शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्य व्यवसायाला तातडीने कृषीचा दर्जा द्या!, खासदार गावित यांची लोकसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 23:37 IST

राज्य सरकारने या वर्षी ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी असणाºया १५१ तालुक्यातील हजारो गावांना दुष्काळाच्या निकषाखाली आणून सुमारे २ हजार ९०० कोटी रुपयांची मदत दिली.

- हितेन नाईकपालघर : शेतकऱ्याप्रमाणे मच्छिमार ही मत्स्य दुष्काळाच्या खाईत होरपळत असून त्यांनाही शेतकºयाप्रमाणे नुकसान भरपाई व कर्जपुरवठा देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाला कृषी विभागाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी तारांकित प्रश्नाद्वारे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी लोकसभेत केली आहे.राज्य सरकारने या वर्षी ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी असणाºया १५१ तालुक्यातील हजारो गावांना दुष्काळाच्या निकषाखाली आणून सुमारे २ हजार ९०० कोटी रुपयांची मदत दिली. ही मदत दोन टप्प्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. हंगामी पीक उत्पादक शेतकºयांना कमीत कमी १ हजार तर फळबाग शेतकºयांना कमीत कमी २ हजार रुपये मिळणार होते. तर दुष्काळाच्या निकषाखाली आणलेल्या गावांना कृषिपंप वीज बिलात ३३.५ टक्के सवलत, एसटी प्रवास मोफत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीमध्ये माफी, जमीन महसूलात सूट आदी सवलती जाहीर करून तत्काळ धान्य खरेदी केंद्रे सुरू करीत त्यांना सावरण्याचे काम केले होते.सध्या परंपरागत मच्छीमारांची संख्या रोडावत असून प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा घेत बिगर मच्छिमारांनी या व्यवसायात मोठ्या प्रमाणात शिरकाव सुरू केला आहे. एलईडी पर्ससीन नेट, बॉटम ट्रोलिंग आदी विविध तंत्रज्ञानाने विकसित पद्धतीने चालवलेल्या बेसुमार मासेमारीमुळे समुद्रातील मत्स्य साठ्यांचे प्रमाण कमालीचे घटले आहे. त्यामुळे मच्छीमारांवर मत्स्य दुष्काळाचे सावट अधिकाधिक गडद होत चालले आहे. मच्छीमारावर केंद्र व राज्य शासनाचे १ हजार कोटीच्यावर कर्ज असून ते माफ करावे, अशी मागणी सहकारी संस्था व शिखर संस्था मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत. प्रत्येक वर्षी अतिवृष्टी, अवेळी पडणारा पाऊस, गारपीट, पाणी टंचाई आदी कारणामुळे शेतकºयांचे नुकसान झाल्यास त्यांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे कर्जमाफी देऊन अत्यल्प दराने फेर कर्ज वाटपही केले जाते. मात्र वर्षाला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन आणि पौष्टिक, सकस आहार पुरविणाºया मच्छिमार समाजाचे १ हजार कोटींची कर्ज माफ करण्यास मात्र शासन कुचराई करीत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.पंतप्रधानांनी स्वतंत्र मत्स्य व्यवसाय मंत्रालयाची स्थापना केल्याचे घोषित केले असल्याने त्यासाठी एका स्वतंत्र निधीची तरतूद बजेटमध्ये करण्यात येणार असल्याने मच्छीमारामध्ये आनंदाचे वातावरण आहे.पशु, दुग्ध व मत्स्यव्यवसाय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिह यांनी मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याच्या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा, अशी मागणी ही यावेळी गावितांनी केली.महत्त्वाचा मुद्दा मांडला!कर्ज असह्य झाल्यावर शेतकरी आत्महत्या करतो, त्यानंतर केंद्र व राज्य शासनाकडून त्यांना भरपाई दिली जाते. त्याच धर्तीवर मच्छीमारांनी आत्महत्या केली अथवा तो कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला तर त्याला मात्र कुठल्याही पद्धतीची नुकसान भरपाई दिली जात नसल्याचे खासदार गावित यांनी लोकसभच्या निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :palgharपालघर