शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Ganesh Visarjan 2018 : डहाणूत विसर्जनावेळी तेलमिश्रित पाण्याने भक्तांचे हातपाय काळवंडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 07:21 IST

अनंत चतुर्दशीच्या दिवशी अरबी समुद्रात गणेशमूर्ती विसर्जन केल्यानंतर दूषित तेलमिश्रित पाण्याने हातापायाला चिकटपणा येऊन ते काळवंडल्याचा आणि कपड्यांना काळे डाग पडल्याचा प्रत्यय तालुक्यातील चिखले गावच्या भक्तांना आला.

- अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी - अनंत चतुर्दशीच्या दिवशी अरबी समुद्रात गणेशमूर्ती विसर्जन केल्यानंतर दूषित तेलमिश्रित पाण्याने हातापायाला चिकटपणा येऊन ते काळवंडल्याचा आणि कपड्यांना काळे डाग पडल्याचा प्रत्यय तालुक्यातील चिखले गावच्या भक्तांना आला. दरम्यान दोन दिवसांपूर्वी मुंबई व पालघर जिल्ह्याच्या किनाऱ्यावर मृत मासेही आढळले होते. तालुक्यातील किनारपट्टीवरील गावांमध्ये अरबी समुद्रात गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. रविवार, 23 सप्टेंबर रोजी चिखले गावातील गावड भंडारी समाजाच्या मानाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक रात्री साडेआठच्या सुमारास गावच्या रिठी या चौपाटीवरील विसर्जन घाटावर पोहचली. त्यानंतर सामूहिक आरती झाल्यावर मूर्ती  विसर्जनाकरिता भक्त पाण्यात उतरले.  मूर्तीचे विसर्जन होताच,  ओंजळीत पाणी घेऊन ते बाप्पाला वाहिल्यानंतर, नमस्कार करून पुढील वर्षी लवकर येण्याची विनंती करण्याची पूर्वापार श्रद्धा येथील भक्तांची आहे.  दरम्यान निरोप देऊन हे भक्त पुन्हा किनाऱ्यावर परतल्यानंतर त्यांच्या हाताला तेलयुक्त चिकटपणा आल्याचा प्रत्यय आला. त्यापैकी अशोक पांडुरंग गावड या साठ वर्षीय भक्ताने लाईटच्या उजेडात दोन्ही हात धरल्यावर ते काळवंडले होते. त्यांनी ही माहिती सोबत असलेल्यांना सांगितली. त्यांनाही हाच अनुभव आला. तर काही भक्तांच्या कपड्यांना तेलमिश्रित डाग लागल्याची माहिती, तेथे उपस्थित चिखले ग्रामपंचायत सदस्य किरण गणपत पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली. दोन दिवसांपूर्वीच मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील काही किनाऱ्यावर मृत मासे आढळले होते. समुद्राच्या पाण्यात दूषित तेलमिश्रित तवंग पसरून चिकटपणा वाढला आहे. हा समुद्री पर्यावरणाला धोक्याचा इशारा असून या बाबत शासनाने तात्काळ पाऊल उचलणे आवश्यक आहे. अन्यथा सागरी जैवविविधता धोक्यात येईल अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत."समुद्रातील पाणी ओंजळीत घेऊन ते वाहिल्यानंतर नमस्काराकरिता हात जोडले. काही वेळाने लक्षात आले कि, हाताला तेलकटपणा आला आहे. ते लाईटच्या उजेडात धरल्यावर काळवंडले होते. घरी जाऊन तीन ते चार वेळा साबणाने हात स्वच्छ धुतल्यावर हा चिकटपणा गेला. हा अनुभव पहिल्यांदाच आला असून ही पर्यावरणाकरिता धोक्याची घंटा आहे." अशोक पांडुरंग गावड(चिखले गावातील गणेशभक्त)

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Visarjanगणेश विसर्जन