शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

Ganesh Visarjan 2018 : डहाणूत विसर्जनावेळी तेलमिश्रित पाण्याने भक्तांचे हातपाय काळवंडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 07:21 IST

अनंत चतुर्दशीच्या दिवशी अरबी समुद्रात गणेशमूर्ती विसर्जन केल्यानंतर दूषित तेलमिश्रित पाण्याने हातापायाला चिकटपणा येऊन ते काळवंडल्याचा आणि कपड्यांना काळे डाग पडल्याचा प्रत्यय तालुक्यातील चिखले गावच्या भक्तांना आला.

- अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी - अनंत चतुर्दशीच्या दिवशी अरबी समुद्रात गणेशमूर्ती विसर्जन केल्यानंतर दूषित तेलमिश्रित पाण्याने हातापायाला चिकटपणा येऊन ते काळवंडल्याचा आणि कपड्यांना काळे डाग पडल्याचा प्रत्यय तालुक्यातील चिखले गावच्या भक्तांना आला. दरम्यान दोन दिवसांपूर्वी मुंबई व पालघर जिल्ह्याच्या किनाऱ्यावर मृत मासेही आढळले होते. तालुक्यातील किनारपट्टीवरील गावांमध्ये अरबी समुद्रात गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. रविवार, 23 सप्टेंबर रोजी चिखले गावातील गावड भंडारी समाजाच्या मानाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक रात्री साडेआठच्या सुमारास गावच्या रिठी या चौपाटीवरील विसर्जन घाटावर पोहचली. त्यानंतर सामूहिक आरती झाल्यावर मूर्ती  विसर्जनाकरिता भक्त पाण्यात उतरले.  मूर्तीचे विसर्जन होताच,  ओंजळीत पाणी घेऊन ते बाप्पाला वाहिल्यानंतर, नमस्कार करून पुढील वर्षी लवकर येण्याची विनंती करण्याची पूर्वापार श्रद्धा येथील भक्तांची आहे.  दरम्यान निरोप देऊन हे भक्त पुन्हा किनाऱ्यावर परतल्यानंतर त्यांच्या हाताला तेलयुक्त चिकटपणा आल्याचा प्रत्यय आला. त्यापैकी अशोक पांडुरंग गावड या साठ वर्षीय भक्ताने लाईटच्या उजेडात दोन्ही हात धरल्यावर ते काळवंडले होते. त्यांनी ही माहिती सोबत असलेल्यांना सांगितली. त्यांनाही हाच अनुभव आला. तर काही भक्तांच्या कपड्यांना तेलमिश्रित डाग लागल्याची माहिती, तेथे उपस्थित चिखले ग्रामपंचायत सदस्य किरण गणपत पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली. दोन दिवसांपूर्वीच मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील काही किनाऱ्यावर मृत मासे आढळले होते. समुद्राच्या पाण्यात दूषित तेलमिश्रित तवंग पसरून चिकटपणा वाढला आहे. हा समुद्री पर्यावरणाला धोक्याचा इशारा असून या बाबत शासनाने तात्काळ पाऊल उचलणे आवश्यक आहे. अन्यथा सागरी जैवविविधता धोक्यात येईल अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत."समुद्रातील पाणी ओंजळीत घेऊन ते वाहिल्यानंतर नमस्काराकरिता हात जोडले. काही वेळाने लक्षात आले कि, हाताला तेलकटपणा आला आहे. ते लाईटच्या उजेडात धरल्यावर काळवंडले होते. घरी जाऊन तीन ते चार वेळा साबणाने हात स्वच्छ धुतल्यावर हा चिकटपणा गेला. हा अनुभव पहिल्यांदाच आला असून ही पर्यावरणाकरिता धोक्याची घंटा आहे." अशोक पांडुरंग गावड(चिखले गावातील गणेशभक्त)

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Visarjanगणेश विसर्जन