या. त्या ताब्यात घेऊन पोलिसांनी ह्या सात आरोपी विरोधात अपहरण, दरोडा, हल्ला करणे ई आरोपाखाली गुन्हा दाखल केला. अन्य तीन आरोपी फरार असून त्यांच्या विरोधात मोक्का लावण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.