शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

शेतमालाला भाव, दुष्काळात साथ एवढे दिले तरी खूप झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 03:40 IST

शेतकऱ्यांच्या मनात आहे तरी काय? । कोणता मुद्दा आहे महत्त्वाचा? । ‘लोकमत’चे बांधावरून रिपोर्टिंग

सात वर्षांपासून एकही योजना राबवली नाहीसात वर्षांपूर्वी आम्हाला पंचायत समितीच्या अनुदानातून विंधण विहीर मिळाली. त्यानंतर मात्र, आजपर्यंत कोणतीही योजना आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. वा या योजनांची आम्हाला कोणतीच माहिती मिळत नाही. आम्ही शेती करतो, त्यासाठी औजारे उपलब्ध नसतात. ती आम्हाला मिळायला हवीत. त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा होईल. आज शासनाने ज्या योजना राबवल्या आहेत, त्या आमच्यापर्यंत कधी आल्या नाहीत.- भादन शिवा टोपले, वासिंद, शहापूरअटल सोलर योजनेने जीवनमान बदललेआज शेतकऱ्यांसाठी शासनाने अनेक योजना आणल्या आहेत. त्या अनेक योजनांचा लाभ शेतकरी घेत आहेत. मी माझ्या शेतावर चार लाख रु पयांची ९५ टक्के सबसिडीची मुख्यमंत्री अटल सोलर योजना राबविल्याने मला शेतीला खूप फायदा झाला आहे. यामुळे माझे जीवनमान बदलले. मात्र या योजना तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून यामुळे शेतकºयांचा मोठा फायदा होईल. शेतकºयांना शासनाने या योजनांविषयी व्यवस्थित माहिती दिल्यास त्या सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.- स्वामी विशे, तुटे, शहापूर.योजनांचा लाभ केवळ ठरावीक व्यक्तींनाचआज सरकारी योजना या केवळ राजकीय नेत्यांच्या जवळ असणाºया कार्यकर्त्यांनाच कळतात. आणि यात फायदा देखील त्यांचाच होतो. शेतकºयाला आपल्या शेतीत हमी भाव मिळत नसल्याने तो निराश आहे. शासनाने आणलेल्या कोणत्याही योजनेचा लाभ मला आजपर्यंत मिळालेला नाही. वा त्याविषयी काही माहितीही कधी आम्हाला मिळाली नाही. शासन मोठमोठ्या करखान्यांना अनेक सवलती देऊन वारेमाप पैसे देते आणि ते माफ देखील करते. मात्र आम्हा शेतकºयांना ही सवलत मिळत नाही.- भाऊ पांढरे, तुटे, शहापूरहमी भाव न मिळाल्याने होतो मोठा तोटाशेतकरी शेती पिकवतो, मात्र त्याला ते धान्य विकताना हवा तसा हमी भाव मिळत नाही. त्यामुळे त्याचा मोठा तोटा होतो. हमीभाव मिळाल्यास त्याचा शेतकºयाला निश्चितच फायदा होईल. शेतकºयांना लागणारी औजारे, त्यासाठी असणाºया योजना या शेतकºयांपर्यंत पोहोचवायला हव्यात. मात्र अशा कोणत्याही योजना आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत, हेच आमचे दुर्दैव. आज तालुक्यातील कारखान्यांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात त्या मानेने शेतकºयांना मात्र अशा सवलती मिळत नाहीत.- अनंता मांजे, खरिवली, शहापूरसरकारकडून अपेक्षा कराव्यात तरी कोणत्या?शेतकºयांसाठी कोणत्या कोणत्या शासकीय योजना आहेत त्या त्यांनाही माहीत नसतात. माहीत असतात त्या केवळ राजकीय नेत्यांना. शासनाने अनेक प्रकारची खाती आम्हाला उघडायला सांगितली आहेत. आम्ही या खात्यात पैसे जमा करू असे सांगितले. रोजगार नसला तरी आम्ही तुम्हाला रोजगाराच्या रूपात पैसे जमा करू असे सांगितले. त्यामुळे आम्ही खाती उघडली. मात्र आजपर्यंत या आमच्या खात्यात एक रु पयाही जमा झालेला नाही. त्यामुळे या सरकारकडून आत कोणत्या अपेक्षा कराव्यात हाच मोठा विषय आहे.- बाळू धोंडू भोईर, लोनाड, शहापूर

टॅग्स :VotingमतदानElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक