शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अपघातविरहित आगार म्हणून पालघरची ओळख निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 22:39 IST

सुरक्षितता मोहीम । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम

पालघर : ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ब्रीदवाक्याला बांधील राहात प्रवाशांशी जोडलेल्या नात्यांची जपवणूक करा. आपल्या कुटुंबाप्रमाणे प्रवाशांची काळजी घेत अपघातविरहीत आगार म्हणून पालघरची ओळख निर्माण करा, असा सल्ला सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद ऊर्फ बाबा कदम यांनी सुरक्षितता मोहिमेत कर्मचाऱ्यांना दिला.

राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार संपूर्ण देशात दरवर्षी जानेवारी महिन्याच्या सुरु वातीस सुरक्षितता मोहीम साजरी करण्यात येत असते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पालघर विभागांतर्गत ११ ते २५ जानेवारी दरम्यान सुरक्षितता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने पालघर आगारात आयोजित कार्यक्र मात अध्यक्ष म्हणून विभाग नियंत्रक गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सुधीर दांडेकर, विवा. नियंत्रक आशीष चौधरी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हितेन नाईक, ज्येष्ठ पत्रकार पी. एम. पाटील, व्यवस्थापक चव्हाण, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अशोक वर्तक, पद्माकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पालघर विभागांतर्गत असलेल्या ८ आगारांतून दैनंदिन ४२५ बसेसमधून ३ हजार ३७४ फेऱ्यांद्वारे १ लाख ४३ हजार कि.मी.चा प्रवास पार केला जातो. ६३३ नवीन चालक-वाहक भरती करून शिवशाही आदी आरामदायी बसेसची सेवा सुरू केल्या आहेत. पालघर विभाग प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असून आपल्या वागण्याने एसटी विभागाच्या उद्देशाला कुठेही डाग लागणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन नियंत्रक गायकवाड यांनी केले. आता चालक-वाहकांनी अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या भूमिकेत शिरून काम करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहनही केले.अपघातवाढ चिंताजनकया वर्षभरात अपघाताच्या प्रमाणात झालेली वाढ चिंताजनक असून तणाव विरहित वातावरणात एसटी चालवा, असेही शेवटी गायकवाड यांनी सांगितले. या वेळी सुधीर दांडेकर, अशोक वर्तक, पीएम पाटील यांनी आपले विचार मांडले.