शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

मत्स्य व्यवसायाला तातडीने कृषीचा दर्जा द्या!, खासदार गावित यांची लोकसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 23:37 IST

राज्य सरकारने या वर्षी ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी असणाºया १५१ तालुक्यातील हजारो गावांना दुष्काळाच्या निकषाखाली आणून सुमारे २ हजार ९०० कोटी रुपयांची मदत दिली.

- हितेन नाईकपालघर : शेतकऱ्याप्रमाणे मच्छिमार ही मत्स्य दुष्काळाच्या खाईत होरपळत असून त्यांनाही शेतकºयाप्रमाणे नुकसान भरपाई व कर्जपुरवठा देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाला कृषी विभागाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी तारांकित प्रश्नाद्वारे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी लोकसभेत केली आहे.राज्य सरकारने या वर्षी ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी असणाºया १५१ तालुक्यातील हजारो गावांना दुष्काळाच्या निकषाखाली आणून सुमारे २ हजार ९०० कोटी रुपयांची मदत दिली. ही मदत दोन टप्प्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. हंगामी पीक उत्पादक शेतकºयांना कमीत कमी १ हजार तर फळबाग शेतकºयांना कमीत कमी २ हजार रुपये मिळणार होते. तर दुष्काळाच्या निकषाखाली आणलेल्या गावांना कृषिपंप वीज बिलात ३३.५ टक्के सवलत, एसटी प्रवास मोफत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीमध्ये माफी, जमीन महसूलात सूट आदी सवलती जाहीर करून तत्काळ धान्य खरेदी केंद्रे सुरू करीत त्यांना सावरण्याचे काम केले होते.सध्या परंपरागत मच्छीमारांची संख्या रोडावत असून प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा घेत बिगर मच्छिमारांनी या व्यवसायात मोठ्या प्रमाणात शिरकाव सुरू केला आहे. एलईडी पर्ससीन नेट, बॉटम ट्रोलिंग आदी विविध तंत्रज्ञानाने विकसित पद्धतीने चालवलेल्या बेसुमार मासेमारीमुळे समुद्रातील मत्स्य साठ्यांचे प्रमाण कमालीचे घटले आहे. त्यामुळे मच्छीमारांवर मत्स्य दुष्काळाचे सावट अधिकाधिक गडद होत चालले आहे. मच्छीमारावर केंद्र व राज्य शासनाचे १ हजार कोटीच्यावर कर्ज असून ते माफ करावे, अशी मागणी सहकारी संस्था व शिखर संस्था मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत. प्रत्येक वर्षी अतिवृष्टी, अवेळी पडणारा पाऊस, गारपीट, पाणी टंचाई आदी कारणामुळे शेतकºयांचे नुकसान झाल्यास त्यांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे कर्जमाफी देऊन अत्यल्प दराने फेर कर्ज वाटपही केले जाते. मात्र वर्षाला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन आणि पौष्टिक, सकस आहार पुरविणाºया मच्छिमार समाजाचे १ हजार कोटींची कर्ज माफ करण्यास मात्र शासन कुचराई करीत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.पंतप्रधानांनी स्वतंत्र मत्स्य व्यवसाय मंत्रालयाची स्थापना केल्याचे घोषित केले असल्याने त्यासाठी एका स्वतंत्र निधीची तरतूद बजेटमध्ये करण्यात येणार असल्याने मच्छीमारामध्ये आनंदाचे वातावरण आहे.पशु, दुग्ध व मत्स्यव्यवसाय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिह यांनी मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याच्या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा, अशी मागणी ही यावेळी गावितांनी केली.महत्त्वाचा मुद्दा मांडला!कर्ज असह्य झाल्यावर शेतकरी आत्महत्या करतो, त्यानंतर केंद्र व राज्य शासनाकडून त्यांना भरपाई दिली जाते. त्याच धर्तीवर मच्छीमारांनी आत्महत्या केली अथवा तो कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला तर त्याला मात्र कुठल्याही पद्धतीची नुकसान भरपाई दिली जात नसल्याचे खासदार गावित यांनी लोकसभच्या निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :palgharपालघर