शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

शेतमालाला भाव, दुष्काळात साथ एवढे दिले तरी खूप झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 03:40 IST

शेतकऱ्यांच्या मनात आहे तरी काय? । कोणता मुद्दा आहे महत्त्वाचा? । ‘लोकमत’चे बांधावरून रिपोर्टिंग

सात वर्षांपासून एकही योजना राबवली नाहीसात वर्षांपूर्वी आम्हाला पंचायत समितीच्या अनुदानातून विंधण विहीर मिळाली. त्यानंतर मात्र, आजपर्यंत कोणतीही योजना आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. वा या योजनांची आम्हाला कोणतीच माहिती मिळत नाही. आम्ही शेती करतो, त्यासाठी औजारे उपलब्ध नसतात. ती आम्हाला मिळायला हवीत. त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा होईल. आज शासनाने ज्या योजना राबवल्या आहेत, त्या आमच्यापर्यंत कधी आल्या नाहीत.- भादन शिवा टोपले, वासिंद, शहापूरअटल सोलर योजनेने जीवनमान बदललेआज शेतकऱ्यांसाठी शासनाने अनेक योजना आणल्या आहेत. त्या अनेक योजनांचा लाभ शेतकरी घेत आहेत. मी माझ्या शेतावर चार लाख रु पयांची ९५ टक्के सबसिडीची मुख्यमंत्री अटल सोलर योजना राबविल्याने मला शेतीला खूप फायदा झाला आहे. यामुळे माझे जीवनमान बदलले. मात्र या योजना तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून यामुळे शेतकºयांचा मोठा फायदा होईल. शेतकºयांना शासनाने या योजनांविषयी व्यवस्थित माहिती दिल्यास त्या सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.- स्वामी विशे, तुटे, शहापूर.योजनांचा लाभ केवळ ठरावीक व्यक्तींनाचआज सरकारी योजना या केवळ राजकीय नेत्यांच्या जवळ असणाºया कार्यकर्त्यांनाच कळतात. आणि यात फायदा देखील त्यांचाच होतो. शेतकºयाला आपल्या शेतीत हमी भाव मिळत नसल्याने तो निराश आहे. शासनाने आणलेल्या कोणत्याही योजनेचा लाभ मला आजपर्यंत मिळालेला नाही. वा त्याविषयी काही माहितीही कधी आम्हाला मिळाली नाही. शासन मोठमोठ्या करखान्यांना अनेक सवलती देऊन वारेमाप पैसे देते आणि ते माफ देखील करते. मात्र आम्हा शेतकºयांना ही सवलत मिळत नाही.- भाऊ पांढरे, तुटे, शहापूरहमी भाव न मिळाल्याने होतो मोठा तोटाशेतकरी शेती पिकवतो, मात्र त्याला ते धान्य विकताना हवा तसा हमी भाव मिळत नाही. त्यामुळे त्याचा मोठा तोटा होतो. हमीभाव मिळाल्यास त्याचा शेतकºयाला निश्चितच फायदा होईल. शेतकºयांना लागणारी औजारे, त्यासाठी असणाºया योजना या शेतकºयांपर्यंत पोहोचवायला हव्यात. मात्र अशा कोणत्याही योजना आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत, हेच आमचे दुर्दैव. आज तालुक्यातील कारखान्यांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात त्या मानेने शेतकºयांना मात्र अशा सवलती मिळत नाहीत.- अनंता मांजे, खरिवली, शहापूरसरकारकडून अपेक्षा कराव्यात तरी कोणत्या?शेतकºयांसाठी कोणत्या कोणत्या शासकीय योजना आहेत त्या त्यांनाही माहीत नसतात. माहीत असतात त्या केवळ राजकीय नेत्यांना. शासनाने अनेक प्रकारची खाती आम्हाला उघडायला सांगितली आहेत. आम्ही या खात्यात पैसे जमा करू असे सांगितले. रोजगार नसला तरी आम्ही तुम्हाला रोजगाराच्या रूपात पैसे जमा करू असे सांगितले. त्यामुळे आम्ही खाती उघडली. मात्र आजपर्यंत या आमच्या खात्यात एक रु पयाही जमा झालेला नाही. त्यामुळे या सरकारकडून आत कोणत्या अपेक्षा कराव्यात हाच मोठा विषय आहे.- बाळू धोंडू भोईर, लोनाड, शहापूर

टॅग्स :VotingमतदानElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक