शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Visarjan 2018 : डहाणूत विसर्जनावेळी तेलमिश्रित पाण्याने भक्तांचे हातपाय काळवंडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 07:21 IST

अनंत चतुर्दशीच्या दिवशी अरबी समुद्रात गणेशमूर्ती विसर्जन केल्यानंतर दूषित तेलमिश्रित पाण्याने हातापायाला चिकटपणा येऊन ते काळवंडल्याचा आणि कपड्यांना काळे डाग पडल्याचा प्रत्यय तालुक्यातील चिखले गावच्या भक्तांना आला.

- अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी - अनंत चतुर्दशीच्या दिवशी अरबी समुद्रात गणेशमूर्ती विसर्जन केल्यानंतर दूषित तेलमिश्रित पाण्याने हातापायाला चिकटपणा येऊन ते काळवंडल्याचा आणि कपड्यांना काळे डाग पडल्याचा प्रत्यय तालुक्यातील चिखले गावच्या भक्तांना आला. दरम्यान दोन दिवसांपूर्वी मुंबई व पालघर जिल्ह्याच्या किनाऱ्यावर मृत मासेही आढळले होते. तालुक्यातील किनारपट्टीवरील गावांमध्ये अरबी समुद्रात गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. रविवार, 23 सप्टेंबर रोजी चिखले गावातील गावड भंडारी समाजाच्या मानाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक रात्री साडेआठच्या सुमारास गावच्या रिठी या चौपाटीवरील विसर्जन घाटावर पोहचली. त्यानंतर सामूहिक आरती झाल्यावर मूर्ती  विसर्जनाकरिता भक्त पाण्यात उतरले.  मूर्तीचे विसर्जन होताच,  ओंजळीत पाणी घेऊन ते बाप्पाला वाहिल्यानंतर, नमस्कार करून पुढील वर्षी लवकर येण्याची विनंती करण्याची पूर्वापार श्रद्धा येथील भक्तांची आहे.  दरम्यान निरोप देऊन हे भक्त पुन्हा किनाऱ्यावर परतल्यानंतर त्यांच्या हाताला तेलयुक्त चिकटपणा आल्याचा प्रत्यय आला. त्यापैकी अशोक पांडुरंग गावड या साठ वर्षीय भक्ताने लाईटच्या उजेडात दोन्ही हात धरल्यावर ते काळवंडले होते. त्यांनी ही माहिती सोबत असलेल्यांना सांगितली. त्यांनाही हाच अनुभव आला. तर काही भक्तांच्या कपड्यांना तेलमिश्रित डाग लागल्याची माहिती, तेथे उपस्थित चिखले ग्रामपंचायत सदस्य किरण गणपत पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली. दोन दिवसांपूर्वीच मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील काही किनाऱ्यावर मृत मासे आढळले होते. समुद्राच्या पाण्यात दूषित तेलमिश्रित तवंग पसरून चिकटपणा वाढला आहे. हा समुद्री पर्यावरणाला धोक्याचा इशारा असून या बाबत शासनाने तात्काळ पाऊल उचलणे आवश्यक आहे. अन्यथा सागरी जैवविविधता धोक्यात येईल अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत."समुद्रातील पाणी ओंजळीत घेऊन ते वाहिल्यानंतर नमस्काराकरिता हात जोडले. काही वेळाने लक्षात आले कि, हाताला तेलकटपणा आला आहे. ते लाईटच्या उजेडात धरल्यावर काळवंडले होते. घरी जाऊन तीन ते चार वेळा साबणाने हात स्वच्छ धुतल्यावर हा चिकटपणा गेला. हा अनुभव पहिल्यांदाच आला असून ही पर्यावरणाकरिता धोक्याची घंटा आहे." अशोक पांडुरंग गावड(चिखले गावातील गणेशभक्त)

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Visarjanगणेश विसर्जन